शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६७९ गावे पाणीटंचाईच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:37 IST

तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ६७९ गावे पाणी टंचाईच्या छायेत असून पाणी टंचाई निवारणार्थ १५५५ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १२ कोटी ५८ लाख ८ हजार रुपयांच्या विविध उपाययोजना प्रस्तावित असल्या तरी गाव खेड्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे१५५५ उपाययोजना : १२ कोटी ५८ लाखांचा कृती आराखडा, गावागावांत पाण्यासाठी भटकंती सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ६७९ गावे पाणी टंचाईच्या छायेत असून पाणी टंचाई निवारणार्थ १५५५ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १२ कोटी ५८ लाख ८ हजार रुपयांच्या विविध उपाययोजना प्रस्तावित असल्या तरी गाव खेड्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कृती आराखड्यातील उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली नाही तर मे महिन्यात पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पाणी टंचाईचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. तलाव, बोडीतील जलस्तर घटल्याने पाणी टंचाईचे संकट तीव्र होत आहे. भूगर्भातील जलपातळी तापत्या उन्हाने खालावत असल्याने विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही कोरडे पडत चालले आहे. जिल्ह्यातील नदीचे पात्र वाळवंट झाले असून चुलबंदसह विविध नद्या कोरड्या पडल्या आहेत. नदीतीरावरील गावासोबतच जिल्ह्यातील तब्बल ६७९ गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट आहे.जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. १ जानेवारी ते ३० जून पर्यंत १५५५ उपाययोजना या कृती आराखड्यात सूचविण्यात आल्या आहेत. त्यात ४३१ गावात ५४१ नवीन विंधन विहिरी घेणे, ११२ गावात ११७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, १२१ गावात ४४६ विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती तर २७५ गावात विहिरी खोलीकरण व गाळ काढण्याचा समावेश आहे.यावर १२ कोटी ५८ लाख ८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत ५२ गावातील ६२ नवीन विंधन विहिरींसाठी ७२ लाख ११ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. तर विंधन विहिर विशेष दुरुस्तीसाठी १९० गावांमध्ये ३८ लाख ३५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. १ कोटी १० लाख ४६ हजार रुपये एप्रिल महिन्यात पाणी टंचाईच्या कामांवर खर्च झाल्याचा अहवाल प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. मात्र नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि विहिरीतील गाळ काढण्याची उपाययोजना मात्र शून्य आहे.जलस्तर एक मीटर खालीजिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असून सरासरी एक मीटर खाली पाणी पातळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे गावातील विहिरींची पातळी खालावली असून हातपंपही कोरडे पडत आहे. प्रभावी उपाययोजना होत नसल्याने दरवर्षी जलस्तर खालीखाली जात आहे. 

टॅग्स :Waterपाणी