शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

67 हजार शेतकऱ्यांचे वर्षाचे सहा हजार रुपये बुडाले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात दाेन लाख ११ हजार ७७२ लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसी केली आहे, तर ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत केवायसी केली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपयाच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पंतप्रधान किसान सन्मान याेजनेअंतर्गत ३१ मे या मुदतीत जिल्ह्यातील ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी केवायसी केले नसल्याचे पुढे आले आहे. या शेतकऱ्यांना दरवर्षीच्या सहा हजार रुपये मदतीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यात सहा हजार रुपये जमा केले जाते. यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत आधारकार्ड व इतर कागदपत्रे जाेडून केवायसी करणे अनिवार्य हाेते. भंडारा जिल्ह्यात दाेन लाख ११ हजार ७७२ लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसी केली आहे, तर ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत केवायसी केली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपयाच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. या याेजनेच्या लाभासाठी व शेतकऱ्यांची केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. 

‘३१ मे’ ची होती डेडलाईनपंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत केवायसी करण्यासाठी शासनाने ३१ मेपर्यंत डेडलाईन दिली हाेती. या कालावधीत जिल्ह्यातील ६८ टक्के शेतकऱ्यांनी केवायसी केली. मात्र ३२ टक्के शेतकरी वंचित आहेत.

एक लाख ४४ हजार शेतकऱ्यांना पेन्शनपंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्यात सहा हजार रुपये दिले जातात. या याेजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांना मिळेल.

५८३२ शेतकरी ठरले अपात्रदाेन लाख ११ हजार ७५२ शेतकऱ्यांपैकी पंतप्रधान किसान सन्मान याेजनेच्या लाभासाठी पाच हजार ८३२ शेतकरी अपात्र ठरले आहेत. यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील १२६६, माेहाडी १४०२, तुमसर तालुक्यातील १०३५, लाखांदूर ५६५, लाखनी ५५१, पवनी ४४५ आणि साकाेलीतील ३६८ शेतकरी आहेत.

केवायसीसाठी शेतकऱ्यांची कसरत

केवायसीसाठी आधारला माेबाईल नंबर संलग्न करणे बंधनकारक हाेते. हे काम गावात कुठेही हाेत नव्हते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी शहरात दाेन दिवस रांग लावली. यामुळे माेठी धावपळ झाली. त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले.- भुपेश गाढवे, सर्पेवाडा शेतकरी

आधारला माेबाईल नंबरची सक्ती या याेजनेतून हटविण्यात आली. परंतु, त्यानंतर चार दिवस या याेजनेची लिंकच उघडली जात नव्हती. रात्री दाेन वाजेपर्यंत जावून केवायसी केली. तेव्हा कुठे या याेजनेसाठी मी पात्र ठरलाे. - अनुप सपाटे, जांभाेरा शेतकरी

मुदतवाढ देण्याची मागणी

- पंतप्रधान किसान सन्मान याेजनेचे संकेतस्थळ अत्यंत संथगतीने सुरू हाेते. त्यातच चार दिवस संकेतस्थळ उघडतच नव्हते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना केवायसी करता आली नाही.- जिल्ह्यातील ६७ हजार ९३ शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना