शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

67 हजार शेतकऱ्यांचे वर्षाचे सहा हजार रुपये बुडाले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात दाेन लाख ११ हजार ७७२ लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसी केली आहे, तर ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत केवायसी केली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपयाच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पंतप्रधान किसान सन्मान याेजनेअंतर्गत ३१ मे या मुदतीत जिल्ह्यातील ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी केवायसी केले नसल्याचे पुढे आले आहे. या शेतकऱ्यांना दरवर्षीच्या सहा हजार रुपये मदतीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यात सहा हजार रुपये जमा केले जाते. यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत आधारकार्ड व इतर कागदपत्रे जाेडून केवायसी करणे अनिवार्य हाेते. भंडारा जिल्ह्यात दाेन लाख ११ हजार ७७२ लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसी केली आहे, तर ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत केवायसी केली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपयाच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. या याेजनेच्या लाभासाठी व शेतकऱ्यांची केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. 

‘३१ मे’ ची होती डेडलाईनपंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत केवायसी करण्यासाठी शासनाने ३१ मेपर्यंत डेडलाईन दिली हाेती. या कालावधीत जिल्ह्यातील ६८ टक्के शेतकऱ्यांनी केवायसी केली. मात्र ३२ टक्के शेतकरी वंचित आहेत.

एक लाख ४४ हजार शेतकऱ्यांना पेन्शनपंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्यात सहा हजार रुपये दिले जातात. या याेजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांना मिळेल.

५८३२ शेतकरी ठरले अपात्रदाेन लाख ११ हजार ७५२ शेतकऱ्यांपैकी पंतप्रधान किसान सन्मान याेजनेच्या लाभासाठी पाच हजार ८३२ शेतकरी अपात्र ठरले आहेत. यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील १२६६, माेहाडी १४०२, तुमसर तालुक्यातील १०३५, लाखांदूर ५६५, लाखनी ५५१, पवनी ४४५ आणि साकाेलीतील ३६८ शेतकरी आहेत.

केवायसीसाठी शेतकऱ्यांची कसरत

केवायसीसाठी आधारला माेबाईल नंबर संलग्न करणे बंधनकारक हाेते. हे काम गावात कुठेही हाेत नव्हते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी शहरात दाेन दिवस रांग लावली. यामुळे माेठी धावपळ झाली. त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले.- भुपेश गाढवे, सर्पेवाडा शेतकरी

आधारला माेबाईल नंबरची सक्ती या याेजनेतून हटविण्यात आली. परंतु, त्यानंतर चार दिवस या याेजनेची लिंकच उघडली जात नव्हती. रात्री दाेन वाजेपर्यंत जावून केवायसी केली. तेव्हा कुठे या याेजनेसाठी मी पात्र ठरलाे. - अनुप सपाटे, जांभाेरा शेतकरी

मुदतवाढ देण्याची मागणी

- पंतप्रधान किसान सन्मान याेजनेचे संकेतस्थळ अत्यंत संथगतीने सुरू हाेते. त्यातच चार दिवस संकेतस्थळ उघडतच नव्हते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना केवायसी करता आली नाही.- जिल्ह्यातील ६७ हजार ९३ शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना