शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
2
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
3
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
4
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
5
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
6
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
7
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
8
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
9
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
10
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
11
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
12
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
13
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
14
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
15
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
16
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
17
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
18
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
19
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
20
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

67 हजार शेतकऱ्यांचे वर्षाचे सहा हजार रुपये बुडाले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात दाेन लाख ११ हजार ७७२ लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसी केली आहे, तर ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत केवायसी केली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपयाच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पंतप्रधान किसान सन्मान याेजनेअंतर्गत ३१ मे या मुदतीत जिल्ह्यातील ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी केवायसी केले नसल्याचे पुढे आले आहे. या शेतकऱ्यांना दरवर्षीच्या सहा हजार रुपये मदतीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यात सहा हजार रुपये जमा केले जाते. यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत आधारकार्ड व इतर कागदपत्रे जाेडून केवायसी करणे अनिवार्य हाेते. भंडारा जिल्ह्यात दाेन लाख ११ हजार ७७२ लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसी केली आहे, तर ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत केवायसी केली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपयाच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. या याेजनेच्या लाभासाठी व शेतकऱ्यांची केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. 

‘३१ मे’ ची होती डेडलाईनपंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत केवायसी करण्यासाठी शासनाने ३१ मेपर्यंत डेडलाईन दिली हाेती. या कालावधीत जिल्ह्यातील ६८ टक्के शेतकऱ्यांनी केवायसी केली. मात्र ३२ टक्के शेतकरी वंचित आहेत.

एक लाख ४४ हजार शेतकऱ्यांना पेन्शनपंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्यात सहा हजार रुपये दिले जातात. या याेजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांना मिळेल.

५८३२ शेतकरी ठरले अपात्रदाेन लाख ११ हजार ७५२ शेतकऱ्यांपैकी पंतप्रधान किसान सन्मान याेजनेच्या लाभासाठी पाच हजार ८३२ शेतकरी अपात्र ठरले आहेत. यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील १२६६, माेहाडी १४०२, तुमसर तालुक्यातील १०३५, लाखांदूर ५६५, लाखनी ५५१, पवनी ४४५ आणि साकाेलीतील ३६८ शेतकरी आहेत.

केवायसीसाठी शेतकऱ्यांची कसरत

केवायसीसाठी आधारला माेबाईल नंबर संलग्न करणे बंधनकारक हाेते. हे काम गावात कुठेही हाेत नव्हते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी शहरात दाेन दिवस रांग लावली. यामुळे माेठी धावपळ झाली. त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले.- भुपेश गाढवे, सर्पेवाडा शेतकरी

आधारला माेबाईल नंबरची सक्ती या याेजनेतून हटविण्यात आली. परंतु, त्यानंतर चार दिवस या याेजनेची लिंकच उघडली जात नव्हती. रात्री दाेन वाजेपर्यंत जावून केवायसी केली. तेव्हा कुठे या याेजनेसाठी मी पात्र ठरलाे. - अनुप सपाटे, जांभाेरा शेतकरी

मुदतवाढ देण्याची मागणी

- पंतप्रधान किसान सन्मान याेजनेचे संकेतस्थळ अत्यंत संथगतीने सुरू हाेते. त्यातच चार दिवस संकेतस्थळ उघडतच नव्हते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना केवायसी करता आली नाही.- जिल्ह्यातील ६७ हजार ९३ शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना