शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

६६६ शेतकऱ्यांना मदत

By admin | Updated: February 16, 2017 00:18 IST

जून ते आॅक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीवर मदत जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या यादीसाठी धावपळ सुरु : अतिवृष्टीचा लाभ, २३ गावांचा समावेश देवानंद नंदेश्वर भंडाराजून ते आॅक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीवर मदत जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मोहाडी व साकोली या दोन तालुक्यातील गारपीटग्रस्त ६६६ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्याला गतवर्षीच्या खरीप हंगामात अस्मानी संकटाने घेरले होते. अतिवृष्टीमुळे हलके व मध्यम धान कापणीला आले असताना काही ठिकाणी धान सडले. काही ठिकाणी वादळी वारा व पावसामुळे धानपिक भुईसपाट झाले होते. अनेक वर्षांपासून ओला आणि कोरडा दुष्काळाची झळ सोसत शेतकरी मोठ्या आशेने खरीप पिकाची लागवड करीत असते. मात्र निसर्ग लहरी झाल्याने अनियमितपणा वाढला आहे. जून महिन्यात पावसाची अत्यल्प हजेरीने पेरणी लांबली होती. जुलै महिन्यात समाधानकारक पण ‘कही खुशी कही गम’ करीत पावसाने हजेरी लावली. निसर्ग कोपामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन पडीक राहीली. आॅक्टोंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांना जीवनदान तर काही शेकऱ्यांसाठी मारक ठरला. अनेकांचे होत्याचे नव्हते झाले. जून ते आॅक्टोंबर या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील २०९.०६ हेक्टर आर शेतजमिन बाधीत झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला. या अहवालानुसार जिल्ह्यातील मोहाडी व साकोली तालुक्यातील २३ गावे अतिवृष्टीने बाधित झाले. याचा ६६६ शेतकऱ्यांना फटका बसला. यात मोहाडी तालुक्यात ३ गावामधील ३२ तर, साकोली तालुक्यात २० गावातील ६३४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाने जून ते आॅक्टोंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पिक नुकसानीवर मदत जाहीर करण्याचा निर्णय ९ जानेवारी रोजी घेतला आहे. अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा उतरविलेला आहे, अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री विमा योजनेच्या निकषानुसार संबंधित विमा येत्रणेमार्फेत मदत देण्यात येणार आहे. त्या रकमेच्या ५० टक्के रक्कम पीक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणार आहे. त्याकरिता पीक विमा न उतरविलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना १३ मे २०१५ मधील तरतुदीनुसार देय असणारी रक्कम ५०० रुपये प्रती हेक्टरीपेक्षा कमी येत असले, अशा शेतकऱ्यांची यादी शासनाकडे सादर करण्यात यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला शेतकऱ्यांची यादी तात्काळ मागविली आहे.