शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

६६६ शेतकऱ्यांना मदत

By admin | Updated: February 16, 2017 00:18 IST

जून ते आॅक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीवर मदत जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या यादीसाठी धावपळ सुरु : अतिवृष्टीचा लाभ, २३ गावांचा समावेश देवानंद नंदेश्वर भंडाराजून ते आॅक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीवर मदत जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मोहाडी व साकोली या दोन तालुक्यातील गारपीटग्रस्त ६६६ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्याला गतवर्षीच्या खरीप हंगामात अस्मानी संकटाने घेरले होते. अतिवृष्टीमुळे हलके व मध्यम धान कापणीला आले असताना काही ठिकाणी धान सडले. काही ठिकाणी वादळी वारा व पावसामुळे धानपिक भुईसपाट झाले होते. अनेक वर्षांपासून ओला आणि कोरडा दुष्काळाची झळ सोसत शेतकरी मोठ्या आशेने खरीप पिकाची लागवड करीत असते. मात्र निसर्ग लहरी झाल्याने अनियमितपणा वाढला आहे. जून महिन्यात पावसाची अत्यल्प हजेरीने पेरणी लांबली होती. जुलै महिन्यात समाधानकारक पण ‘कही खुशी कही गम’ करीत पावसाने हजेरी लावली. निसर्ग कोपामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन पडीक राहीली. आॅक्टोंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांना जीवनदान तर काही शेकऱ्यांसाठी मारक ठरला. अनेकांचे होत्याचे नव्हते झाले. जून ते आॅक्टोंबर या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील २०९.०६ हेक्टर आर शेतजमिन बाधीत झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला. या अहवालानुसार जिल्ह्यातील मोहाडी व साकोली तालुक्यातील २३ गावे अतिवृष्टीने बाधित झाले. याचा ६६६ शेतकऱ्यांना फटका बसला. यात मोहाडी तालुक्यात ३ गावामधील ३२ तर, साकोली तालुक्यात २० गावातील ६३४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाने जून ते आॅक्टोंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पिक नुकसानीवर मदत जाहीर करण्याचा निर्णय ९ जानेवारी रोजी घेतला आहे. अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा उतरविलेला आहे, अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री विमा योजनेच्या निकषानुसार संबंधित विमा येत्रणेमार्फेत मदत देण्यात येणार आहे. त्या रकमेच्या ५० टक्के रक्कम पीक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणार आहे. त्याकरिता पीक विमा न उतरविलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना १३ मे २०१५ मधील तरतुदीनुसार देय असणारी रक्कम ५०० रुपये प्रती हेक्टरीपेक्षा कमी येत असले, अशा शेतकऱ्यांची यादी शासनाकडे सादर करण्यात यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला शेतकऱ्यांची यादी तात्काळ मागविली आहे.