शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

63 सिंचन प्रकल्पात 48.38 टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता ४२.८१ दलघमी असून सद्यस्थितीत या प्रकल्पात २५.३८ टक्के उपयुक्त साठा आहे. ५९.९८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात २६.८३ दलघमी म्हणजे ६२.६७ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२.२३ दलघमी असून त्याची टक्केवारी ४१.५३ आहे. गतवर्षी याच काळात २६.७१ दलघमी अर्थात ४९.९० टक्के जलसाठा होता.

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प जिल्ह्यात असला तरी बहुतांश सिंचनासाठी शेतकऱ्यांना मध्यम, लघू आणि माजी मालगुजारी (मामा) तलावावरच अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्याची चाहूल लागताच  प्रकल्पातील पाणी कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये ५८.९२ दलघमी म्हणजे ४८.३८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४.६२ टक्के जलसाठा कमी असून यामुळे उन्हाळी हंगामातील सिंचन प्रभावित होणार आहे.भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता ४२.८१ दलघमी असून सद्यस्थितीत या प्रकल्पात २५.३८ टक्के उपयुक्त साठा आहे. ५९.९८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात २६.८३ दलघमी म्हणजे ६२.६७ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२.२३ दलघमी असून त्याची टक्केवारी ४१.५३ आहे. गतवर्षी याच काळात २६.७१ दलघमी अर्थात ४९.९० टक्के जलसाठा होता. २८ मामा तलावात १०.९९ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ४३.२८ आहे. गतवर्षी या प्रकल्पात ११.३७ दलघमी म्हणजे ४४.४७ टक्के जलसाठा होता.मध्यम, लघु आणि मामा तलावातील जलसाठा गतवर्षीपेक्षा यंदा कमी आहे. परिणामी उन्हाळी सिंचनावर त्याचा परिणाम होणार आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. या प्रकल्पांच्या पाण्यावर सिंचन केले जाते. परंतु जलसाठे निम्यावर आल्याने किती प्रमाणात पाणी सोडणार हा प्रश्नच आहे.भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. शंभर टक्के सिंचन आणि टँकरमुक्त जिल्हा आहे. मात्र अनेक तलावांमध्ये आता मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे उपयुक्त जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मध्यम प्रकल्पांचीही हिच अवस्था असून गाळ काढण्याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही.

गोसेखुर्द आणि बावनथडीकडून अपेक्षा

- जिल्ह्यात गोसेखुर्द हा मोठा प्रकल्प असून यावर्षी पूर्ण क्षमतेने भरण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी सिंचनाला मिळेल अशी अपेक्षा आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या बावनथडी प्रकल्पाचे पाणी तुमसर, मोहाडी तालुक्याला मिळते. इतर तलावांची स्थिती गंभीर असल्याने या दोन प्रकल्पातील पाण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रकल्पांची स्थिती- मध्यम प्रकल्प चांदपूरमध्ये १७.९२ दलघमी साठा असून त्याची टक्केवारी ६२.०६ आहे.- बघेडा प्रकल्पात ४.०४ दलघमी जलसाठा असून ८९.१२ टक्के जलसाठा आहे.- बेटेकर बोथली प्रकल्पात ९.०९ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ५१.७१ आहे.- सोरना प्रकल्पात ९.८२ दलघमी जलसाठा असून ३१.७५ टक्के जलसाठा आहे.- मामा तलावात १०.९९ टक्के म्हणजे ४३.२८ टक्के जलसाठा असून बहुतांश तलाव तळाला लागले.- गतवर्षीपेक्षा यंदा पाणी पातळी वेगाने कमी होत असून उन्हाळ्यात टंचाई निर्माण होवू शकते.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प