शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

63 सिंचन प्रकल्पात 48.38 टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता ४२.८१ दलघमी असून सद्यस्थितीत या प्रकल्पात २५.३८ टक्के उपयुक्त साठा आहे. ५९.९८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात २६.८३ दलघमी म्हणजे ६२.६७ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२.२३ दलघमी असून त्याची टक्केवारी ४१.५३ आहे. गतवर्षी याच काळात २६.७१ दलघमी अर्थात ४९.९० टक्के जलसाठा होता.

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प जिल्ह्यात असला तरी बहुतांश सिंचनासाठी शेतकऱ्यांना मध्यम, लघू आणि माजी मालगुजारी (मामा) तलावावरच अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्याची चाहूल लागताच  प्रकल्पातील पाणी कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये ५८.९२ दलघमी म्हणजे ४८.३८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४.६२ टक्के जलसाठा कमी असून यामुळे उन्हाळी हंगामातील सिंचन प्रभावित होणार आहे.भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता ४२.८१ दलघमी असून सद्यस्थितीत या प्रकल्पात २५.३८ टक्के उपयुक्त साठा आहे. ५९.९८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात २६.८३ दलघमी म्हणजे ६२.६७ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२.२३ दलघमी असून त्याची टक्केवारी ४१.५३ आहे. गतवर्षी याच काळात २६.७१ दलघमी अर्थात ४९.९० टक्के जलसाठा होता. २८ मामा तलावात १०.९९ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ४३.२८ आहे. गतवर्षी या प्रकल्पात ११.३७ दलघमी म्हणजे ४४.४७ टक्के जलसाठा होता.मध्यम, लघु आणि मामा तलावातील जलसाठा गतवर्षीपेक्षा यंदा कमी आहे. परिणामी उन्हाळी सिंचनावर त्याचा परिणाम होणार आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. या प्रकल्पांच्या पाण्यावर सिंचन केले जाते. परंतु जलसाठे निम्यावर आल्याने किती प्रमाणात पाणी सोडणार हा प्रश्नच आहे.भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. शंभर टक्के सिंचन आणि टँकरमुक्त जिल्हा आहे. मात्र अनेक तलावांमध्ये आता मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे उपयुक्त जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मध्यम प्रकल्पांचीही हिच अवस्था असून गाळ काढण्याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही.

गोसेखुर्द आणि बावनथडीकडून अपेक्षा

- जिल्ह्यात गोसेखुर्द हा मोठा प्रकल्प असून यावर्षी पूर्ण क्षमतेने भरण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी सिंचनाला मिळेल अशी अपेक्षा आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या बावनथडी प्रकल्पाचे पाणी तुमसर, मोहाडी तालुक्याला मिळते. इतर तलावांची स्थिती गंभीर असल्याने या दोन प्रकल्पातील पाण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रकल्पांची स्थिती- मध्यम प्रकल्प चांदपूरमध्ये १७.९२ दलघमी साठा असून त्याची टक्केवारी ६२.०६ आहे.- बघेडा प्रकल्पात ४.०४ दलघमी जलसाठा असून ८९.१२ टक्के जलसाठा आहे.- बेटेकर बोथली प्रकल्पात ९.०९ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ५१.७१ आहे.- सोरना प्रकल्पात ९.८२ दलघमी जलसाठा असून ३१.७५ टक्के जलसाठा आहे.- मामा तलावात १०.९९ टक्के म्हणजे ४३.२८ टक्के जलसाठा असून बहुतांश तलाव तळाला लागले.- गतवर्षीपेक्षा यंदा पाणी पातळी वेगाने कमी होत असून उन्हाळ्यात टंचाई निर्माण होवू शकते.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प