शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

63 सिंचन प्रकल्पात 48.38 टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता ४२.८१ दलघमी असून सद्यस्थितीत या प्रकल्पात २५.३८ टक्के उपयुक्त साठा आहे. ५९.९८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात २६.८३ दलघमी म्हणजे ६२.६७ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२.२३ दलघमी असून त्याची टक्केवारी ४१.५३ आहे. गतवर्षी याच काळात २६.७१ दलघमी अर्थात ४९.९० टक्के जलसाठा होता.

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प जिल्ह्यात असला तरी बहुतांश सिंचनासाठी शेतकऱ्यांना मध्यम, लघू आणि माजी मालगुजारी (मामा) तलावावरच अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्याची चाहूल लागताच  प्रकल्पातील पाणी कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये ५८.९२ दलघमी म्हणजे ४८.३८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४.६२ टक्के जलसाठा कमी असून यामुळे उन्हाळी हंगामातील सिंचन प्रभावित होणार आहे.भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता ४२.८१ दलघमी असून सद्यस्थितीत या प्रकल्पात २५.३८ टक्के उपयुक्त साठा आहे. ५९.९८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात २६.८३ दलघमी म्हणजे ६२.६७ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२.२३ दलघमी असून त्याची टक्केवारी ४१.५३ आहे. गतवर्षी याच काळात २६.७१ दलघमी अर्थात ४९.९० टक्के जलसाठा होता. २८ मामा तलावात १०.९९ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ४३.२८ आहे. गतवर्षी या प्रकल्पात ११.३७ दलघमी म्हणजे ४४.४७ टक्के जलसाठा होता.मध्यम, लघु आणि मामा तलावातील जलसाठा गतवर्षीपेक्षा यंदा कमी आहे. परिणामी उन्हाळी सिंचनावर त्याचा परिणाम होणार आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. या प्रकल्पांच्या पाण्यावर सिंचन केले जाते. परंतु जलसाठे निम्यावर आल्याने किती प्रमाणात पाणी सोडणार हा प्रश्नच आहे.भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. शंभर टक्के सिंचन आणि टँकरमुक्त जिल्हा आहे. मात्र अनेक तलावांमध्ये आता मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे उपयुक्त जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मध्यम प्रकल्पांचीही हिच अवस्था असून गाळ काढण्याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही.

गोसेखुर्द आणि बावनथडीकडून अपेक्षा

- जिल्ह्यात गोसेखुर्द हा मोठा प्रकल्प असून यावर्षी पूर्ण क्षमतेने भरण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी सिंचनाला मिळेल अशी अपेक्षा आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या बावनथडी प्रकल्पाचे पाणी तुमसर, मोहाडी तालुक्याला मिळते. इतर तलावांची स्थिती गंभीर असल्याने या दोन प्रकल्पातील पाण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रकल्पांची स्थिती- मध्यम प्रकल्प चांदपूरमध्ये १७.९२ दलघमी साठा असून त्याची टक्केवारी ६२.०६ आहे.- बघेडा प्रकल्पात ४.०४ दलघमी जलसाठा असून ८९.१२ टक्के जलसाठा आहे.- बेटेकर बोथली प्रकल्पात ९.०९ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ५१.७१ आहे.- सोरना प्रकल्पात ९.८२ दलघमी जलसाठा असून ३१.७५ टक्के जलसाठा आहे.- मामा तलावात १०.९९ टक्के म्हणजे ४३.२८ टक्के जलसाठा असून बहुतांश तलाव तळाला लागले.- गतवर्षीपेक्षा यंदा पाणी पातळी वेगाने कमी होत असून उन्हाळ्यात टंचाई निर्माण होवू शकते.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प