शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

५३ हजार बालकांना आधारची प्रतीक्षा

By admin | Updated: May 1, 2015 00:46 IST

शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराशून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८५ हजार ५५४ बालकांपैकी सुमारे ३२ हजार ५३९ बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले. अद्यापही ५३ हजार १५ बालकांना आधार नोंदणीची प्रतीक्षा आहे.शासकीय योजनांमधील गैरव्यवहार कमी करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड देण्याची मोहीम केंद्र शासनाने सुरू केली आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड सक्तीचे केल्याने नागरिकही स्वत:हून आधार कार्ड काढत आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १२ लाख एवढी आहे. त्यापैकी ८९ टक्के नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. नागरिकांचे आधार कार्ड काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर शासनाने ० ते पाच या वयोगटातील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून सुरू केली आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील आधार केंद्रांवर २९ यंत्र सुरू आहेत. त्यापैकी एक यंत्र बंद असल्याने २८ मशीनवर कामे केली जात आहेत. जिल्हाभरात ० ते पाच या वयोगटातील ८५ हजार ५५४ बालके आहे. त्यापैकी आजपर्यंत ३२ हजार ५३९ बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. संपूर्ण बालकांचे जून महिन्यापर्यंत आधार कार्ड काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र १00 टक्के उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जास्त कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अंगणवाडीतील बालकांचेही आधार कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. महिला व बालकल्याण विभागाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रोहयो मजुरांचे जॉब कार्ड काढण्याची प्रक्रीयाही अद्यापही सुरु आहे. त्यामुळे आतापर्यत केवळ ३८ टक्के बालकांची आधार कार्ड काढण्यात आले. लवकरच उर्वरीत बालकांचे आधार कार्ड काढण्यात येतील.- प्रतापसिंग राठोड,उपमुख्य कार्यपालन अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग)आधार कार्ड काढण्याची मोहीम ग्रामीण भागात सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले नाही. परिणामी त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ज्या गावी आधार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या गावातील बालकांसोबतच इतरही नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात येत आहेत. मात्र यामध्ये प्रथम प्राधान्य बालकांनाच दिला जात आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याबद्दल निर्देश नाहीअंगणवाडीतील बालकांसोबतच पहिली ते दहाव्या वर्गापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढावे लागणार आहेत. प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक बालकाला आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित होत आहेत. मात्र याबद्दल कोणतेही अधिकृत पत्र महिला बालकल्याण विभागाला प्राप्त झाले नाही.