शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

५३ हजार बालकांना आधारची प्रतीक्षा

By admin | Updated: May 1, 2015 00:46 IST

शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराशून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८५ हजार ५५४ बालकांपैकी सुमारे ३२ हजार ५३९ बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले. अद्यापही ५३ हजार १५ बालकांना आधार नोंदणीची प्रतीक्षा आहे.शासकीय योजनांमधील गैरव्यवहार कमी करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड देण्याची मोहीम केंद्र शासनाने सुरू केली आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड सक्तीचे केल्याने नागरिकही स्वत:हून आधार कार्ड काढत आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १२ लाख एवढी आहे. त्यापैकी ८९ टक्के नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. नागरिकांचे आधार कार्ड काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर शासनाने ० ते पाच या वयोगटातील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून सुरू केली आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील आधार केंद्रांवर २९ यंत्र सुरू आहेत. त्यापैकी एक यंत्र बंद असल्याने २८ मशीनवर कामे केली जात आहेत. जिल्हाभरात ० ते पाच या वयोगटातील ८५ हजार ५५४ बालके आहे. त्यापैकी आजपर्यंत ३२ हजार ५३९ बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. संपूर्ण बालकांचे जून महिन्यापर्यंत आधार कार्ड काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र १00 टक्के उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जास्त कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अंगणवाडीतील बालकांचेही आधार कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. महिला व बालकल्याण विभागाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रोहयो मजुरांचे जॉब कार्ड काढण्याची प्रक्रीयाही अद्यापही सुरु आहे. त्यामुळे आतापर्यत केवळ ३८ टक्के बालकांची आधार कार्ड काढण्यात आले. लवकरच उर्वरीत बालकांचे आधार कार्ड काढण्यात येतील.- प्रतापसिंग राठोड,उपमुख्य कार्यपालन अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग)आधार कार्ड काढण्याची मोहीम ग्रामीण भागात सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले नाही. परिणामी त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ज्या गावी आधार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या गावातील बालकांसोबतच इतरही नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात येत आहेत. मात्र यामध्ये प्रथम प्राधान्य बालकांनाच दिला जात आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याबद्दल निर्देश नाहीअंगणवाडीतील बालकांसोबतच पहिली ते दहाव्या वर्गापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढावे लागणार आहेत. प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक बालकाला आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित होत आहेत. मात्र याबद्दल कोणतेही अधिकृत पत्र महिला बालकल्याण विभागाला प्राप्त झाले नाही.