शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

रोहयोची ५०० कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:35 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा प्रगतीपथावर असून पाच वर्षात जिल्हाभरात सुमारे ५०० कोटींची कामे करण्यात आली. या माध्यमातून २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन काम उपलब्ध करून देण्यात आले. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्याने मजुरांचे स्थलांतरण थांबवून विकास योजनांनाही गती आली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षे : २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन, भंडारा जिल्हा रोहयोत प्रगतीपथावर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा प्रगतीपथावर असून पाच वर्षात जिल्हाभरात सुमारे ५०० कोटींची कामे करण्यात आली. या माध्यमातून २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन काम उपलब्ध करून देण्यात आले. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्याने मजुरांचे स्थलांतरण थांबवून विकास योजनांनाही गती आली आहे.शासनाच्या महत्वकांक्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेला भंडारा जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात २ लाख १० हजार ५६७ कुटुंबांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून या नोंदणीकृत कुटुंबांना रोजगार पत्रकाचे वाटप करण्यात आले. ग्रामीण क्षेत्राचा विकास होण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त असून या योजनेची किमान ५० टक्के अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आले. विकासाचे विकेंद्रीकरण आणि रोजगाराची निर्मिती होत आहे.भंडारा जिल्ह्यात २०१४ मध्ये १ लाख १५ हजार २५२ कुटुंबातील २ लाख ३५ हजार ६३५ मजुरांना मागणीनुसार स्थानिक क्षेत्रात काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ९९ कोटी २५ लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात आला. ५२ लाख ४९ हजार मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. २०१५-१६ मध्ये १ लाख १६ हजार ६३४ कुटुंबातील २ लाख ४८ हजार ८८२ मजुरांना काम देण्यात आले. त्यावर १०२ कोटी २७ लाख २००० रुपये खर्च झाला. ५९ लाख ७६ हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्यात आले.२०१६-१७ मध्ये १ लाख २२ हजार १३७ कुटुंबातील २ लाख ६५ हजार १६९ मजुरांना स्थानिक काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ११४ कोटी ६७ लाख ९ हजार खर्च झाला. यावर्षी ५५ लाख १४ हजार मनुष्यदिन काम निर्मिती करण्यात आली. २०१७-१८ मध्ये १ लाख २६ हजार ४४ कुटुंबातील २ लाख ७३ हजार ९८५ मजुरांना मागणीनुसार काम उपलब्ध करून देण्यात आले.त्यावर ११९ कोटी १३ लाख ३१ हजार रुपये खर्च झाले. ५३ लाख १३ हजार मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली.१०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे वाटचालभंडारा जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये डिसेंबर अखेर १ लाख ३१ हजार १२० कुटुंबातील २ लाख ८३ हजार ३३८ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ७९ कोटी ४८ लाख १३ हजार रुपये खर्च झाले. यावर्षात जिल्ह्याला ५९ कोटी ३५ हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत ४३ लाख ९ हजार काम पूर्णत्वास गेले आहे. मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने विकासासोबतच स्थानिक पातळीवर मजुरांना काम उपलब्ध झाले आहे.