शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

रोहयोची ५०० कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:35 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा प्रगतीपथावर असून पाच वर्षात जिल्हाभरात सुमारे ५०० कोटींची कामे करण्यात आली. या माध्यमातून २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन काम उपलब्ध करून देण्यात आले. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्याने मजुरांचे स्थलांतरण थांबवून विकास योजनांनाही गती आली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षे : २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन, भंडारा जिल्हा रोहयोत प्रगतीपथावर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा प्रगतीपथावर असून पाच वर्षात जिल्हाभरात सुमारे ५०० कोटींची कामे करण्यात आली. या माध्यमातून २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन काम उपलब्ध करून देण्यात आले. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्याने मजुरांचे स्थलांतरण थांबवून विकास योजनांनाही गती आली आहे.शासनाच्या महत्वकांक्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेला भंडारा जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात २ लाख १० हजार ५६७ कुटुंबांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून या नोंदणीकृत कुटुंबांना रोजगार पत्रकाचे वाटप करण्यात आले. ग्रामीण क्षेत्राचा विकास होण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त असून या योजनेची किमान ५० टक्के अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आले. विकासाचे विकेंद्रीकरण आणि रोजगाराची निर्मिती होत आहे.भंडारा जिल्ह्यात २०१४ मध्ये १ लाख १५ हजार २५२ कुटुंबातील २ लाख ३५ हजार ६३५ मजुरांना मागणीनुसार स्थानिक क्षेत्रात काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ९९ कोटी २५ लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात आला. ५२ लाख ४९ हजार मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. २०१५-१६ मध्ये १ लाख १६ हजार ६३४ कुटुंबातील २ लाख ४८ हजार ८८२ मजुरांना काम देण्यात आले. त्यावर १०२ कोटी २७ लाख २००० रुपये खर्च झाला. ५९ लाख ७६ हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्यात आले.२०१६-१७ मध्ये १ लाख २२ हजार १३७ कुटुंबातील २ लाख ६५ हजार १६९ मजुरांना स्थानिक काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ११४ कोटी ६७ लाख ९ हजार खर्च झाला. यावर्षी ५५ लाख १४ हजार मनुष्यदिन काम निर्मिती करण्यात आली. २०१७-१८ मध्ये १ लाख २६ हजार ४४ कुटुंबातील २ लाख ७३ हजार ९८५ मजुरांना मागणीनुसार काम उपलब्ध करून देण्यात आले.त्यावर ११९ कोटी १३ लाख ३१ हजार रुपये खर्च झाले. ५३ लाख १३ हजार मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली.१०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे वाटचालभंडारा जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये डिसेंबर अखेर १ लाख ३१ हजार १२० कुटुंबातील २ लाख ८३ हजार ३३८ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ७९ कोटी ४८ लाख १३ हजार रुपये खर्च झाले. यावर्षात जिल्ह्याला ५९ कोटी ३५ हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत ४३ लाख ९ हजार काम पूर्णत्वास गेले आहे. मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने विकासासोबतच स्थानिक पातळीवर मजुरांना काम उपलब्ध झाले आहे.