शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शासकीय नर्सिंग होस्टेलच्या ४९ विद्यार्थीनी एकाचवेळी आजारी, विषबाधेचा संशय

By युवराज गोमास | Updated: December 9, 2023 16:07 IST

शनिवारला दुपारपर्यंत यातील ४७ विद्यार्थीनींना उपचारानंतर रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

भंडारा : शहरातील शासकीय नर्सिेग होस्टेलमधील ४९ विद्यार्थीनींना शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. शनिवारला दुपारपर्यंत यातील ४७ विद्यार्थीनींना उपचारानंतर रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, सात विद्यार्थीनी अद्यापही उपचारार्थ दाखल आहेत.

दुषीत अन्न व पाण्यातून विषबाधेच्या चर्चेला उधाण आले आहे.भंडारा शहरातील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निवासस्थानाशेजारी शासकीय नर्सिेग होस्टेल आहे. यामध्ये 'जीएनएम व एएनम' चे शिक्षण घेत असलेल्या मुली राहतात. होस्टेमध्ये राहण्याची शासकीय सुविधा आहे. मात्र, भाजीपाला खरेदी व भोजन बनविण्याचे काम मुलीच करीत असल्याचे प्रशासनाने सांगितले. शुक्रवारला दुपारच्या सुमारास होस्टेलमधील दोघींची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. त्यानंतर होस्टेलमधील अन्य मुलींची विचारणा केली असता मुलींनी ताप, सर्दी, पोट फुगणे, डोके दुखणे, थंडी लागून ताप, उलटी, चक्कर येणे, मळमळ वाटणे आदी लक्षणे सांगितल्याने तब्बल ४९ विद्यार्थीनींना उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, एकाचवेळी ४९ विदयार्थीनींना त्रास जाणवू लागल्याने पाणी अथवा अन्न विषबाधेच्या चर्चेला उधाण आले आहे.

भरती असलेल्या विद्यार्थीनी

जिल्हा सामान्य रूग्णालयात शुक्रवारला सायंकाळपर्यंत ४९ विद्यार्थीनींना उपचारार्थ दाखल करण्यात आले. शनिवारला सकाळपर्यंत यातील ४२ जणींना सुट्टी देण्यात आली. तर भरती असलेल्या विद्यार्थीनींमध्ये प्राची कुंभरे, ऐश्वर्या मेश्राम, रश्मी झंझाड, प्राची पडोळे, तनुषी खोब्रागडे, रिता मते यांचा समावेश आहे.

पालकांची वाढली चिंता

मुलींच्या तबीयतीची माहिती प्रशासनाचेवतीने मुलींच्या पालकांना वेळीच देण्यात आली. पालक दवाखान्यात हजर झाले. मुलींच्या उपचारावर त्यांचे बारीक लक्ष आहे. मुलींच्या तबीयतीची काळजी घेत आहे. परंतु, एकाचवेळी ऐवढ्या मुली आजारी का पडल्या यांचे उत्तर त्यांचेकडे नाही. त्यामुळे पालक चिंताग्रस्त आहे. पालक भरती असलेल्या विद्यार्थीनींच्या सेवेत हजर आहेत.

विषबाधेचा हा प्रकार नाही. सुरूवातीस दोघींची प्रकृती बिघडल्याने उपचार करण्यात आले. त्यानंतर तबियत चांगली नसल्याचे सांगितल्याने ४७ विद्यार्थीनींना तपासणीसाठी भरती केले हाेते. रात्रभर काळजी घेण्यात आली. सकाळी प्रकृतीत सुधारणा होताच व रिपोर्ट निगेटिव्ह येताच ४२ जणींना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सात जणींवर उपचार सुरू आहेत. सर्व लवकरच बऱ्या होतील. होस्टेलमध्ये केवळ राहण्याची सुविधा आहे. विद्यार्थी स्वत: भाजीपाला आणतात व शिजविता. एकाचवेळी सर्वांची प्रकृती बिघडलेली नाही. - डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा