शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

शासकीय नर्सिंग होस्टेलच्या ४९ विद्यार्थीनी एकाचवेळी आजारी, विषबाधेचा संशय

By युवराज गोमास | Updated: December 9, 2023 16:07 IST

शनिवारला दुपारपर्यंत यातील ४७ विद्यार्थीनींना उपचारानंतर रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

भंडारा : शहरातील शासकीय नर्सिेग होस्टेलमधील ४९ विद्यार्थीनींना शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. शनिवारला दुपारपर्यंत यातील ४७ विद्यार्थीनींना उपचारानंतर रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, सात विद्यार्थीनी अद्यापही उपचारार्थ दाखल आहेत.

दुषीत अन्न व पाण्यातून विषबाधेच्या चर्चेला उधाण आले आहे.भंडारा शहरातील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निवासस्थानाशेजारी शासकीय नर्सिेग होस्टेल आहे. यामध्ये 'जीएनएम व एएनम' चे शिक्षण घेत असलेल्या मुली राहतात. होस्टेमध्ये राहण्याची शासकीय सुविधा आहे. मात्र, भाजीपाला खरेदी व भोजन बनविण्याचे काम मुलीच करीत असल्याचे प्रशासनाने सांगितले. शुक्रवारला दुपारच्या सुमारास होस्टेलमधील दोघींची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. त्यानंतर होस्टेलमधील अन्य मुलींची विचारणा केली असता मुलींनी ताप, सर्दी, पोट फुगणे, डोके दुखणे, थंडी लागून ताप, उलटी, चक्कर येणे, मळमळ वाटणे आदी लक्षणे सांगितल्याने तब्बल ४९ विद्यार्थीनींना उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, एकाचवेळी ४९ विदयार्थीनींना त्रास जाणवू लागल्याने पाणी अथवा अन्न विषबाधेच्या चर्चेला उधाण आले आहे.

भरती असलेल्या विद्यार्थीनी

जिल्हा सामान्य रूग्णालयात शुक्रवारला सायंकाळपर्यंत ४९ विद्यार्थीनींना उपचारार्थ दाखल करण्यात आले. शनिवारला सकाळपर्यंत यातील ४२ जणींना सुट्टी देण्यात आली. तर भरती असलेल्या विद्यार्थीनींमध्ये प्राची कुंभरे, ऐश्वर्या मेश्राम, रश्मी झंझाड, प्राची पडोळे, तनुषी खोब्रागडे, रिता मते यांचा समावेश आहे.

पालकांची वाढली चिंता

मुलींच्या तबीयतीची माहिती प्रशासनाचेवतीने मुलींच्या पालकांना वेळीच देण्यात आली. पालक दवाखान्यात हजर झाले. मुलींच्या उपचारावर त्यांचे बारीक लक्ष आहे. मुलींच्या तबीयतीची काळजी घेत आहे. परंतु, एकाचवेळी ऐवढ्या मुली आजारी का पडल्या यांचे उत्तर त्यांचेकडे नाही. त्यामुळे पालक चिंताग्रस्त आहे. पालक भरती असलेल्या विद्यार्थीनींच्या सेवेत हजर आहेत.

विषबाधेचा हा प्रकार नाही. सुरूवातीस दोघींची प्रकृती बिघडल्याने उपचार करण्यात आले. त्यानंतर तबियत चांगली नसल्याचे सांगितल्याने ४७ विद्यार्थीनींना तपासणीसाठी भरती केले हाेते. रात्रभर काळजी घेण्यात आली. सकाळी प्रकृतीत सुधारणा होताच व रिपोर्ट निगेटिव्ह येताच ४२ जणींना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सात जणींवर उपचार सुरू आहेत. सर्व लवकरच बऱ्या होतील. होस्टेलमध्ये केवळ राहण्याची सुविधा आहे. विद्यार्थी स्वत: भाजीपाला आणतात व शिजविता. एकाचवेळी सर्वांची प्रकृती बिघडलेली नाही. - डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा