शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

लाखांदुरातील ४८ गावांची धुरा ३३ पोलिसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येत असून, सुमारे १ लाख ३६ हजार लोकसंख्या आहे. त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ८४ पोलिस मनुष्यबळ आहे. मात्र सध्या लाखांदुर पोलीसठाण्यामध्ये ३३ पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास ...

ठळक मुद्देकामाचा ताण : लाखांदूर ठाण्यात कर्मचाऱ्यांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येत असून, सुमारे १ लाख ३६ हजार लोकसंख्या आहे. त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ८४ पोलिस मनुष्यबळ आहे. मात्र सध्या लाखांदुर पोलीसठाण्यामध्ये ३३ पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे.या पोलीस स्टेशनला एक पोलीस निरीक्षक, ५ साहाय्यक, उपनिरीक्षक व ७८ पोलीस असा एकून ८४ पोलीसांचे मनुष्यबळ शासन दरबारी आहे. येथील लोकसंख्या पाहता कमीत कमी २५० ते ३०० पोलिसांची गरज आहे. परंतु या ठिकाणी सध्या ४००० नागरिकांमागे एक पोलीस असे समीकरण आहे. तालुक्यात दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे़.वाढत्या शहरीकरणा बरोबरच गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे़. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ वाढणे गरजेचे आहे़.‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेऊन जनतेचे सदैव रक्षण करणा?्या पोलिसांना मात्र या अपुऱ्या मनुष्यबळामुळे डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे़. १ लाख ३६ हजार लोकसंख्या असलेल्या या ४८ गावात पोलिसांची संख्या मात्र ३३ इतकीच आहे़ त्यामुळे याठिकाणी घडणा?्या गुन्ह्यांवर नियत्रंण ठेवणे कठीण बनले आहे.त्याचाच परिणाम म्हणून घरफोडी, विनयभंग व अवैद्य धंद्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे पोलिसांची कुमक वाढवणे गरजेचे आहे.सध्या ४०० नागरिकांमागे १ पोलीस काम करत असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची पळापळ होताना दिसते. पोलीस स्थानकात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेण्यासाठी कमीतकमी २५० ते ३०० पोलिसांची तैनात असणे गरजेचे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात व गुन्ह्यांवर नियत्रंण मिळविण्यात यश येणार आहे.पोलिसांची संख्या ३०० वर गेल्यास ४५० नागरिकांमागे एक पोलीस असे प्रमाण राहणार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर पडणारा ताणही कमी होईल. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणे ही काळाची गरज बनली आहे.सद्यास्थितीत लाखांदुर तालुक्यात अवैद्य दारू विक्री, सट्टा, जुगार, आँनलाईन सट्टा, घरफोडी, दारू पुरवठा यासह विनयभंगांचे प्रमाणही वाढले आहे. यावर नियत्रंण ठेण्यासाठी अधिक पोलिसांची गरज आहे.