शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदुरातील ४८ गावांची धुरा ३३ पोलिसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येत असून, सुमारे १ लाख ३६ हजार लोकसंख्या आहे. त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ८४ पोलिस मनुष्यबळ आहे. मात्र सध्या लाखांदुर पोलीसठाण्यामध्ये ३३ पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास ...

ठळक मुद्देकामाचा ताण : लाखांदूर ठाण्यात कर्मचाऱ्यांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येत असून, सुमारे १ लाख ३६ हजार लोकसंख्या आहे. त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ८४ पोलिस मनुष्यबळ आहे. मात्र सध्या लाखांदुर पोलीसठाण्यामध्ये ३३ पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे.या पोलीस स्टेशनला एक पोलीस निरीक्षक, ५ साहाय्यक, उपनिरीक्षक व ७८ पोलीस असा एकून ८४ पोलीसांचे मनुष्यबळ शासन दरबारी आहे. येथील लोकसंख्या पाहता कमीत कमी २५० ते ३०० पोलिसांची गरज आहे. परंतु या ठिकाणी सध्या ४००० नागरिकांमागे एक पोलीस असे समीकरण आहे. तालुक्यात दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे़.वाढत्या शहरीकरणा बरोबरच गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे़. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ वाढणे गरजेचे आहे़.‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेऊन जनतेचे सदैव रक्षण करणा?्या पोलिसांना मात्र या अपुऱ्या मनुष्यबळामुळे डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे़. १ लाख ३६ हजार लोकसंख्या असलेल्या या ४८ गावात पोलिसांची संख्या मात्र ३३ इतकीच आहे़ त्यामुळे याठिकाणी घडणा?्या गुन्ह्यांवर नियत्रंण ठेवणे कठीण बनले आहे.त्याचाच परिणाम म्हणून घरफोडी, विनयभंग व अवैद्य धंद्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे पोलिसांची कुमक वाढवणे गरजेचे आहे.सध्या ४०० नागरिकांमागे १ पोलीस काम करत असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची पळापळ होताना दिसते. पोलीस स्थानकात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेण्यासाठी कमीतकमी २५० ते ३०० पोलिसांची तैनात असणे गरजेचे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात व गुन्ह्यांवर नियत्रंण मिळविण्यात यश येणार आहे.पोलिसांची संख्या ३०० वर गेल्यास ४५० नागरिकांमागे एक पोलीस असे प्रमाण राहणार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर पडणारा ताणही कमी होईल. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणे ही काळाची गरज बनली आहे.सद्यास्थितीत लाखांदुर तालुक्यात अवैद्य दारू विक्री, सट्टा, जुगार, आँनलाईन सट्टा, घरफोडी, दारू पुरवठा यासह विनयभंगांचे प्रमाणही वाढले आहे. यावर नियत्रंण ठेण्यासाठी अधिक पोलिसांची गरज आहे.