शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

लाखांदुरातील ४८ गावांची धुरा ३३ पोलिसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येत असून, सुमारे १ लाख ३६ हजार लोकसंख्या आहे. त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ८४ पोलिस मनुष्यबळ आहे. मात्र सध्या लाखांदुर पोलीसठाण्यामध्ये ३३ पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास ...

ठळक मुद्देकामाचा ताण : लाखांदूर ठाण्यात कर्मचाऱ्यांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येत असून, सुमारे १ लाख ३६ हजार लोकसंख्या आहे. त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ८४ पोलिस मनुष्यबळ आहे. मात्र सध्या लाखांदुर पोलीसठाण्यामध्ये ३३ पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे.या पोलीस स्टेशनला एक पोलीस निरीक्षक, ५ साहाय्यक, उपनिरीक्षक व ७८ पोलीस असा एकून ८४ पोलीसांचे मनुष्यबळ शासन दरबारी आहे. येथील लोकसंख्या पाहता कमीत कमी २५० ते ३०० पोलिसांची गरज आहे. परंतु या ठिकाणी सध्या ४००० नागरिकांमागे एक पोलीस असे समीकरण आहे. तालुक्यात दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे़.वाढत्या शहरीकरणा बरोबरच गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे़. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ वाढणे गरजेचे आहे़.‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेऊन जनतेचे सदैव रक्षण करणा?्या पोलिसांना मात्र या अपुऱ्या मनुष्यबळामुळे डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे़. १ लाख ३६ हजार लोकसंख्या असलेल्या या ४८ गावात पोलिसांची संख्या मात्र ३३ इतकीच आहे़ त्यामुळे याठिकाणी घडणा?्या गुन्ह्यांवर नियत्रंण ठेवणे कठीण बनले आहे.त्याचाच परिणाम म्हणून घरफोडी, विनयभंग व अवैद्य धंद्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे पोलिसांची कुमक वाढवणे गरजेचे आहे.सध्या ४०० नागरिकांमागे १ पोलीस काम करत असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची पळापळ होताना दिसते. पोलीस स्थानकात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेण्यासाठी कमीतकमी २५० ते ३०० पोलिसांची तैनात असणे गरजेचे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात व गुन्ह्यांवर नियत्रंण मिळविण्यात यश येणार आहे.पोलिसांची संख्या ३०० वर गेल्यास ४५० नागरिकांमागे एक पोलीस असे प्रमाण राहणार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर पडणारा ताणही कमी होईल. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणे ही काळाची गरज बनली आहे.सद्यास्थितीत लाखांदुर तालुक्यात अवैद्य दारू विक्री, सट्टा, जुगार, आँनलाईन सट्टा, घरफोडी, दारू पुरवठा यासह विनयभंगांचे प्रमाणही वाढले आहे. यावर नियत्रंण ठेण्यासाठी अधिक पोलिसांची गरज आहे.