शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

४८ गावे शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित

By admin | Updated: June 8, 2014 23:42 IST

नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे हे राज्याचे आद्यकर्तव्य आहे. तुमसर तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार पाणी पुरवठा योजना पाच वर्षापूर्वी तयार केल्या. या योजनेवर सुमारे २0 कोटींचा खर्च

तुमसर  :  नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे हे राज्याचे आद्यकर्तव्य आहे. तुमसर तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार पाणी पुरवठा योजना पाच वर्षापूर्वी तयार केल्या. या योजनेवर सुमारे २0 कोटींचा खर्च झाला. या योजनांमधून ४६ गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार होते. हस्तांतरणाच्या वादात सध्या या योजना अडल्या आहेत. भंगारात जाण्याची स्थिती येथे भेट दिल्यावर दिसून येते. तुमसर तालुक्यातील देव्हाडी, सुकळी (नकुल), गोबरवाही व येरली येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा योजना तयार केल्या. त्या सुमारे पाच वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. जलकुंभ व जलवाहिन्यांची कामे प्रत्येक गावापर्यंत झाली आहेत. त्याच्या चाचण्यासुद्धा जीवन प्राधिकरणाने घेतल्या. चाचण्या सुद्धा यशस्वी झाल्या होत्या.या योजनेत फिल्टर प्लाँटचा समावेश असल्याने नागरिकांना शुद्ध पाणी प्यायला मिळणार होते. देव्हाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत देव्हाडी, मांगली, असारा, हिंगणा, परसवाडा (दे), चारगाव, ढोरवाडा, खरबी, बाम्हणी, स्टेशनटोली, तुडका या अकरा गावांचा समावेश आहे. येरली येथे शिखर समिती तयार करून योजना सुरु आहे. या क्षेत्रातील येरली, डोंगरला, मेहगावा, मोहगाव (खदान), हरदोली (सी), वाहनी, परसवाडा (सि), परसवाडा, कर्कापूर, तामसवाडी (सि.) येथील नऊ गावांचा समावेश आहे. सुकळी (नकुल), येथे आठ गावे यात सुकळी (न), देवरी देव, वारपिंडकेपार, बिनाखी, देवसर्रा, बपेरा, महालगाव, ब्राम्हणटोला या आठ गावे येतात.गोबरवाही परिसरातील सर्वात जास्त २१ गावाकरिता योजना तयार करण्यात आली . यात गोबरवाही, चिचोली, पवनारा, राजापूर, चिखला, सीतासावंगी, नाकाडोंगरी, पाथरी, लोभी, डोंगरी बु., आलेसूर, देवनारा, गर्रा, बघेडा, चिखली, रोंघा, पिटेसूर, लोहारा, पवनारखारी व बाजारटोला यांचा समावेश आहे. यात देव्हाडी येथील योजनेवर सहा कोटी, सुकळी नकुल चार कोटी, गोबरवाही पाच कोटी, येरली पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. येरली येथे जि.प. सदस्य यांच्या पुढाकाराने शिखर समिती तयार करण्यात आली. या समितीतर्फे पाणी पुरवठा करणे सुरु आहे. या योजनेचा तिढा अजून सुटला नाही व पुढे तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. योजना चालवायला पैसा लागतो. कर्मचारी वर्ग, वीज बिलाकरिता पैसा कोण देणार असा प्रश्न येथे पडला आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजना तयार करावी असे ठरले होते. त्या योजना तयार झाल्यानंतर राज्य शासनाने इतर संस्थेला जबाबदारी देण्याची गरज होती. (तालुका प्रतिनिधी)