शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

४२ गावांची मदार २० पोलीसदादांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

यातही दहा पोलीस कर्मचारी ठाण्याच्या रेकॉर्डवर असून काही पोलीस कर्मचारी लोकप्रतिनिधींचे सुरक्षारक्षक म्हणून तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कर्तव्य बजावत आहेत, तर काही खेळ विभागात आहेत. यातच काहींनी निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे अपुºया कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करून कर्तव्य बजावावे लागते.

ठळक मुद्देगुन्हेगारीचा वाढतोय आलेख : कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : स्थानिक पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण ४२ गावे येतात. पवनी, शिरूड, धोत्रा, एकुर्ली, कानगाव, अलमडोह, येरणवाडी, टाकळी, नांदगाव, भगवा व अन्य गावांचा समावेश आहे. ठाण्याकरिता तीस कर्मचारी मंजूर असताना केवळ वीस पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.यातही दहा पोलीस कर्मचारी ठाण्याच्या रेकॉर्डवर असून काही पोलीस कर्मचारी लोकप्रतिनिधींचे सुरक्षारक्षक म्हणून तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कर्तव्य बजावत आहेत, तर काही खेळ विभागात आहेत. यातच काहींनी निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे अपुºया कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करून कर्तव्य बजावावे लागते. कामाच्या ताणामुळे त्यांची प्रचंड दमछाक होत असून याचाच परिणाम गावासह परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. महिला, तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अल्लीपूर पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण तीन बीट आहेत. तळेगाव, कानगाव, अल्लीपूर ही मोठी गावे असून जमादारांना त्या-त्या बीटची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तीन गावांकरिता केवळ सहा पोलीस कर्मचारी आहेत.गावासह परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढ आहे. मात्र, अपुºया असलेल्या कर्मचाºयांना याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. रात्रीच्या वेळी केवळ एक ते दोन कर्मचारी गस्तीवर असतात. मोठी घटना घडली तर परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे या कर्मचाºयांना शक्य नाही. याकरिता ठाण्यात पुरेसा कर्मचारीवर्ग गरजेचा आहे. अल्लीपूर हिंगणघाट तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असुन संवेदनशील म्हणून या गावाची पोलीस विभागात नोंद आहे. याकरिता येथे पुरेसे पोलीस कर्मचारी देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.कामाच्या ताणामुळे कौटुंबिक सोहळ्यातही अनुपस्थितीकायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. याकरिता हा विभाग मनुष्यबळाने परिपूर्ण असे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठाण्यात अपुरा पोलीस कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येतो. यामुळे पोलिसांना कौटुंबिक सोहळ्यातही सहभागी होता येत नाही. पुरेसा पोलीस कर्मचारी वर्ग देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.अल्लीपूर आणि परिसराची लोकसंख्या मोठी आहे. मात्र, ठाण्यात अपुरा कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो. वरिष्ठांना याबाबत कळविले असून पोलीस कर्मचाºयांची मागणी केली आहे.- योगेश कामाले, ठाणेदार अल्लीपूर

टॅग्स :Policeपोलिस