शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

३७१ गावे दुष्काळग्रस्त!

By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST

किडींचा प्रादुर्भाव आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे यावर्षी धान उत्पादनात कमालिची घट झाली.

अंतिम पैसेवारी ८४६ गावांची पैसेवारी ५४ पैसेदेवानंद नंदेश्वर भंडाराकिडींचा प्रादुर्भाव आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे यावर्षी धान उत्पादनात कमालिची घट झाली. असे असतानाही खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५४ पैसे घोषित झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे संपुष्ठात आली आहेत. या पैसेवारीत साकोली, लाखांदूर, लाखनी तालुका दुष्काळी यादीत आला असून भंडारा, पवनी, तुमसर व मोहाडी तालुक्यातील ४७५ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ६३ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली होती. त्याची टक्केवारी ९८.७५ टक्के एवढी आहे. धानपिकाची ९७.६९ टक्के म्हणजे १ लाख ७७ हजार ८६६ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली. खरीप हंगामात धानाचे उत्पादन कमालिचे घटल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले. कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या अंतिम पैसेवारीत ४७५ गावातील पीक स्थिती उत्तम दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा प्रशासनाने ८४६ गावांची अंतिम पैसेवारी ५४ पैसे दर्शविली आहे. यातील पवनी तालुका वगळता सहाही तालुक्यातील ३७१ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ४७५ गावात ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. याविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्य शासनाला केंद्राने दुष्काळी निधी दिला असतानाही त्यापासून शेतकऱ्यांना डावलण्यात येत आहे.४४ गावे पैसेवारीतून बादभंडारा जिल्ह्यात एकूण ८९० गावे आहेत. यात ८७६ गावे खरीप तर १४ गावे रबीची आहेत. ३० गावांत खरीप पिकाची लागवड करण्यात आली नाही. भंडारा तालुक्यातील १७, पवनी २, तुमसर ७, साकोली व लाखनी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. ही ३० गावे पिके नसलेली आहेत. पवनी तालुक्यातील १४ गावे रब्बी पिकाची आहेत. त्यामुळे त्या ४४ गावांची पैसेवारी जाहिर करण्यात आली नाही. ८९० गावांपैकी ८४६ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. ८४६ गावांच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात ४७५ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यावर्षी धान उत्पादक शेतकरी संकटात असतानाही जिल्हा प्रशासनाने अंतिम पैसेवारी ५४ पैसे दाखवून अन्याय केला, असा शेतकऱ्यांकडून आरोप होत आहे़जिल्हा प्रशासनाने काढलेली पैसेवारी चुकीची असून त्याला आपला विरोध आहे. भंडारा व पवनी तालुका दुष्काळग्रस्त असून प्रशासनाने पध्दतशीरपणे दोन्ही तालुक्याला दुष्काळ यादीतून डावलले आहे. यासंबधी जिल्हाधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची राज्य शासनाकडे तक्रार करणार आहे.- अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आमदार, भंडारा कृषी अधिकारी व महसूल विभागाने सत्य परिस्थितीचे सर्व्हेक्षण केले आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात दुष्काळी स्थिती होती. जिल्ह्याची पैसेवारी ५४ पैसे असले तरी अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारीत निकषाप्रमाणे अनुदानासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.- राजेश काशिवार, आमदार, साकोलीशासनाच्या सुधारीत निकषाप्रमाणे खरीप पिकांची अंतिम पैसवारी काढण्यात आली. ३७१ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ४७५ गावात ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी आहे. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून दुष्काळग्रस्त गावांसंदर्भात शासनस्तरावर निर्णय घेतला जाणार आहे.- सुजाता गंधे, उपजिल्हाधिकारी(महसूल), भंडारा.