शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

362 ग्रामपंचायती प्रशासकांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 21:07 IST

सप्टेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माेर्चेबांधणी सुरू झाली हाेती. माेठ्या ग्रामपंचायतीत रणधुमाळी दिसायला लागली हाेती. थेट सरपंच निवडला जाणार असल्याने गावात पॅनेल तयार करून सरपंचपदाच्या उमेदवारांची अनेक गावांत घाेषणाही करण्यात आली हाेती. निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात झाली होती. मात्र, ग्रामविकास विभागाच्या आदेशाने सर्व मेहनतीवर पाणी फेरले आणि आता प्रशासकाची नियुक्ती होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नाेव्हेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ५४० ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३६२ ग्रामपंचायती आठवड्याभरात प्रशासकांच्या ताब्यात जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून प्रशासक नियुक्तीची धडपड सुरू असून, प्रशासक काळात ग्रामविकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आदेश काढून ऑक्टाेबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले हाेते. भंडारा जिल्ह्यातील ५४० ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३६२ ग्रामपंचायतींची मुदत ९ ते १६ नाेव्हेंबर या कालावधीत संपणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर आता प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. सप्टेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माेर्चेबांधणी सुरू झाली हाेती. माेठ्या ग्रामपंचायतीत रणधुमाळी दिसायला लागली हाेती. थेट सरपंच निवडला जाणार असल्याने गावात पॅनेल तयार करून सरपंचपदाच्या उमेदवारांची अनेक गावांत घाेषणाही करण्यात आली हाेती. निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात झाली होती. मात्र, ग्रामविकास विभागाच्या आदेशाने सर्व मेहनतीवर पाणी फेरले आणि आता प्रशासकाची नियुक्ती होत आहे.जिल्ह्यात प्रशासक नियुक्त हाेणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक तुमसर तालुक्यातील ७७, माेहाडी ५८, भंडारा ३९, पवनी ४५, साकाेली ४१, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील प्रत्येकी ५१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने प्रशासक निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, प्रशासक निवडीचे दिव्य पार पाडावे लागणार आहे. जिल्ह्यात पंचायत विभागात अनेक पदे रिक्त आहेत. एकाएका ग्रामविकास अधिकाऱ्याकडे दाेन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार आहे. त्यामुळे ३६२ ग्रामपंचायतींवर प्रशासक निवडताना प्रशासनाची दमछाक हाेणार आहे. विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी यांच्यासह मुख्याध्यापकांचीही प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती गेल्यानंतर गावाचा विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. पंधराव्या वित्त आयाेगातील निधी खर्च करण्याचे अधिकार प्रशासकाच्या हातात येणार आहे. त्यामुळे हा निधी याेग्य प्रमाणात आणि याेग्य कामावर खर्च हाेणार की नाही, याची शंकाही आहे. 

किती दिवस राहणार प्रशासकाची सत्ता - मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अद्याप काेणतीही घाेषणा झाली नाही. त्यामुळे पुढील किती दिवस प्रशासकाची सत्ता ग्रामपंचायतीवर राहणार हे मात्र सांगणे कठीण आहे. प्रशासक नियुक्त झाले तरी थेट सरपंचाची निवड हाेणार असल्याने अनेक गावांत आजही माेर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र दिसून येते.

२०१७ मध्ये झाली हाेती ग्रामपंचायत निवडणूक - जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७ मध्ये झाली हाेती. ग्रामसभेच्या प्रथम तारखेपासून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ माेजला जाताे. नाेव्हेंबर २०१७ मध्ये ९ ते १६ नाेव्हेंबरपर्यंत प्रथम ग्रामसभा पार पडल्या हाेत्या. आता त्याच तारखेनुसार ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहे.- गावातील प्रस्थापितांकडून सत्ता खेचून आणण्यासाठी तरुणांनी नवीन समीकरणे ऑगस्ट महिन्यापासून आखणे सुरु केले हाेते. मात्र निवडणुकांऐवजी प्रशासक नियुक्तीचे आदेश आले आणि सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले. आता निवडणूक कधी हाेणार याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे. ताेपर्यंत अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत