शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३४ टक्के पेयजलस्रोत दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:40 IST

आजाराचे मूळ कारण म्हणजे दूषित पाणी होय. दूषित पाणी प्राशनाने विविध आजार होतात. यातून नागरिकांना आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील ३४ टक्के पेयजलाचे नमूने तपासणीनंतर दूषित असल्याचे आढळून आले. त्यात लाखनी, तुमसर, भंडारा, साकोली आणि पवनी तालुक्यातील सर्वाधिक दूषित पाणी असल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणातील वास्तव : पाच तालुक्यात सर्वाधिक दूषित पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजाराचे मूळ कारण म्हणजे दूषित पाणी होय. दूषित पाणी प्राशनाने विविध आजार होतात. यातून नागरिकांना आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील ३४ टक्के पेयजलाचे नमूने तपासणीनंतर दूषित असल्याचे आढळून आले. त्यात लाखनी, तुमसर, भंडारा, साकोली आणि पवनी तालुक्यातील सर्वाधिक दूषित पाणी असल्याचे पुढे आले आहे.जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणी आणि स्वच्छता मिशनच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सात तहसीलमधील पिण्याच्या पाण्याचे नमूने गत जुलै ते डिसेंबर या महिन्यात तपासण्यात आले. जिल्ह्यातील ५४३ ग्रामपंचायतमधील ६ हजार ३९४ पेयजलाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात १ हजार ९०७ नमुने दूषित आढळून आले. त्याची टक्केवारी ३४.९५ आहे. पेयजलाचे नमुने दूषित आल्यानंतरही प्रशासनाच्या वतीने त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने तेच पाणी प्यावे लागत आहे. यातून जलजन्य आजारासह विविध आजार निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील सात तालुक्यातील ६ हजार ३९४ नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यात वेगवेगळ्या प्रमाणात दूषित पाणी आढळून आले. भंडारा तालुक्यात एकुण पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत ८९३ असून त्यापैकी ८५० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४४७ म्हणजे ४१.०५ टक्के नमुने दूषित आढळले. साकोली तालुक्यातील १२३८ नमुन्यांपैकी ४४२ म्हणजे ३४.०५ टक्के, लाखनी ४०० पैकी ३६१ म्हणजे ७५.२५ टक्के, तुमसर १०३१ पैकी ४३५ म्हणजे ४४.५७, मोहाडी तालुक्यातील ८०० पैकी १५३ म्हणजे १९.१८ टक्के, लाखांदूर तालुक्यातील ५४१ पैकी ४३ म्हणजे ७.९५ टक्के आणि पवनी तालुक्यातील ७७६ पैकी १९७ म्हणजे २५.३८ टक्के जलस्त्रोत दूषित आढळून आले. दूषित आढळलेल्या जलस्त्रोताबाबत जिल्हा परिषदेने दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज असते. परंतु अद्यापपर्यंत या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.ग्रामपंचायतीने जागरुक असणे गरजेचेअशुद्ध पाण्याच्या संदर्भात ग्रामपंचायतींनीच जागरुक असणे गरजेचे आहे. कारण ग्रामीण आरोग्य आणि पाणी पुरवठा समितीवर शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी असते. पाणी दूषित आढळल्यावर त्याचे शुद्धीकरण करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी सभा घेणे गरजेचे आहे. कमीत कमी तीन महिन्यात एकदा सभा होणे गरजेचे आहे. परंतु ग्रामीण भागात या संदर्भातील सभा होत नसल्याने ही समस्या कायम आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची खरी गरज आहे असे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे पाणी गुणवत्ता तज्ज्ञ प्रशांत मडामे यांनी सांगितले.भंडारा शहरातही दूषित पाणीभंडारा शहराला वैनगंगा नदीच्या पाण्याचा पुरवठा होते. सध्या वैनगंगा नदीच्या पाण्यात नागपूर येथून वाहणाऱ्या नाग नदीचे दूषित पाणी सोडले जात आहे. यामुळे पाण्याचा रंग बदलल्याचे भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत दिसून येते. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला सूचना दिली. जलशुद्धीकरण केंद्रातही पुरेसे पाणी शुद्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्राशन करावे लागते. यातून भंडारा शहरातही जलजन्य आजार पसरण्याची भीती आहे.वर्षातून दोनदा पाणी तपासणीजिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्ह्यात वर्षभरातून दोनदा पाण्याची तपासणी केली जाते. पावसाळा आणि उन्हाळ्याच्या काळात ही तपासणी होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पाण्याचे नमुने गोळा केले जातात. ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. त्यावरून आलेल्या अहवालानुसार कारवाई करणे अपेक्षित असते. परंतु भंडारा जिल्ह्यात दूषित पाण्याच्या संदर्भात पाहिजे तशी काळजी घेतली जात नाही. प्रशासन ग्रामपंचायतींना वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायती पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीसाठी शुद्ध पेयजलाच्या विविध योजना असताना त्याचा फायदाही घेतला जात नाही.