संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगेचे विशाल पात्र लाभलेल्या भंडारा शहरात दररोज किमान तीन लाख ३० हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम, जीर्ण झालेली पाईपलाईन, सार्वजनिक नळाला तोट्या नसणे आणि अवैध नळ जोडण्यांमुळे पाण्याचा अपव्यय होतो. यातून नगरपरिषदेचे लाखो रूपयांचे नुकसान होत असून सर्वसामान्यांना दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होतो.भंडारा शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. वैनगंगा नदीच्या तीरावर जलशुद्धीकरण केंद्र आहे. तेथून शहरातील विविध भागातील टाक्यांमध्ये पाणी सोडून नागरिकांना पाणी वितरित केले जाते. भंडारा शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ९१ हजार ८४५ आहे. नगरपरिषदेने शहरातील १३ हजार २१० नागरिकांना नळ जोडण्यात दिल्या आहे. यावरून नागरिकांची तहाण भागविली जाते. तर शहरातील १२५ ठिकाणी सार्वजनिक नळ उभारण्यात आले आहे. नळासाठी एकही अर्ज सध्या नगरपरिषदेत प्रलंबित नाही.शहराला दररोज किमान ४५ लाख लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यातील साधारणत: १५ टक्के पाण्याची गळती होते. त्यात सर्वाधिक गळती पाईपलाईन फुटल्याने होते. भंडारा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र ही योजना कार्यान्वीत झाली नसल्याने नागरिकांना जुन्याच पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो. शहरात पाणी टंचाईची समस्या नसली तरी दूषीत पाण्याची समस्या मात्र भीषण आहे. यासाठी नगरपरिषदेचे शहरात १८ ठिकाणी आॅरो प्लाँट उभारले आहे. परंतु त्याचा पुरेसा उपयोगच नागरिक घेत नाही.पाणी पुरवठ्याची यंत्रणा हाताळण्यासाठी नगरपरिषदेचे दरवर्षी एक कोटी ४४ लाख ६५ हजार रूपये खर्च येतो. तर वीज बिलावर ८४ लाख २५ हजार रूपयांचा खर्च होतो. पाईपलाईन दुरूस्ती व इतर कामांसाठी ६० लाख ४० हजार रूपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभाग पाणी कर, आणि पाणी बिल वसुलीसाठी पुरेसे प्रयत्न करीत असले तरी नळधारक त्याला प्रतिसाद देत नाही. सध्या नळधारकांकडे ३५ लाख सात लाख ५०४ रूपयांचे बिल थकीत आहे. नगरपरिषदेने यासाठी मोहीम राबवून वसुली सुरु केली आहे.शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र येत्या काही दिवसातच पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. लवकरच शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होईल.- प्रवीण गणवीर, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग.शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा सुरळीत आहे. दीर्घकालीन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. शहराच्या विविध भागात सार्वजनिक नळ, हातपंपाची संख्या अधिक असल्याने पाण्याची समस्या जाणवत नाही. मात्र नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे.- ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, भंडारा.
दर दिवसाला ३.३० लाख लीटर पाणी गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST
वैनगंगेचे विशाल पात्र लाभलेल्या भंडारा शहरात दररोज किमान तीन लाख ३० हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम, जीर्ण झालेली पाईपलाईन, सार्वजनिक नळाला तोट्या नसणे आणि अवैध नळ जोडण्यांमुळे पाण्याचा अपव्यय होतो.
दर दिवसाला ३.३० लाख लीटर पाणी गळती
ठळक मुद्देनळधारकांकडे ३५ लाख थकीत : भंडारात नळधारकांची संख्या १३ हजारावर, भंडारा दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा