शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

दर दिवसाला ३.३० लाख लीटर पाणी गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

वैनगंगेचे विशाल पात्र लाभलेल्या भंडारा शहरात दररोज किमान तीन लाख ३० हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम, जीर्ण झालेली पाईपलाईन, सार्वजनिक नळाला तोट्या नसणे आणि अवैध नळ जोडण्यांमुळे पाण्याचा अपव्यय होतो.

ठळक मुद्देनळधारकांकडे ३५ लाख थकीत : भंडारात नळधारकांची संख्या १३ हजारावर, भंडारा दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगेचे विशाल पात्र लाभलेल्या भंडारा शहरात दररोज किमान तीन लाख ३० हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम, जीर्ण झालेली पाईपलाईन, सार्वजनिक नळाला तोट्या नसणे आणि अवैध नळ जोडण्यांमुळे पाण्याचा अपव्यय होतो. यातून नगरपरिषदेचे लाखो रूपयांचे नुकसान होत असून सर्वसामान्यांना दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होतो.भंडारा शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. वैनगंगा नदीच्या तीरावर जलशुद्धीकरण केंद्र आहे. तेथून शहरातील विविध भागातील टाक्यांमध्ये पाणी सोडून नागरिकांना पाणी वितरित केले जाते. भंडारा शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ९१ हजार ८४५ आहे. नगरपरिषदेने शहरातील १३ हजार २१० नागरिकांना नळ जोडण्यात दिल्या आहे. यावरून नागरिकांची तहाण भागविली जाते. तर शहरातील १२५ ठिकाणी सार्वजनिक नळ उभारण्यात आले आहे. नळासाठी एकही अर्ज सध्या नगरपरिषदेत प्रलंबित नाही.शहराला दररोज किमान ४५ लाख लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यातील साधारणत: १५ टक्के पाण्याची गळती होते. त्यात सर्वाधिक गळती पाईपलाईन फुटल्याने होते. भंडारा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र ही योजना कार्यान्वीत झाली नसल्याने नागरिकांना जुन्याच पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो. शहरात पाणी टंचाईची समस्या नसली तरी दूषीत पाण्याची समस्या मात्र भीषण आहे. यासाठी नगरपरिषदेचे शहरात १८ ठिकाणी आॅरो प्लाँट उभारले आहे. परंतु त्याचा पुरेसा उपयोगच नागरिक घेत नाही.पाणी पुरवठ्याची यंत्रणा हाताळण्यासाठी नगरपरिषदेचे दरवर्षी एक कोटी ४४ लाख ६५ हजार रूपये खर्च येतो. तर वीज बिलावर ८४ लाख २५ हजार रूपयांचा खर्च होतो. पाईपलाईन दुरूस्ती व इतर कामांसाठी ६० लाख ४० हजार रूपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभाग पाणी कर, आणि पाणी बिल वसुलीसाठी पुरेसे प्रयत्न करीत असले तरी नळधारक त्याला प्रतिसाद देत नाही. सध्या नळधारकांकडे ३५ लाख सात लाख ५०४ रूपयांचे बिल थकीत आहे. नगरपरिषदेने यासाठी मोहीम राबवून वसुली सुरु केली आहे.शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र येत्या काही दिवसातच पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. लवकरच शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होईल.- प्रवीण गणवीर, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग.शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा सुरळीत आहे. दीर्घकालीन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. शहराच्या विविध भागात सार्वजनिक नळ, हातपंपाची संख्या अधिक असल्याने पाण्याची समस्या जाणवत नाही. मात्र नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे.- ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, भंडारा.

टॅग्स :water shortageपाणीकपात