शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Winner : ...अन् 'अनसोल्ड'चा टॅग लागलेल्या रजतच्या कॅप्टन्सीत RCB नं साधली 'सुवर्ण' संधी
2
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
3
१२ कोटी ५० लाख रुपयांच्या 'त्या' डीलसह RCB ची ट्रॉफी झाली फिक्स? जाणून घ्या 'चॅम्पियन'वाली स्टोरी
4
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
5
IPL 2025: आता मी लहान मुलाप्रमाणे झोप घेईन... पहिली IPL ट्रॉफी अन् 'विराट' सुख
6
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
7
IPL 2025 : ऑरेंज-पर्पल कॅप GT कडे! MI च्या ताफ्यातील सूर्यालाही मिळाला मोठा पुरस्कार, इथं पाहा संपूर्ण यादी
8
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
9
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
10
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
11
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
12
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
13
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
14
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
16
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
17
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
18
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
19
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
20
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण

दर दिवसाला ३.३० लाख लीटर पाणी गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

वैनगंगेचे विशाल पात्र लाभलेल्या भंडारा शहरात दररोज किमान तीन लाख ३० हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम, जीर्ण झालेली पाईपलाईन, सार्वजनिक नळाला तोट्या नसणे आणि अवैध नळ जोडण्यांमुळे पाण्याचा अपव्यय होतो.

ठळक मुद्देनळधारकांकडे ३५ लाख थकीत : भंडारात नळधारकांची संख्या १३ हजारावर, भंडारा दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगेचे विशाल पात्र लाभलेल्या भंडारा शहरात दररोज किमान तीन लाख ३० हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम, जीर्ण झालेली पाईपलाईन, सार्वजनिक नळाला तोट्या नसणे आणि अवैध नळ जोडण्यांमुळे पाण्याचा अपव्यय होतो. यातून नगरपरिषदेचे लाखो रूपयांचे नुकसान होत असून सर्वसामान्यांना दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होतो.भंडारा शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. वैनगंगा नदीच्या तीरावर जलशुद्धीकरण केंद्र आहे. तेथून शहरातील विविध भागातील टाक्यांमध्ये पाणी सोडून नागरिकांना पाणी वितरित केले जाते. भंडारा शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ९१ हजार ८४५ आहे. नगरपरिषदेने शहरातील १३ हजार २१० नागरिकांना नळ जोडण्यात दिल्या आहे. यावरून नागरिकांची तहाण भागविली जाते. तर शहरातील १२५ ठिकाणी सार्वजनिक नळ उभारण्यात आले आहे. नळासाठी एकही अर्ज सध्या नगरपरिषदेत प्रलंबित नाही.शहराला दररोज किमान ४५ लाख लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यातील साधारणत: १५ टक्के पाण्याची गळती होते. त्यात सर्वाधिक गळती पाईपलाईन फुटल्याने होते. भंडारा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र ही योजना कार्यान्वीत झाली नसल्याने नागरिकांना जुन्याच पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो. शहरात पाणी टंचाईची समस्या नसली तरी दूषीत पाण्याची समस्या मात्र भीषण आहे. यासाठी नगरपरिषदेचे शहरात १८ ठिकाणी आॅरो प्लाँट उभारले आहे. परंतु त्याचा पुरेसा उपयोगच नागरिक घेत नाही.पाणी पुरवठ्याची यंत्रणा हाताळण्यासाठी नगरपरिषदेचे दरवर्षी एक कोटी ४४ लाख ६५ हजार रूपये खर्च येतो. तर वीज बिलावर ८४ लाख २५ हजार रूपयांचा खर्च होतो. पाईपलाईन दुरूस्ती व इतर कामांसाठी ६० लाख ४० हजार रूपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभाग पाणी कर, आणि पाणी बिल वसुलीसाठी पुरेसे प्रयत्न करीत असले तरी नळधारक त्याला प्रतिसाद देत नाही. सध्या नळधारकांकडे ३५ लाख सात लाख ५०४ रूपयांचे बिल थकीत आहे. नगरपरिषदेने यासाठी मोहीम राबवून वसुली सुरु केली आहे.शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र येत्या काही दिवसातच पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. लवकरच शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होईल.- प्रवीण गणवीर, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग.शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा सुरळीत आहे. दीर्घकालीन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. शहराच्या विविध भागात सार्वजनिक नळ, हातपंपाची संख्या अधिक असल्याने पाण्याची समस्या जाणवत नाही. मात्र नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे.- ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, भंडारा.

टॅग्स :water shortageपाणीकपात