शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लाखांदूर तालुक्यातील 33 गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 05:00 IST

स्थानिक लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज कंपनीअंतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील १०३ पथदिव्यांच्या कनेक्शनअंतर्गत एप्रिल २०२१ पासून ते एप्रिल २०२२ पर्यंत एकूण ९ लाख ८६ हजार रुपयाचा वीजबिल नियमित वीजबिलाअंतर्गत थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दयाल भोवतेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : नियमित वीजबिलासह मागील काही महिन्यांपासून थकीत वीजबिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करीत लाखांदूर तालुक्यातील ३३ गावांतील पथदिव्यांची व २ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ३३ गावात अंधार पसरला असून दोन गावांत पिण्याच्या पाण्याचे जलसंकट निर्माण झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.स्थानिक लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज कंपनीअंतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील १०३ पथदिव्यांच्या कनेक्शनअंतर्गत एप्रिल २०२१ पासून ते एप्रिल २०२२ पर्यंत एकूण ९ लाख ८६ हजार रुपयाचा वीजबिल नियमित वीजबिलाअंतर्गत थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, ग्रामपंचायतअंतर्गत सदर वीजबिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत तब्बल ३३ ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या संख्येत येत्या काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण १०३ पथदिव्यांची कनेक्शनअंतर्गत थकीतदार ग्रामपंचायत क्षेत्रातील बहुतांश वीजपुरवठा खंडित केले जाण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे.तथापि, पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील ३३ गावांत रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील विविध क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने जमिनीतून विषारी जीवजंतू जमिनीबाहेर निघण्यास सुरुवात झाली असल्याची चर्चा आहे. या स्थितीत रात्रीच्या सुमारास पथदिव्यांच्या अभावात रस्त्यावर अनेक जीवजंतू निघण्याची संभाव्यता घेऊन नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

पाण्याची समस्या कायम- लाखांदूर तालुक्यातील पाउळदवणा व मडेघाट ग्रामपंचायतीअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीजबिलाचा भरणा न करण्यात आल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सदरचा वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या स्थितीत स्थानिक नागरिकांना बोरवेल, खासगी तथा सार्वजनिक विहिरीतून पिण्याचे पाणी उपलब्ध करावे लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेत वीज कंपनीअंतर्गत थकीत वीजबिलाचा भरणा घेऊन केल्या जात असलेल्या कारवाईला थांबविण्याहेतू आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.

 

टॅग्स :electricityवीजWaterपाणी