शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

लाखांदूर तालुक्यातील 33 गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 05:00 IST

स्थानिक लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज कंपनीअंतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील १०३ पथदिव्यांच्या कनेक्शनअंतर्गत एप्रिल २०२१ पासून ते एप्रिल २०२२ पर्यंत एकूण ९ लाख ८६ हजार रुपयाचा वीजबिल नियमित वीजबिलाअंतर्गत थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दयाल भोवतेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : नियमित वीजबिलासह मागील काही महिन्यांपासून थकीत वीजबिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करीत लाखांदूर तालुक्यातील ३३ गावांतील पथदिव्यांची व २ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ३३ गावात अंधार पसरला असून दोन गावांत पिण्याच्या पाण्याचे जलसंकट निर्माण झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.स्थानिक लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज कंपनीअंतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील १०३ पथदिव्यांच्या कनेक्शनअंतर्गत एप्रिल २०२१ पासून ते एप्रिल २०२२ पर्यंत एकूण ९ लाख ८६ हजार रुपयाचा वीजबिल नियमित वीजबिलाअंतर्गत थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, ग्रामपंचायतअंतर्गत सदर वीजबिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत तब्बल ३३ ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या संख्येत येत्या काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण १०३ पथदिव्यांची कनेक्शनअंतर्गत थकीतदार ग्रामपंचायत क्षेत्रातील बहुतांश वीजपुरवठा खंडित केले जाण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे.तथापि, पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील ३३ गावांत रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील विविध क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने जमिनीतून विषारी जीवजंतू जमिनीबाहेर निघण्यास सुरुवात झाली असल्याची चर्चा आहे. या स्थितीत रात्रीच्या सुमारास पथदिव्यांच्या अभावात रस्त्यावर अनेक जीवजंतू निघण्याची संभाव्यता घेऊन नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

पाण्याची समस्या कायम- लाखांदूर तालुक्यातील पाउळदवणा व मडेघाट ग्रामपंचायतीअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीजबिलाचा भरणा न करण्यात आल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सदरचा वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या स्थितीत स्थानिक नागरिकांना बोरवेल, खासगी तथा सार्वजनिक विहिरीतून पिण्याचे पाणी उपलब्ध करावे लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेत वीज कंपनीअंतर्गत थकीत वीजबिलाचा भरणा घेऊन केल्या जात असलेल्या कारवाईला थांबविण्याहेतू आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.

 

टॅग्स :electricityवीजWaterपाणी