शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यातील 33 गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 05:00 IST

स्थानिक लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज कंपनीअंतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील १०३ पथदिव्यांच्या कनेक्शनअंतर्गत एप्रिल २०२१ पासून ते एप्रिल २०२२ पर्यंत एकूण ९ लाख ८६ हजार रुपयाचा वीजबिल नियमित वीजबिलाअंतर्गत थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दयाल भोवतेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : नियमित वीजबिलासह मागील काही महिन्यांपासून थकीत वीजबिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करीत लाखांदूर तालुक्यातील ३३ गावांतील पथदिव्यांची व २ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ३३ गावात अंधार पसरला असून दोन गावांत पिण्याच्या पाण्याचे जलसंकट निर्माण झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.स्थानिक लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज कंपनीअंतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील १०३ पथदिव्यांच्या कनेक्शनअंतर्गत एप्रिल २०२१ पासून ते एप्रिल २०२२ पर्यंत एकूण ९ लाख ८६ हजार रुपयाचा वीजबिल नियमित वीजबिलाअंतर्गत थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, ग्रामपंचायतअंतर्गत सदर वीजबिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत तब्बल ३३ ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या संख्येत येत्या काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण १०३ पथदिव्यांची कनेक्शनअंतर्गत थकीतदार ग्रामपंचायत क्षेत्रातील बहुतांश वीजपुरवठा खंडित केले जाण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे.तथापि, पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील ३३ गावांत रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील विविध क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने जमिनीतून विषारी जीवजंतू जमिनीबाहेर निघण्यास सुरुवात झाली असल्याची चर्चा आहे. या स्थितीत रात्रीच्या सुमारास पथदिव्यांच्या अभावात रस्त्यावर अनेक जीवजंतू निघण्याची संभाव्यता घेऊन नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

पाण्याची समस्या कायम- लाखांदूर तालुक्यातील पाउळदवणा व मडेघाट ग्रामपंचायतीअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीजबिलाचा भरणा न करण्यात आल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सदरचा वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या स्थितीत स्थानिक नागरिकांना बोरवेल, खासगी तथा सार्वजनिक विहिरीतून पिण्याचे पाणी उपलब्ध करावे लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेत वीज कंपनीअंतर्गत थकीत वीजबिलाचा भरणा घेऊन केल्या जात असलेल्या कारवाईला थांबविण्याहेतू आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.

 

टॅग्स :electricityवीजWaterपाणी