शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मुक्त वसाहत योजनेचा ३ कोटींचा निधी गेला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:37 IST

प्रशासनावर नाराजी : भटक्या, विमुक्त समाजाचे घरकूल अधांतरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत भटक्या व विमुक्त समाजाच्या कुटुंबांसाठी असलेल्या घरकूल योजनेकरिता आलेला ३ कोटी रुपयांचा संबंधित निधी वेळेवर न वापरल्याने परत गेला. यासंदर्भात ढिवर समाज संघटनेने समाजकल्याण सहायक आयुक्त सचिन मडावी यांना निवेदन देत, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना भटक्या व विमुक्त समाजातील नागरिकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केली. भंडारा जिल्ह्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी ढिवर समाज संघटनेने संघर्ष केला. सततच्या आंदोलनामुळे ४ हजार घरकुलांना मंजुरी मिळवण्यात यश आले. मात्र, ३० कोटींच्यावर निधी शासनाकडे प्रलंबित आहे. त्यानंतर, या योजनेसाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला.

संघटनेद्वारे गृहनिर्माण तथा इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन निधी मिळवण्याचा आग्रह करण्यात आला. त्यांच्या आश्वासनानुसार, ३१ मार्चपर्यंत ३ कोटी रुपयांचा निधी बीडीएस प्रणालीद्वारे देण्यात आला. पण, सामाजिक न्याय विभागाद्वारे ३१ मार्चपर्यंत निधी वितरीत न केल्यामुळे संबंधित निधी शासनाकडे परत गेला. हलगर्जीपणामुळे या योजनेंतर्गत अनेक भटक्या कुटुंबांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

आंदोलनाची तयारीदोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य कारवाई करावी. घरकुलांसाठी निधीचे वाटप तातडीने करावे. अन्यथा, संघटना तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल, असा इशारा करचखेडा सरपंच व जिल्हा संघटक सुभाष उके, मार्गदर्शक डॉ. अविनाश नान्हे, जिल्हा संघटक प्रवीण मडामे, संघटक रवी उके, पंकज राऊत यांनी दिला आहे.

निधीच्या प्रतीक्षेत ससेहोलपटयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत पहिल्या ५ वर्षामध्ये एकही लाभार्थी नव्हता. मात्र, ढीवर समाज संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळे घरकुलांची प्रशासकीय मान्यता मिळवण्यात आली. परंतु, गत दीड वर्षांपासून मंजूर घरकुलांसाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे हजारो भटक्या कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. नदीकाठच्या गरीब भटक्या व विमुक्त समाजातील लोकांनी आपली मातीची कौलांची घरे तोडून नवीन घर उभारण्याचे काम सुरू केले आहे. पण, निधीच्या प्रतीक्षेत ही घरे अपूर्ण आहेत.

चौकशीची मागणीघरकुल योजनेसाठी आलेला ३ कोटींचा निधी परत गेल्याप्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी ढिवर समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे

"मुक्त वसाहत योजनेच्या घरकुलासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीकरिता जोमाने प्रयत्न केले जातील. तसेच ३ कोटींचा निधी परत गेल्यासंदर्भात योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल."- सचिन मडावी, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग

"यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून ४ हजारांवर घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली. मात्र, शासनाकडे ३० कोटीपेक्षा अधिक निधी प्रलंबित आहे. त्यातच मार्च महिन्यात ३ कोटींचा निधी वेळेवर न वापरल्याने परत गेला ही शोकांतिका आहे. घरकुलांचे बांधकाम अपूर्ण स्थितीत असून, भटक्या समाजाला स्थैर्य मिळवण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे."- सुरेश खंगार, अशासकीय सदस्य मुक्त वसाहत योजना

टॅग्स :bhandara-acभंडारा