शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त वसाहत योजनेचा ३ कोटींचा निधी गेला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:37 IST

प्रशासनावर नाराजी : भटक्या, विमुक्त समाजाचे घरकूल अधांतरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत भटक्या व विमुक्त समाजाच्या कुटुंबांसाठी असलेल्या घरकूल योजनेकरिता आलेला ३ कोटी रुपयांचा संबंधित निधी वेळेवर न वापरल्याने परत गेला. यासंदर्भात ढिवर समाज संघटनेने समाजकल्याण सहायक आयुक्त सचिन मडावी यांना निवेदन देत, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना भटक्या व विमुक्त समाजातील नागरिकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केली. भंडारा जिल्ह्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी ढिवर समाज संघटनेने संघर्ष केला. सततच्या आंदोलनामुळे ४ हजार घरकुलांना मंजुरी मिळवण्यात यश आले. मात्र, ३० कोटींच्यावर निधी शासनाकडे प्रलंबित आहे. त्यानंतर, या योजनेसाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला.

संघटनेद्वारे गृहनिर्माण तथा इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन निधी मिळवण्याचा आग्रह करण्यात आला. त्यांच्या आश्वासनानुसार, ३१ मार्चपर्यंत ३ कोटी रुपयांचा निधी बीडीएस प्रणालीद्वारे देण्यात आला. पण, सामाजिक न्याय विभागाद्वारे ३१ मार्चपर्यंत निधी वितरीत न केल्यामुळे संबंधित निधी शासनाकडे परत गेला. हलगर्जीपणामुळे या योजनेंतर्गत अनेक भटक्या कुटुंबांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

आंदोलनाची तयारीदोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य कारवाई करावी. घरकुलांसाठी निधीचे वाटप तातडीने करावे. अन्यथा, संघटना तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल, असा इशारा करचखेडा सरपंच व जिल्हा संघटक सुभाष उके, मार्गदर्शक डॉ. अविनाश नान्हे, जिल्हा संघटक प्रवीण मडामे, संघटक रवी उके, पंकज राऊत यांनी दिला आहे.

निधीच्या प्रतीक्षेत ससेहोलपटयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत पहिल्या ५ वर्षामध्ये एकही लाभार्थी नव्हता. मात्र, ढीवर समाज संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळे घरकुलांची प्रशासकीय मान्यता मिळवण्यात आली. परंतु, गत दीड वर्षांपासून मंजूर घरकुलांसाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे हजारो भटक्या कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. नदीकाठच्या गरीब भटक्या व विमुक्त समाजातील लोकांनी आपली मातीची कौलांची घरे तोडून नवीन घर उभारण्याचे काम सुरू केले आहे. पण, निधीच्या प्रतीक्षेत ही घरे अपूर्ण आहेत.

चौकशीची मागणीघरकुल योजनेसाठी आलेला ३ कोटींचा निधी परत गेल्याप्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी ढिवर समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे

"मुक्त वसाहत योजनेच्या घरकुलासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीकरिता जोमाने प्रयत्न केले जातील. तसेच ३ कोटींचा निधी परत गेल्यासंदर्भात योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल."- सचिन मडावी, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग

"यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून ४ हजारांवर घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली. मात्र, शासनाकडे ३० कोटीपेक्षा अधिक निधी प्रलंबित आहे. त्यातच मार्च महिन्यात ३ कोटींचा निधी वेळेवर न वापरल्याने परत गेला ही शोकांतिका आहे. घरकुलांचे बांधकाम अपूर्ण स्थितीत असून, भटक्या समाजाला स्थैर्य मिळवण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे."- सुरेश खंगार, अशासकीय सदस्य मुक्त वसाहत योजना

टॅग्स :bhandara-acभंडारा