शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

दोन महिन्यांत 86 अपघातात 28 मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 05:00 IST

जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अपघात भंडारा, मोहाडी आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी महिन्यात ५१ अपघात होऊन १८ जणांचा मृत्यू, तर ६१ जण जखमी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या ८६ अपघातांत २८ जणांचा बळी गेला असून, ९८ जण गंभीर जखमी झाले आहे. एसटीच्या संपानंतर अपघातात वाढ झाल्याचे दिसत असून, सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे आहेत.भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग आणि जिल्हा मार्ग आहे. रस्ते सुस्थितीत असले तरी अलीकडील काही वर्षात अपघाताचे प्रमाण मात्र वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच एसटीच्या संपामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. हा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतल्याचे दिसून येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अपघात भंडारा, मोहाडी आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत.गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी महिन्यात ५१ अपघात होऊन १८ जणांचा मृत्यू, तर ६१ जण जखमी झाले होते. गतवर्षी जानेवारी महिन्यात ४२ अपघातांत १५ जणांचा मृत्यू, तर ३६ व्यक्ती जखमी झाले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ३५ अपघातात दहा जणांचा मृत्यू, तर ३७ जण गंभीर जखमी झाले होते. गतवर्षी याच महिन्यात ३६ अपघातांत २० जणांचा बळी गेला, तर ४७ व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. अपघाताचे मुख्य कारण म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे होय. वारंवार जनजागृती करूनही नागरिक नियम पायदळी तुडवितात आणि अपघात घडतात.

भंडारा ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक अपघात 

- गत दोन महिन्यांत सर्वाधिक १६ अपघात भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या. त्यात तिघांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाले. जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत एका अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. मोहाडी ठाण्यांतर्गत पाच अपघातात आठ जण जखमी झाले. कारधा ठाण्याच्या हद्दीत दहा अपघातात चार जणांचा मृत्यू आणि २९ व्यक्ती घायल झाले. वरठी ठाण्याच्या हद्दीत पाच अपघातात एका जणाचा मृत्यू, तुमसर ठाण्याच्या हद्दीत दहा अपघातात एकाचा मृत्यू, तर दहा जण गंभीर जखमी झाले. साकोली ठाण्याच्या हद्दीत १५ अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.

सर्वाधिक अपघात दुचाकीचे- जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे झाले आहे. एसटीच्या संपामुळे पर्याय नसल्याने अनेक जण बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकीचा उपयोग करतात. मात्र नियमांचे पालन करीत नाही. मद्य प्राशन करून दुचाकी चालविणे, दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे, धोकादायक ओव्हरटेक करणे या कारणांमुळे अपघात झाल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले.

 

टॅग्स :Accidentअपघात