शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत 86 अपघातात 28 मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 05:00 IST

जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अपघात भंडारा, मोहाडी आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी महिन्यात ५१ अपघात होऊन १८ जणांचा मृत्यू, तर ६१ जण जखमी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या ८६ अपघातांत २८ जणांचा बळी गेला असून, ९८ जण गंभीर जखमी झाले आहे. एसटीच्या संपानंतर अपघातात वाढ झाल्याचे दिसत असून, सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे आहेत.भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग आणि जिल्हा मार्ग आहे. रस्ते सुस्थितीत असले तरी अलीकडील काही वर्षात अपघाताचे प्रमाण मात्र वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच एसटीच्या संपामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. हा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतल्याचे दिसून येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अपघात भंडारा, मोहाडी आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत.गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी महिन्यात ५१ अपघात होऊन १८ जणांचा मृत्यू, तर ६१ जण जखमी झाले होते. गतवर्षी जानेवारी महिन्यात ४२ अपघातांत १५ जणांचा मृत्यू, तर ३६ व्यक्ती जखमी झाले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ३५ अपघातात दहा जणांचा मृत्यू, तर ३७ जण गंभीर जखमी झाले होते. गतवर्षी याच महिन्यात ३६ अपघातांत २० जणांचा बळी गेला, तर ४७ व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. अपघाताचे मुख्य कारण म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे होय. वारंवार जनजागृती करूनही नागरिक नियम पायदळी तुडवितात आणि अपघात घडतात.

भंडारा ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक अपघात 

- गत दोन महिन्यांत सर्वाधिक १६ अपघात भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या. त्यात तिघांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाले. जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत एका अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. मोहाडी ठाण्यांतर्गत पाच अपघातात आठ जण जखमी झाले. कारधा ठाण्याच्या हद्दीत दहा अपघातात चार जणांचा मृत्यू आणि २९ व्यक्ती घायल झाले. वरठी ठाण्याच्या हद्दीत पाच अपघातात एका जणाचा मृत्यू, तुमसर ठाण्याच्या हद्दीत दहा अपघातात एकाचा मृत्यू, तर दहा जण गंभीर जखमी झाले. साकोली ठाण्याच्या हद्दीत १५ अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.

सर्वाधिक अपघात दुचाकीचे- जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे झाले आहे. एसटीच्या संपामुळे पर्याय नसल्याने अनेक जण बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकीचा उपयोग करतात. मात्र नियमांचे पालन करीत नाही. मद्य प्राशन करून दुचाकी चालविणे, दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे, धोकादायक ओव्हरटेक करणे या कारणांमुळे अपघात झाल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले.

 

टॅग्स :Accidentअपघात