शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

दोन महिन्यांत 86 अपघातात 28 मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 05:00 IST

जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अपघात भंडारा, मोहाडी आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी महिन्यात ५१ अपघात होऊन १८ जणांचा मृत्यू, तर ६१ जण जखमी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या ८६ अपघातांत २८ जणांचा बळी गेला असून, ९८ जण गंभीर जखमी झाले आहे. एसटीच्या संपानंतर अपघातात वाढ झाल्याचे दिसत असून, सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे आहेत.भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग आणि जिल्हा मार्ग आहे. रस्ते सुस्थितीत असले तरी अलीकडील काही वर्षात अपघाताचे प्रमाण मात्र वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच एसटीच्या संपामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. हा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतल्याचे दिसून येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अपघात भंडारा, मोहाडी आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत.गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी महिन्यात ५१ अपघात होऊन १८ जणांचा मृत्यू, तर ६१ जण जखमी झाले होते. गतवर्षी जानेवारी महिन्यात ४२ अपघातांत १५ जणांचा मृत्यू, तर ३६ व्यक्ती जखमी झाले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ३५ अपघातात दहा जणांचा मृत्यू, तर ३७ जण गंभीर जखमी झाले होते. गतवर्षी याच महिन्यात ३६ अपघातांत २० जणांचा बळी गेला, तर ४७ व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. अपघाताचे मुख्य कारण म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे होय. वारंवार जनजागृती करूनही नागरिक नियम पायदळी तुडवितात आणि अपघात घडतात.

भंडारा ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक अपघात 

- गत दोन महिन्यांत सर्वाधिक १६ अपघात भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या. त्यात तिघांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाले. जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत एका अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. मोहाडी ठाण्यांतर्गत पाच अपघातात आठ जण जखमी झाले. कारधा ठाण्याच्या हद्दीत दहा अपघातात चार जणांचा मृत्यू आणि २९ व्यक्ती घायल झाले. वरठी ठाण्याच्या हद्दीत पाच अपघातात एका जणाचा मृत्यू, तुमसर ठाण्याच्या हद्दीत दहा अपघातात एकाचा मृत्यू, तर दहा जण गंभीर जखमी झाले. साकोली ठाण्याच्या हद्दीत १५ अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.

सर्वाधिक अपघात दुचाकीचे- जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे झाले आहे. एसटीच्या संपामुळे पर्याय नसल्याने अनेक जण बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकीचा उपयोग करतात. मात्र नियमांचे पालन करीत नाही. मद्य प्राशन करून दुचाकी चालविणे, दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे, धोकादायक ओव्हरटेक करणे या कारणांमुळे अपघात झाल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले.

 

टॅग्स :Accidentअपघात