शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

सहा दशकांपासून २६२ कुटुंबे मालकी हक्कापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:23 IST

टाकळीतील प्रकार : ६५ वर्षांपासून शहराचे सिटी सर्वेक्षण नाही

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरातील २६२ कुटुंबे अशी आहेत, ज्यांना मागील सहा दशकांपासून त्यांचे मूलभूत हक्क म्हणजेच त्यांच्या मालकीच्या जागेची आखीव पत्रिका मिळालेली नाही. गत १० वर्षांपासून त्यांच्या प्रतिनिधींनी सरकारच्या दरवाजावर अनेक वेळा दस्तक दिली आहे. २५ हून अधिक वेळा पत्रव्यवहार झाले आहेत. परंतु अजूनही न्याय मिळालेला नाही. कारण, मागील ६५ वर्षापासून भंडारा शहराचे सिटी सर्वेक्षणच झालेले नाही.

१९५९ मध्ये शहराचे पहिले सिटी सर्वेक्षण झाले होते. ६५ वर्षे उलटून गेली आहेत. सर्वेक्षणात नागरिकांची मालकीची जागा मोजून प्रमाणपत्र दिले जाते आणि शहराच्या हद्दी ठरवल्या जातात. 

न्यू टाकळीतील २६२ कुटुंबे वंचित भंडारा शहराच्या हद्दीत भंडारा नझुल, भंडारा खास, मौजा पिंगलाई, मौजा गणेशपूर आणि मौजा केसलवाडा या भागांचा समावेश आहे. मात्र फक्त भंडारा खास, भंडारा नझुल आणि मौजा गणेशपूरचा सिटी सर्व्हे एकदा झाला आहे, बाकीचे अद्यापही बाकी आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या मालमत्तेचे प्रमाणपत्र मिळू शकले नाही. प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणारी नवीन टाकळी भागातील २६२ कुटुंबे मालमत्तेच्या अधिकारांपासून वंचित आहेत. घर बांधकामासाठी अनुदान दिले, परंतु त्यांना अद्याप त्यांच्या हक्काचे प्रमाणपत्र मिळालेले नाही.

२५ पत्रव्यवहार आणि ७०० चकरा सामाजिक कार्यकर्ते प्रीतमकुमार राजाभोज यांनी २०१५ मध्ये या मुद्द्याला वाचा फोडली. त्यांनी प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली. मागील १० वर्षांत त्यांनी तहसीलदार, भूमी अभिलेख, नगर परिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, विभागीय आयुक्त नागपूर, पालक सचिव भंडारा, मुख्य राज्य लोकसेवा आयोग यांच्याकडेही २५ पेक्षा जास्त वेळा पत्रव्यवहार केला असून, ७०० पेक्षा जास्त वेळा कार्यालयांमध्ये चकरा मारल्या आहेत.

राज्यपालांकडून न्यायाची अपेक्षासोमवारी राज्यपाल राधाकृष्णन जिल्ह्यात आले असता त्यांना याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यांनी १६ डिसेंबर २०२२ रोजी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन भंडारा शहरातील नागरिक त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित असल्याची माहिती दिली होती. या २६२ कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, याबाबत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून निधी उपलब्ध करून हा विषय लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.  

टॅग्स :bhandara-acभंडारा