शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

वर्षभरात जुळल्या २५ रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 22:40 IST

मानवी मन केव्हा कुणात गुंतेल याचा नेम नाही. प्रेमाचाही असाच प्रकार आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव : विशेष विवाह काळाची गरज

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : मानवी मन केव्हा कुणात गुंतेल याचा नेम नाही. प्रेमाचाही असाच प्रकार आहे. त्याग आणि विश्वास एकत्र आले की प्रेमाची उत्पत्ती झाल्याशिवाय राहात नाही. अशा प्रेमाचे रूपांतर नंतर लग्नात होते. मन जुळली की रेशीमगाठी जुळायला वेळ लागत नसला तरी समाजाच्या भितीने लग्नात आडकाठी येतील. अशा स्थितीत विशेष विवाह कायद्याचा आधार घेतला जातो. वर्षभरात जिल्ह्यात २५ तरूण-तरूणींनी विशेष विवाह कायद्याचा वापर करून रेशिमगाठ बांधली आहे.विशेष विवाह कायदा १९५४ या कायद्यांतर्गत विवाह करताना वधू-वर यांना कुठल्याही जाती किंवा धर्माचे बंधन नाही. विशेष विवाह करणारा अविवाहित असावा किंवा विवाहित असल्यास पुर्वीच्या लग्नातील जोडीदारापासून घटस्फोटीत किंवा तो जोडीदार हयात नसावा. विशेष विवाहाची नोटीस देताना वधू-वरापैकी किमान एक पक्षकार नोंदणी विवाह करणाºया अधिकाºयांच्या कार्यक्षेत्रात ३० दिवसांपासून वास्तव्यास असला पाहिजे, असा नियम आहे. राज्यातील सर्वच जिल्हा मुख्यालयात या कायद्यांतर्गत नियुक्त केलेले विवाह अधिकारी विशेष विवाह संपन्न करतात.भंडारा जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत २५ जोडप्यांनी शुभमंगल उरकविले आहे. पैसा व वेळेची बचत याशिवाय जाती-धर्माच्या बंधनाला झुगारून कायद्याच्या आधारे या तरूणांनी समाजापुढेही आदर्श निर्माण केला आहे. यात एका विवाहासाठी जवळपास २५० रूपयांचा खर्च येतो. नोटीस दिल्याच्या एक महिन्यानंतर व ९० दिवसांच्या आत विशेष विवाहाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.स्पर्धेच्या युगात वेळ आणि पैशांची बचत करण्याच्या दृष्टीकोनातून विशेष विवाह करणे काळाची गरज आहे. यातून पैशाची उधळपट्टी होण्यापासून मज्जाव होतो तसेच या पैशाचा वापर युगलाच्या कल्याणासाठी करता येतो.-जे.एम. चतुर, सहायक दुय्यम निबंधक तथा विशेष विवाह अधिकारी भंडारा.