शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वर्षभरात जुळल्या २५ रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 22:40 IST

मानवी मन केव्हा कुणात गुंतेल याचा नेम नाही. प्रेमाचाही असाच प्रकार आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव : विशेष विवाह काळाची गरज

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : मानवी मन केव्हा कुणात गुंतेल याचा नेम नाही. प्रेमाचाही असाच प्रकार आहे. त्याग आणि विश्वास एकत्र आले की प्रेमाची उत्पत्ती झाल्याशिवाय राहात नाही. अशा प्रेमाचे रूपांतर नंतर लग्नात होते. मन जुळली की रेशीमगाठी जुळायला वेळ लागत नसला तरी समाजाच्या भितीने लग्नात आडकाठी येतील. अशा स्थितीत विशेष विवाह कायद्याचा आधार घेतला जातो. वर्षभरात जिल्ह्यात २५ तरूण-तरूणींनी विशेष विवाह कायद्याचा वापर करून रेशिमगाठ बांधली आहे.विशेष विवाह कायदा १९५४ या कायद्यांतर्गत विवाह करताना वधू-वर यांना कुठल्याही जाती किंवा धर्माचे बंधन नाही. विशेष विवाह करणारा अविवाहित असावा किंवा विवाहित असल्यास पुर्वीच्या लग्नातील जोडीदारापासून घटस्फोटीत किंवा तो जोडीदार हयात नसावा. विशेष विवाहाची नोटीस देताना वधू-वरापैकी किमान एक पक्षकार नोंदणी विवाह करणाºया अधिकाºयांच्या कार्यक्षेत्रात ३० दिवसांपासून वास्तव्यास असला पाहिजे, असा नियम आहे. राज्यातील सर्वच जिल्हा मुख्यालयात या कायद्यांतर्गत नियुक्त केलेले विवाह अधिकारी विशेष विवाह संपन्न करतात.भंडारा जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत २५ जोडप्यांनी शुभमंगल उरकविले आहे. पैसा व वेळेची बचत याशिवाय जाती-धर्माच्या बंधनाला झुगारून कायद्याच्या आधारे या तरूणांनी समाजापुढेही आदर्श निर्माण केला आहे. यात एका विवाहासाठी जवळपास २५० रूपयांचा खर्च येतो. नोटीस दिल्याच्या एक महिन्यानंतर व ९० दिवसांच्या आत विशेष विवाहाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.स्पर्धेच्या युगात वेळ आणि पैशांची बचत करण्याच्या दृष्टीकोनातून विशेष विवाह करणे काळाची गरज आहे. यातून पैशाची उधळपट्टी होण्यापासून मज्जाव होतो तसेच या पैशाचा वापर युगलाच्या कल्याणासाठी करता येतो.-जे.एम. चतुर, सहायक दुय्यम निबंधक तथा विशेष विवाह अधिकारी भंडारा.