शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
2
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
3
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
4
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
5
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
6
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
7
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
8
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
9
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
10
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
11
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
12
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
13
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!
14
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
15
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
16
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
17
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
18
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
19
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
20
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!

भाजीपाला लागवडीतून अडीच लाखांचा नफा

By admin | Updated: August 22, 2016 00:31 IST

तालुक्यातील मोरगाव (राजेगाव) येथील मनोहर बैललाल पटले यांनी अल्पशा शेतीवर बाराही महिने भाजीपाल्याची लागवड करून दारिद्र्यावर मात केली आहे.

चवळा व कारल्याची लागवड : पटले दाम्पत्यांची दारिद्र्यावर मातचंदन मोटघरे लाखनीतालुक्यातील मोरगाव (राजेगाव) येथील मनोहर बैललाल पटले यांनी अल्पशा शेतीवर बाराही महिने भाजीपाल्याची लागवड करून दारिद्र्यावर मात केली आहे. दरवर्षी तीन लक्ष रूपयापर्यंत शुद्ध नफा भाजीपाला लागवडीतून मिळवून परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. संयुक्त कुटुंबापासून २००४ मध्ये वेगळे झाल्यानंतर मनोहर पटले व त्यांच्या अर्धांगिणी प्रतीभा पटले यांना संघर्ष करावा लागला. दीड एकर शेतीमध्ये धान पिकाची लागवड केली. पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. २००७ पासून शेतात उन्हाळी भेंडी लावायला सुरुवात करून भाजीपाला लागवडीकडे लक्ष पुरविले. कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन भाजीपाल्याच्या इतर जातीची लागवड केली. प्रारंभी पटले यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. दुसऱ्याच्या शेतीवर मजुरीसाठी जावे लागत होते. भाजीपाला लावगडीनंतर पटले यांच्या जीवनस्तरामध्ये बदल घडून आला. भाजीपाला भंडारा व नागपुरच्या भाजीमंडीमध्ये जावू लागला. पटले यांच्याकडे सध्या दोन मालवाहू गाड्या आहेत. मोरगाव व परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला पावसाळ्यात भंडारा व उन्हाळ्यात नागपूर येथे जात असते. पटले यांच्यासोबत त्यांना इतर शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देवून विकास साधला आहे. २०१५-१६ मध्ये मनोहर पटले यांना कृषी विभागाद्वारे ५० टक्के अनुदानावर ठिंबक सिंचनाची योजना मिळाली आहे. शेतात विंधन विहिर आहे. बाराही महिने मुबलक पाण्याचा पुरवठा होत असतो. २०१६ मध्ये पटले यांनी चवळा व कारल्याचे उत्पादन ४० आर शेतात घेतले. चवळा व कारला लावल्यामुळे ४ लक्ष ७५ हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले. त्यांची बि बियाणे, खत, कीटकनाशके, मशागत खर्च, मजुरी इत्यादीसाठी २ लक्ष २५ हजार रुपये खर्च आला. त्यांना ४ महिन्यात २ लक्ष ५० हजार रुपयाचा शुद्ध नफा मिळालेला आहे. पटले यांनी शेतात चवळा व कारल्यासोबत लवकी व काकड्यांची लागवड केली आहे. उन्हाळ्यात भेंडीचे उत्पादन घेतले जाते. मनोहर पटले यांचा भाजीपाला लागवडीमुळे जीवनस्तर उंचावलेला आहे. मनोहर पटले यांच्या पत्नी प्रतीभा पटले या शेतात मेहनत घेत असतात. मनोहर पटले बाजारपेठेकडे लक्ष देतात. पटले पती पत्नी यांनी मेहनत व कौशल्याच्या मदतीने दारिद्र्यावर मात केली. त्यांच्या दोन मुली शालेय शिक्षण घेत आहेत. परंपरागत पीक पद्धतीला फाटा देवून भाजीपाल्याची लागवड करून मोरगाव परिसरातील शेतकऱ्यांपुढे आदर्शाचा मानदंड निर्माण करणारे मनोहर पटले शांत स्वभावाचे आहेत. त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल कौतूक केल्या जात आहे.