शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

भाजीपाला लागवडीतून अडीच लाखांचा नफा

By admin | Updated: August 22, 2016 00:31 IST

तालुक्यातील मोरगाव (राजेगाव) येथील मनोहर बैललाल पटले यांनी अल्पशा शेतीवर बाराही महिने भाजीपाल्याची लागवड करून दारिद्र्यावर मात केली आहे.

चवळा व कारल्याची लागवड : पटले दाम्पत्यांची दारिद्र्यावर मातचंदन मोटघरे लाखनीतालुक्यातील मोरगाव (राजेगाव) येथील मनोहर बैललाल पटले यांनी अल्पशा शेतीवर बाराही महिने भाजीपाल्याची लागवड करून दारिद्र्यावर मात केली आहे. दरवर्षी तीन लक्ष रूपयापर्यंत शुद्ध नफा भाजीपाला लागवडीतून मिळवून परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. संयुक्त कुटुंबापासून २००४ मध्ये वेगळे झाल्यानंतर मनोहर पटले व त्यांच्या अर्धांगिणी प्रतीभा पटले यांना संघर्ष करावा लागला. दीड एकर शेतीमध्ये धान पिकाची लागवड केली. पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. २००७ पासून शेतात उन्हाळी भेंडी लावायला सुरुवात करून भाजीपाला लागवडीकडे लक्ष पुरविले. कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन भाजीपाल्याच्या इतर जातीची लागवड केली. प्रारंभी पटले यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. दुसऱ्याच्या शेतीवर मजुरीसाठी जावे लागत होते. भाजीपाला लावगडीनंतर पटले यांच्या जीवनस्तरामध्ये बदल घडून आला. भाजीपाला भंडारा व नागपुरच्या भाजीमंडीमध्ये जावू लागला. पटले यांच्याकडे सध्या दोन मालवाहू गाड्या आहेत. मोरगाव व परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला पावसाळ्यात भंडारा व उन्हाळ्यात नागपूर येथे जात असते. पटले यांच्यासोबत त्यांना इतर शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देवून विकास साधला आहे. २०१५-१६ मध्ये मनोहर पटले यांना कृषी विभागाद्वारे ५० टक्के अनुदानावर ठिंबक सिंचनाची योजना मिळाली आहे. शेतात विंधन विहिर आहे. बाराही महिने मुबलक पाण्याचा पुरवठा होत असतो. २०१६ मध्ये पटले यांनी चवळा व कारल्याचे उत्पादन ४० आर शेतात घेतले. चवळा व कारला लावल्यामुळे ४ लक्ष ७५ हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले. त्यांची बि बियाणे, खत, कीटकनाशके, मशागत खर्च, मजुरी इत्यादीसाठी २ लक्ष २५ हजार रुपये खर्च आला. त्यांना ४ महिन्यात २ लक्ष ५० हजार रुपयाचा शुद्ध नफा मिळालेला आहे. पटले यांनी शेतात चवळा व कारल्यासोबत लवकी व काकड्यांची लागवड केली आहे. उन्हाळ्यात भेंडीचे उत्पादन घेतले जाते. मनोहर पटले यांचा भाजीपाला लागवडीमुळे जीवनस्तर उंचावलेला आहे. मनोहर पटले यांच्या पत्नी प्रतीभा पटले या शेतात मेहनत घेत असतात. मनोहर पटले बाजारपेठेकडे लक्ष देतात. पटले पती पत्नी यांनी मेहनत व कौशल्याच्या मदतीने दारिद्र्यावर मात केली. त्यांच्या दोन मुली शालेय शिक्षण घेत आहेत. परंपरागत पीक पद्धतीला फाटा देवून भाजीपाल्याची लागवड करून मोरगाव परिसरातील शेतकऱ्यांपुढे आदर्शाचा मानदंड निर्माण करणारे मनोहर पटले शांत स्वभावाचे आहेत. त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल कौतूक केल्या जात आहे.