शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यातील २५ कोटींचे धान चुकारे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

इंद्रपाल कटकवार/संजय साठवणे । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा/साकोली : नैसर्गिक आपत्तीशी सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेला धान शासकीय खरेदी केंद्रावर ...

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : चार हजार शेतकऱ्यांनी विकला १.४० लाख क्विंटल धान

इंद्रपाल कटकवार/संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/साकोली : नैसर्गिक आपत्तीशी सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेला धान शासकीय खरेदी केंद्रावर मोठ्या आशेने विकला. मात्र गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला धानाचे चुकारे मिळाले नाही. जिल्ह्यातील चार हजार ५९१ शेतकºयांचे २५ कोटी ५७ लाख १३ हजार २६२ रूपयांचे चुकारे अडले आहेत. वेळेवर पैसे मिळत नसल्याने आता शेतकरी व्यापाऱ्यांकडे धाव घेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान खरेदी सुरू झाली. जिल्ह्यात ६७ धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ६३ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. येथे सर्वसाधारण धानाला १८१५ रूपये आणि उच्च प्रतीच्या धानाला १८३५ रूपये प्रती क्विंटल हमीभाव दिला जात आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या धान केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी धान आणला. २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील चार हजार ५९१ शेतकऱ्यांनी एक लाख ४० हजार ८८८.५ क्विंटल धानाची हमी केंद्रावर विक्री केली आहे. गत तीन आठवड्यांपासून जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला चुकारे मिळाले नाही. तब्बल २५ कोटी ५७ लाख १३ हजार २६२ रूपयांचे चुकारे बाकी आहे. शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा झाले की याची खातरजमा करीत आहे. परंतु शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे. हमी केंद्रावर वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी आता व्यापाºयांकडे धाव घेत आहे. परंतु तेथे हमीभावापेक्षा २०० रूपये कमी दराने खरेदी होत असल्याची माहिती आहे.यावर्षी सुरूवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. सुरूवातीला पºहे भरेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मात्र ऐन रोवणीच्यावेळी पाऊस बेपत्ता झाला. जवळपास एक महिना पावसाने दडी मारली. तरीही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. धान जगविले. त्यानंतरमात्र समाधानकारक पाऊस पडला. परंतु ऐन कापणीच्यावेळेस पुन्हा पावसाने कहर केला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातूनही सावरत शेतकऱ्यांनी आपल्या धानाचा चुरना केला. धान वाळून विक्रीसाठी शासकीय धान खरेदी केंद्रावर नेले आहे. परंतु त्याठिकाणीही मोठी गर्दी होत आहे. शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्यातही पैसे वेळेवर मिळत नाही.अनेक शेतकरी पैशासाठी वनवण भटकंती करीत आहे. उन्हाळी धान पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे. परंतु विकलेल्या धानाचे हक्काचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत. दुसरीकडे शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. येथे पिण्याचे पाणी आणि इतर मुलभूत सुविधाही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. अनेक केंद्रात धान उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांच्या मनात कायम भीती असते. अनेक शेतकरी रात्री धान खरेदी केंद्रात मुक्कामी राहतात. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी करीत आहेत.व्यापाऱ्यांचे खरेदी दर कमीशासनाच्या उदासीन धारणामुळे शेतकरी पैशासाठी वणवण फिरत आहे. धानाचे चुकारे मिळत नसल्याने आता शेतकरी व्यापाऱ्यांकडे धाव घेत आहे. शासकीय दर प्रती क्विंटल १८१५ रूपये असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल १६०० रूपयाने धान खरेदी करीत आहेत. यात शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.बोनस अडचणीत?गतवर्षी शेतकऱ्यांच्या धानाला प्रती क्विंटल ५०० रूपये बोनस देण्यात आला होता. यावर्षीही बोनस मिळणार, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रात सरकार स्थापनेचाच गोंधळ सुरू आहे. त्यामुळे यावर्षी बोनस मिळणार की नाही, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी