शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

जिल्ह्यातील २५ कोटींचे धान चुकारे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

इंद्रपाल कटकवार/संजय साठवणे । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा/साकोली : नैसर्गिक आपत्तीशी सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेला धान शासकीय खरेदी केंद्रावर ...

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : चार हजार शेतकऱ्यांनी विकला १.४० लाख क्विंटल धान

इंद्रपाल कटकवार/संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/साकोली : नैसर्गिक आपत्तीशी सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेला धान शासकीय खरेदी केंद्रावर मोठ्या आशेने विकला. मात्र गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला धानाचे चुकारे मिळाले नाही. जिल्ह्यातील चार हजार ५९१ शेतकºयांचे २५ कोटी ५७ लाख १३ हजार २६२ रूपयांचे चुकारे अडले आहेत. वेळेवर पैसे मिळत नसल्याने आता शेतकरी व्यापाऱ्यांकडे धाव घेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान खरेदी सुरू झाली. जिल्ह्यात ६७ धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ६३ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. येथे सर्वसाधारण धानाला १८१५ रूपये आणि उच्च प्रतीच्या धानाला १८३५ रूपये प्रती क्विंटल हमीभाव दिला जात आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या धान केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी धान आणला. २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील चार हजार ५९१ शेतकऱ्यांनी एक लाख ४० हजार ८८८.५ क्विंटल धानाची हमी केंद्रावर विक्री केली आहे. गत तीन आठवड्यांपासून जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला चुकारे मिळाले नाही. तब्बल २५ कोटी ५७ लाख १३ हजार २६२ रूपयांचे चुकारे बाकी आहे. शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा झाले की याची खातरजमा करीत आहे. परंतु शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे. हमी केंद्रावर वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी आता व्यापाºयांकडे धाव घेत आहे. परंतु तेथे हमीभावापेक्षा २०० रूपये कमी दराने खरेदी होत असल्याची माहिती आहे.यावर्षी सुरूवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. सुरूवातीला पºहे भरेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मात्र ऐन रोवणीच्यावेळी पाऊस बेपत्ता झाला. जवळपास एक महिना पावसाने दडी मारली. तरीही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. धान जगविले. त्यानंतरमात्र समाधानकारक पाऊस पडला. परंतु ऐन कापणीच्यावेळेस पुन्हा पावसाने कहर केला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातूनही सावरत शेतकऱ्यांनी आपल्या धानाचा चुरना केला. धान वाळून विक्रीसाठी शासकीय धान खरेदी केंद्रावर नेले आहे. परंतु त्याठिकाणीही मोठी गर्दी होत आहे. शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्यातही पैसे वेळेवर मिळत नाही.अनेक शेतकरी पैशासाठी वनवण भटकंती करीत आहे. उन्हाळी धान पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे. परंतु विकलेल्या धानाचे हक्काचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत. दुसरीकडे शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. येथे पिण्याचे पाणी आणि इतर मुलभूत सुविधाही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. अनेक केंद्रात धान उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांच्या मनात कायम भीती असते. अनेक शेतकरी रात्री धान खरेदी केंद्रात मुक्कामी राहतात. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी करीत आहेत.व्यापाऱ्यांचे खरेदी दर कमीशासनाच्या उदासीन धारणामुळे शेतकरी पैशासाठी वणवण फिरत आहे. धानाचे चुकारे मिळत नसल्याने आता शेतकरी व्यापाऱ्यांकडे धाव घेत आहे. शासकीय दर प्रती क्विंटल १८१५ रूपये असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल १६०० रूपयाने धान खरेदी करीत आहेत. यात शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.बोनस अडचणीत?गतवर्षी शेतकऱ्यांच्या धानाला प्रती क्विंटल ५०० रूपये बोनस देण्यात आला होता. यावर्षीही बोनस मिळणार, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रात सरकार स्थापनेचाच गोंधळ सुरू आहे. त्यामुळे यावर्षी बोनस मिळणार की नाही, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी