शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा झालेल्या २४० रुग्णांना उपचारानंतर सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

अन्नातून विषबाधा झाल्याने माहित होताच तालुका, जिल्हा आरोग्य यंत्रणा तात्काळ झरप येथे दाखल झाली. शासकीय आणि खासगी वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सर्व रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. घरोघरी आरोग्यदूत पाठवून तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्देझरपचे प्रकरण : अन्न व प्रशासन विभागाकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : हळदी कार्यक्रमाच्या भोजनातून तब्बल २४० जणांना विषबाधा होण्याचा प्रकार बुधवारी लाखनी तालुक्यातील झरप येथे उघडकीस आला होता. या सर्वांवर मुरमाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गावात शिबिर लावून उपचार करण्यात आले. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.झरप येथील जयराम कोरे यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त हळदीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गाव तेथे भोजनासाठी आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपासून अनेकांना उलटी व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. बुधवारी दुपारपर्यंत ७० जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री अनेकांची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. झरप येथील तब्बल २४० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे पुढे आले. या सर्वांवर उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.अन्नातून विषबाधा झाल्याने माहित होताच तालुका, जिल्हा आरोग्य यंत्रणा तात्काळ झरप येथे दाखल झाली. शासकीय आणि खासगी वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सर्व रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. घरोघरी आरोग्यदूत पाठवून तपासणी केली जात आहे. झरप येथे लावण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ४० जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती मुरमाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.अर्चना तलमले यांनी सांगितले. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चमूनेही भेट दिली. त्यांनी अन्न व पाण्याचे नमूने ताब्यात घेतले.दरम्यान या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर कोरे यांनी प्रयत्न करून सर्व बाधीतांना मुरमाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. बुधवारची रात्र झरपवासीयांसाठी संकटाची रात्र ठरली.शिजलेले अन्न तीन तासात संपवावेशिजलेले अन्न अधिक वेळपर्यंत न ठेवता किमान तीन चार तासात संपेल अशी व्यवस्था असणे महत्वाचे आहे. पिण्याचे पाणी निर्जंतूकीकरण करून प्राशन करावे. शुद्ध पाण्याचा नियमित वापर करावा असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. झरपला आरोग्य शिबिरातून सेवा पुरविण्यात आली होती. सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा