शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा झालेल्या २४० रुग्णांना उपचारानंतर सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

अन्नातून विषबाधा झाल्याने माहित होताच तालुका, जिल्हा आरोग्य यंत्रणा तात्काळ झरप येथे दाखल झाली. शासकीय आणि खासगी वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सर्व रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. घरोघरी आरोग्यदूत पाठवून तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्देझरपचे प्रकरण : अन्न व प्रशासन विभागाकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : हळदी कार्यक्रमाच्या भोजनातून तब्बल २४० जणांना विषबाधा होण्याचा प्रकार बुधवारी लाखनी तालुक्यातील झरप येथे उघडकीस आला होता. या सर्वांवर मुरमाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गावात शिबिर लावून उपचार करण्यात आले. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.झरप येथील जयराम कोरे यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त हळदीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गाव तेथे भोजनासाठी आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपासून अनेकांना उलटी व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. बुधवारी दुपारपर्यंत ७० जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री अनेकांची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. झरप येथील तब्बल २४० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे पुढे आले. या सर्वांवर उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.अन्नातून विषबाधा झाल्याने माहित होताच तालुका, जिल्हा आरोग्य यंत्रणा तात्काळ झरप येथे दाखल झाली. शासकीय आणि खासगी वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सर्व रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. घरोघरी आरोग्यदूत पाठवून तपासणी केली जात आहे. झरप येथे लावण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ४० जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती मुरमाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.अर्चना तलमले यांनी सांगितले. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चमूनेही भेट दिली. त्यांनी अन्न व पाण्याचे नमूने ताब्यात घेतले.दरम्यान या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर कोरे यांनी प्रयत्न करून सर्व बाधीतांना मुरमाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. बुधवारची रात्र झरपवासीयांसाठी संकटाची रात्र ठरली.शिजलेले अन्न तीन तासात संपवावेशिजलेले अन्न अधिक वेळपर्यंत न ठेवता किमान तीन चार तासात संपेल अशी व्यवस्था असणे महत्वाचे आहे. पिण्याचे पाणी निर्जंतूकीकरण करून प्राशन करावे. शुद्ध पाण्याचा नियमित वापर करावा असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. झरपला आरोग्य शिबिरातून सेवा पुरविण्यात आली होती. सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा