शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

विषबाधा झालेल्या २४० रुग्णांना उपचारानंतर सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

अन्नातून विषबाधा झाल्याने माहित होताच तालुका, जिल्हा आरोग्य यंत्रणा तात्काळ झरप येथे दाखल झाली. शासकीय आणि खासगी वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सर्व रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. घरोघरी आरोग्यदूत पाठवून तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्देझरपचे प्रकरण : अन्न व प्रशासन विभागाकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : हळदी कार्यक्रमाच्या भोजनातून तब्बल २४० जणांना विषबाधा होण्याचा प्रकार बुधवारी लाखनी तालुक्यातील झरप येथे उघडकीस आला होता. या सर्वांवर मुरमाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गावात शिबिर लावून उपचार करण्यात आले. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.झरप येथील जयराम कोरे यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त हळदीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गाव तेथे भोजनासाठी आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपासून अनेकांना उलटी व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. बुधवारी दुपारपर्यंत ७० जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री अनेकांची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. झरप येथील तब्बल २४० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे पुढे आले. या सर्वांवर उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.अन्नातून विषबाधा झाल्याने माहित होताच तालुका, जिल्हा आरोग्य यंत्रणा तात्काळ झरप येथे दाखल झाली. शासकीय आणि खासगी वाहनातून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सर्व रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. घरोघरी आरोग्यदूत पाठवून तपासणी केली जात आहे. झरप येथे लावण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ४० जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती मुरमाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.अर्चना तलमले यांनी सांगितले. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चमूनेही भेट दिली. त्यांनी अन्न व पाण्याचे नमूने ताब्यात घेतले.दरम्यान या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर कोरे यांनी प्रयत्न करून सर्व बाधीतांना मुरमाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. बुधवारची रात्र झरपवासीयांसाठी संकटाची रात्र ठरली.शिजलेले अन्न तीन तासात संपवावेशिजलेले अन्न अधिक वेळपर्यंत न ठेवता किमान तीन चार तासात संपेल अशी व्यवस्था असणे महत्वाचे आहे. पिण्याचे पाणी निर्जंतूकीकरण करून प्राशन करावे. शुद्ध पाण्याचा नियमित वापर करावा असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. झरपला आरोग्य शिबिरातून सेवा पुरविण्यात आली होती. सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा