शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

तालुक्यातील २३३० पूरग्रस्त शेतकरी ३ कोटी रुपयांच्या मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST

लाखांदूर : गत खरीप हंगामात पूर, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड यासह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

लाखांदूर : गत खरीप हंगामात पूर, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड यासह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर नुकसानीची दखल घेत शासनाने तालुक्यातील आपादग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला होता. मात्र सदर निधीचा लाभ देतांना शेतक-यांच्या बँक खात्यातील विविध सदोष कारणांनी तालुक्यातील २३३० शेतकरी सुमारे २ कोटी रुपयांच्या मदतीपासून वंचित ठरल्याची खळबळजनक माहिती आहे. सदर प्रकरणी शासन मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना आवश्यक मदत उपलब्ध होण्यासाठी तहसील प्रशासनांतर्गत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार गतवर्षीच्या खरिपात तालुक्यात अतिवृष्टी, कीड व तब्बल तीनदा पूरपरिस्थिती निर्मा. होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर नुकसान तालुक्यातील विरली(बुज), भागडी व लाखांदूर आदी महसूल मंडळांतर्गत झाले होते. सदरप्रकरणी तालुका महसूल प्रशासन व कृषी विभागांतर्गत नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामा करून शासन मदतीसाठी क्षतिग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, सदर याद्यांतर्गत शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक देखील घेण्यात येऊन जवळपास ९ कोटी रुपये पीडित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात आली होती. मात्र, तालुक्यातील २ हजार ३३० शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक सदोष आढळून येतानाच आयएफसी कोड देखील सदोष व बंद बँक खाते असल्याने अनेक पीडित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी जमा न झाल्याची ओरड होती.

सदरप्रकरणी येथील तहसील प्रशासनाने दखल घेत सदोष बँक खात्यांमुळे मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना मदत उपलब्ध होण्यासाठी येथील तहसील प्रशासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली असून लवकरच मदतीपासून वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासन मदत उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती आहे.