शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

लाखांदुरात २२५ क्विंटल धान्य घोटाळा

By admin | Updated: December 9, 2015 00:40 IST

तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात सव्वादोनशे क्विंटल धान्य अपहार झाला होता.

कारवाईची मागणी : बेमुदत उपोषणलाखांदूर : तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात सव्वादोनशे क्विंटल धान्य अपहार झाला होता. याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी ७ डिसेंबरपासून दुर्गाभैय्या राठोड यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.तहसील कार्यालयाअंतर्गत सन २०१२-१३ जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत अळीच लक्ष रूपये किमतीचे दोनशे क्विंटल धान्याची अफरातफर झाल्याचे उघड झाले. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दोषींना पाठिशी घातले. यामुळे दुर्गाभैया राठोड यांनी तहसीलदार, धान्य खरेदी निरीक्षक यांना निलंबीत करण्याची मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चौकीशी केली असता त्यात अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसा अभिप्राय असताना कार्यवाही थंडबस्तात ठेवण्यात आल्याचा आरोप करून राठोड यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे.मात्र यासंबंधाने येथील स्वस्त धान्य दुकानदारांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मंदा ढोरे, केशव चुटे, संघमित्रा लांडगे, गुलाब गभणे, विलास हुमणे यांनी आपली बाजू मांडून धान्य निरीक्षकावर आरोप केले. यात गोदामपाल गडपायले यांनी धान्याची अफरातफर केली असून त्याचा आळ दुकानदारांवर लावण्यात आल्याचे समोर आले आहे. गोदामातील रजिस्टरची तपासणी केली असता त्यामध्ये दुकानदारांनी धान्य उचलल्याबद्दल सह्या रजिस्टरला दिसून आल्या नाही व काही ठिकाणी राजकुमार गडपायले यांनी खोट्या सह्या करून सदर धानाची परस्पर अपरातफर केल्याचा आरोप स्वस्त धान्य दुकानदारांनी केला आहे.तहसीलदार यांचेकडून धान्य मंजूर करण्यात आले नसताना खोटे चालान तयार करून ते चालकाचे पैसे गोदामपलकाने दुकानदारांच्या नावात स्वत:च बँकेत भरल्याचे दिसून आले. त्यामुळे गोदामपाल गडपायले याने अधिकारी व दुकानदारांची फसवणूक केल्याचे लेखी स्वस्त धान्य दुकानदारांनी म्हटले आहे. मात्र भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता संपूर्ण भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)