शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भंडारा जिल्ह्यातील २२२ शेतकऱ्यांना मिळाला ‘सौरऊर्जेचा हात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 10:44 IST

राज्य वीज वितरण कंपनीतर्फे राबविण्यात येत असलेल्या अटल सौर कृषीपंप योजनेंतर्गत २२२ शेतकऱ्यांच्या शेतात सौर उर्जेचा वापर करीत कृषीपंपांची मदत देण्यात आली आहे.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमानआज राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस

इंद्रपाल कटकवार।आॅनलाईन लोकमतभंडारा : राज्य वीज वितरण कंपनीतर्फे राबविण्यात येत असलेल्या अटल सौर कृषीपंप योजनेंतर्गत २२२ शेतकऱ्यांच्या शेतात सौर उर्जेचा वापर करीत कृषीपंपांची मदत देण्यात आली आहे. राष्ट्रीय उर्जा दिवसाच्या निमित्ताने सौर उर्जेच्या वापराकडे नागरिकांचा कल वाढावा हाच शासनाचाही मुख्य उद्देश आहे.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तर्फे मागील वर्षी अटलसौर कृषीपंप योजनेंतर्गत १९५ कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात १५५ नवीन कृषीपंप लावून देण्यात यावे असे वाढीव उद्दिष्टही देण्यात आले. यावर्षी सातही तालुक्यांतर्गत आॅनलाईन नोंदणी अंतर्गत ३१५ लाभार्थ्यांना मागणीपत्र देण्यात आले होते.यापैकी २४७ लाभार्थ्यांनी मागणीपत्र भरल्यानंतर निधीचा भरणा केला होता. यापैकी २२२ शेतकरी लाभार्थ्यांना सौर कृषीपंपाची जोडणी देण्यात आली आहे. उर्वरीत २५ लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाच एकरापर्यंत मिळतो लाभया योजनेअंतर्गत अल्पभूधारक म्हणजेच पाच एकर पर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. याशिवाय १० एकर शेती असलेल्या शेतकरीही कमी सबसिडीवर याचा लाभ घेऊ शकतात. यात ३ एचपी ते ७.५ हार्सपावर क्षमतेचे कृषीपंप संचासह लावून देण्यात येते. सद्यस्थितीत चार दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीने या योजनेचे पोर्टल तात्पुरते बंद केले असून नवीन लाभार्थ्यांना याचा लाभ घेण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेती