शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

२२० केव्हीचे उपकेंद्र सुरू होणार

By admin | Updated: April 30, 2017 00:22 IST

भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था बळकट करण्याकरीता केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशिल आहे.

नाना पटोले : विद्युत व्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार कटीबद्धभंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था बळकट करण्याकरीता केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. विद्युत व्यवस्थेचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो. कमी-अधिक दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतो. यामुळे नागरिकांच्या घरातील उपकरणे बंद पडत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या मध्यभागी साकोली किंवा सौंदड येथे २२० केव्हीचे उपकेंद्र बनविण्यात येणार असून याकरीता ३० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आल्याचे खासदार नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे उपस्थित होते. यावेळी खा.नाना पटोले म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था सुरळीत करण्यासाठी स्ट्रक्चर ऊभारले जाणार आहे. यासाठी महावितरणच्या दोन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. पुढील ५० वर्षात नागरिकांना वीज पुरवठ्यसंदर्भात कोणतीही अडचण येऊ नये याकरीता केंद्र सरकारच्या दीनदयाल उपाध्याय विद्युत बळकटीकरण योजनेंतर्गत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ४,५०० कोटीची कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.वादळ, वारा, पावसामुळे विद्युत खांबावरील वीज तारांच्या एकमेकांचा स्पर्श होवून वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्याकरीता भंडारा, तुमसर व पवनी येथील भूमिगत वीज तारांचे जाळे पसरविण्यात येणार असून उर्वरीत शहरांचा यात समावेश करण्यात येणार आहे. आयपीडीसी योजनेंतर्गत निवडक कार्यालयामध्ये सोलर पॅनलद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येणार असून तो प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सोलर पॅनलद्वारे विद्युत पुरवठा करून वीज बचतीचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले. दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कृषि पंपाची मागणी असून मार्च २०१६ पर्यंतच्या सर्व कृषिपंपाच्या जोडण्या पूर्ण झाल्याचे सांगत कृषी पंपाची थकबाकी ८० कोटीच्या जवळपास असल्याचे सांगितले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धान पिकाची शेती होत असून या पिकाला पाण्याची आवश्यकता असते. शेतकरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत असल्याने पाण्याची पातळी खालावल्याने आज जिल्ह्यातील ४० गावे रेड झोनमध्ये असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)