शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

२०८ गावांना बसणार ५० पेक्षा अधिक पैसेवारीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST

भंडारा : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि महापुरानंतर जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी येईल अशी आशा सर्व शेतकऱ्यांना ...

भंडारा : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि महापुरानंतर जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी येईल अशी आशा सर्व शेतकऱ्यांना हाेती. मात्र दाेन दिवसांपूर्वी घाेषित केलेल्या पैसेवारीत ८८४ गावांपैकी २०८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आहे. त्यामुळे या गावांना दुष्काळी सवलतीचा काेणताही फायदा मिळणार नाही. भंडारा, पवनी, तुमसर आणि माेहाडी या चार तालुक्यातीलच ही सर्व गावे आहेत. साकाेली, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यातील सर्व गावे ५० पेक्षा कमी पैसेवारीत आहेत.

५० पेक्षा कमी पेसेवारी असलेल्या गावांना दुष्काळी सवलती मिळतात. त्यात जमीन महसलात सूट, शेतकऱ्याच्या कर्जाची वसुली सक्तीने न करणे, सहकारी कर्जाचे पुर्नगठण, शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ असा सवलतींचा समावेश असताे. मात्र आता चार तालुक्यातील २०८ गावे या सवलतीपासून वंचित राहणार आहेत. जिल्ह्यात ८९८ गावे असून खरीपाच्या गावांची संख्या ८८४ आहे. त्यापैकी ४० गावांची पैसेवारी घाेषित करण्यात आली नाही. ८४४ गावांपैकी ६३६ गावे ५० पैशापेक्षा कमी आहेत तर २०८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आहे. यात भंडारा तालुक्यातील ४४, पवनी तालुक्यातील ५२, तुमसर तालुक्यातील ४८ आणि माेहाडी तालुक्यातील ६४ गावांचा समावेश आहे. हे चार तालुके भंडारा आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातील आहेत. विशेष म्हणजे साकाेली विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रात येणारे साकाेली, लाखांदूर आणि लाखनी या तीन तालुक्यातील संपूर्ण गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती अतिशय बिकट हाेती. सुरुवातीला अवकाळी पाऊस त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि महापुराचा फटका बसला. यातून शेतकरी सावरत नाही ताेच तुडतुड्याने आक्रमण केले. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या धानाला आग लावून दिली हाेती. हिंमत करून मळणी केलेल्या शेतकऱ्यांना निम्माच उतारा आला.

लागवड खर्चही निघणे कठीण झाले. महागडे बियाणे, मजूर टंचाई आदींचा सामना करताना शेतकरी हतबल झाले आहेत. नैसर्गिक प्रकाेपाने माेडकळीस आले आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी येईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र अंतिम पैसेवारीने २०८ गावांना फटका बसला.

लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. त्यापैकी साकाेली मतदार संघातील सर्व गावे ५० पेक्षा कमी पैसेवारीची आहेत. तर भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदार संघातील ही २०८ गावे आहेत. त्यात भंडारा विधानसभा मतदार संघातील ९६, तुमसर विधानसभा संघातील ११२ गावांचा समावेश आहे. अंतिम पैसेवारी घाेषित हाेऊन दाेन दिवस झाले मात्र लाेकप्रतिनिधींनी याबाबत अवाक्षरही उच्चारले नाही. शासनाने घाेषित केलेल्या या पैसेवारीकडे लाेकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले तर नाही ना, असा सवाल आता निर्माण झाला आहे.