शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२०८ गावांना बसणार ५० पेक्षा अधिक पैसेवारीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST

भंडारा : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि महापुरानंतर जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी येईल अशी आशा सर्व शेतकऱ्यांना ...

भंडारा : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि महापुरानंतर जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी येईल अशी आशा सर्व शेतकऱ्यांना हाेती. मात्र दाेन दिवसांपूर्वी घाेषित केलेल्या पैसेवारीत ८८४ गावांपैकी २०८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आहे. त्यामुळे या गावांना दुष्काळी सवलतीचा काेणताही फायदा मिळणार नाही. भंडारा, पवनी, तुमसर आणि माेहाडी या चार तालुक्यातीलच ही सर्व गावे आहेत. साकाेली, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यातील सर्व गावे ५० पेक्षा कमी पैसेवारीत आहेत.

५० पेक्षा कमी पेसेवारी असलेल्या गावांना दुष्काळी सवलती मिळतात. त्यात जमीन महसलात सूट, शेतकऱ्याच्या कर्जाची वसुली सक्तीने न करणे, सहकारी कर्जाचे पुर्नगठण, शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ असा सवलतींचा समावेश असताे. मात्र आता चार तालुक्यातील २०८ गावे या सवलतीपासून वंचित राहणार आहेत. जिल्ह्यात ८९८ गावे असून खरीपाच्या गावांची संख्या ८८४ आहे. त्यापैकी ४० गावांची पैसेवारी घाेषित करण्यात आली नाही. ८४४ गावांपैकी ६३६ गावे ५० पैशापेक्षा कमी आहेत तर २०८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आहे. यात भंडारा तालुक्यातील ४४, पवनी तालुक्यातील ५२, तुमसर तालुक्यातील ४८ आणि माेहाडी तालुक्यातील ६४ गावांचा समावेश आहे. हे चार तालुके भंडारा आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातील आहेत. विशेष म्हणजे साकाेली विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रात येणारे साकाेली, लाखांदूर आणि लाखनी या तीन तालुक्यातील संपूर्ण गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती अतिशय बिकट हाेती. सुरुवातीला अवकाळी पाऊस त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि महापुराचा फटका बसला. यातून शेतकरी सावरत नाही ताेच तुडतुड्याने आक्रमण केले. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या धानाला आग लावून दिली हाेती. हिंमत करून मळणी केलेल्या शेतकऱ्यांना निम्माच उतारा आला.

लागवड खर्चही निघणे कठीण झाले. महागडे बियाणे, मजूर टंचाई आदींचा सामना करताना शेतकरी हतबल झाले आहेत. नैसर्गिक प्रकाेपाने माेडकळीस आले आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी येईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र अंतिम पैसेवारीने २०८ गावांना फटका बसला.

लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. त्यापैकी साकाेली मतदार संघातील सर्व गावे ५० पेक्षा कमी पैसेवारीची आहेत. तर भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदार संघातील ही २०८ गावे आहेत. त्यात भंडारा विधानसभा मतदार संघातील ९६, तुमसर विधानसभा संघातील ११२ गावांचा समावेश आहे. अंतिम पैसेवारी घाेषित हाेऊन दाेन दिवस झाले मात्र लाेकप्रतिनिधींनी याबाबत अवाक्षरही उच्चारले नाही. शासनाने घाेषित केलेल्या या पैसेवारीकडे लाेकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले तर नाही ना, असा सवाल आता निर्माण झाला आहे.