शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

लग्न स्वागत सोहळ्यात अन्नातून २०० जणांना विषबाधा; लाखांदूर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 17:19 IST

पोटदुखी, उलटी, हगवणीचा त्रास, आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल; सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

दयाल भोवते

लाखांदूर (भंडारा) : लग्न स्वागत सोहळ्यातील अन्नातून सुमारे २०० जणांना विषबाधा होण्याचा प्रकार तालुक्यातील सरांडी बुज. येथे उघडकीस आला. बुधवारी रात्री भोजन केल्यानंतर काहींना गुरूवारी त्रास व्हायला लागला. तर शुक्रवारी अनेकांना पोटदुखी, उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाला. खासगी रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात असून सर्वंची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे.  

सरांडी येथील मदन नामदेवराव ठाकरे यांच्या मुला विवाह २९ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील किन्ही येथे पार पडला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी बुधवार ३० नोव्हेंबर रोजी सरांडी येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास या कार्यक्रमात किन्ही, सरांडी सह नजीकच्या गावातील पाहुण्यांनी हजेरी लावली. मात्र गुरूवारी सकाळी काहींना उलटी, पोटदुखी, हगवण, मळमळीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयांत धाव घेतली. मात्र शुक्रवारी सकाळी अनेकांना त्रास जाणवू लागला. त्यांनी सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली.

यावेळी रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. तसेच बाधित रुग्ण शोधण्यासाठी मोहीम राबविणल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. दोन दिवसापूर्वी घेतलेल्या भाजनातून विषबाधा झाल्याचे पुढे आले असून गावातील सात ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यात काही विद्यार्थ्यांना पोटदुखी व हगवणीचा त्रास असल्याचे सांगण्यात आले.

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

गुरूवारी ८ रुग्ण तर शुक्रवारी सुमारे ६० जणांवर आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यातील सर्वच रुग्ण किरकोळ बाधित होते. तर तीन रुग्णांना सलाईन लावण्यात आली. दोन दिवसांत आलेल्या सर्वच विषबाधित रुग्णांनी प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी विवेक बन्सोड यांनी सांगितले.

अन्नातून विषबाधा झाल्याची घटना तब्बल दोन दिवसानंतर उघडकीस येताच गावातील जवळपास ७ विविध ठिकाणांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. अन्नाचे व तेलाचे नमुने सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात परिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहेत. आशा वर्कर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे.

- डॉ. विवेक बनसोड, वैद्यकीय अधिकारी, सरांडी  

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाHealthआरोग्यbhandara-acभंडारा