शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

२० हजार शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरवर खरीपात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळ आली होती. अनेक शेतकऱ्यांनी सिंचन करुन धान पीक जगविले. त्यानंतर मध्यंतरी जोरदार पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले. धान पीक काढणीची तयारी सुरु असताना दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यासह संपुर्ण विदर्भाला परतीच्या पावसाचा फटका बसला.

ठळक मुद्देदहा कोटींची मागणी : हेक्टरी ८ हजारांचा मदत ठरणार तुटपुंजी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फटका बसला असून प्रशासनाच्या संयुक्त सर्वेक्षणात केवळ ८ हजार ८०६ हेक्टर नुकसान झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील २० हजार ११६ शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने घोषित केलेली हेक्टरी ८ हजाराची मदत अगदी तुटपुंजी ठरणार आहे. त्यामुळे शेतकºयांना पुन्हा रबी हंगामासाठी सावकाराचा दारात जाण्याशिवाय पर्याय नाही.भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरवर खरीपात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळ आली होती. अनेक शेतकऱ्यांनी सिंचन करुन धान पीक जगविले. त्यानंतर मध्यंतरी जोरदार पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले. धान पीक काढणीची तयारी सुरु असताना दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यासह संपुर्ण विदर्भाला परतीच्या पावसाचा फटका बसला. शेतात उभा असलेला धान आणि कापणी झालेल्या धानाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतात धान आडवा झाला होता. तर कडप्याला अंकुर फुटले होते. अशा परिस्थितीत शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा होती.दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसान जिल्हा केवळ ८ हजार ८०६ हेक्टर धान पिकाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यातही कोरडवाहू २७०९ हेक्टर आणि बागायती ६०९७ हेक्टर नुकसान झाल्याचे या अहवालात नमुद आहे.राजकीय अस्थिरतेमुळे मदत कशी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला असताना शासनाने हेक्टरी आठ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत घोषित केले.यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील २० हजार ११६ शेतकºयांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. मात्र आता हेक्टरी आठ हजार मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी दिसत आहे.लाखनी, लाखांदूर, साकोली या तीन तालुक्यातील सर्वाधिक नुकसान झाले आहे. परंतु या शेतकऱ्यांना नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याची कोणतीही आशा नाही. पीक विमा काढलेले शेतकरी अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत आहे. परंतु जाचक अटींमुळे मदत पुरेशी मिळण्याची शक्यता नाही. खरीपाचा हंगाम हातचा गेला. आता रबी हंगाम तोंडावर आहे. मात्र अनेक शेतकºयांजवळ रबी हंगामासाठी पैसेच नाही. त्यामुळे त्यांना सावकारांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही.सरसकट मदतीची अपेक्षाबियाणे आणि मशागतीच्या दरासोबत मजुरीचे दरही वाढले आहे. एकेक कर धान पिकाचा साधारण खर्च २५ हजाराच्या घरात जातो. शासनाने केलेली मदत हेक्टरी असून यामुळे शेतकºयांच्या हाती काहीही उरण्याची शक्यता नाही. गत अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्यां शेतकऱ्यांना सरसकट मदतीची अपेक्षा होती. परंतु शासनाने हेक्टर आठ हजार रुपये मदत घोषित करुन शेतकऱ्यांचा तोंडाला पाने फुसली आहेत. यामुळे शेतकऱ्यांत संताप दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेती