शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरवर खरीपात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळ आली होती. अनेक शेतकऱ्यांनी सिंचन करुन धान पीक जगविले. त्यानंतर मध्यंतरी जोरदार पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले. धान पीक काढणीची तयारी सुरु असताना दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यासह संपुर्ण विदर्भाला परतीच्या पावसाचा फटका बसला.

ठळक मुद्देदहा कोटींची मागणी : हेक्टरी ८ हजारांचा मदत ठरणार तुटपुंजी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फटका बसला असून प्रशासनाच्या संयुक्त सर्वेक्षणात केवळ ८ हजार ८०६ हेक्टर नुकसान झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील २० हजार ११६ शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने घोषित केलेली हेक्टरी ८ हजाराची मदत अगदी तुटपुंजी ठरणार आहे. त्यामुळे शेतकºयांना पुन्हा रबी हंगामासाठी सावकाराचा दारात जाण्याशिवाय पर्याय नाही.भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरवर खरीपात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळ आली होती. अनेक शेतकऱ्यांनी सिंचन करुन धान पीक जगविले. त्यानंतर मध्यंतरी जोरदार पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले. धान पीक काढणीची तयारी सुरु असताना दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यासह संपुर्ण विदर्भाला परतीच्या पावसाचा फटका बसला. शेतात उभा असलेला धान आणि कापणी झालेल्या धानाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतात धान आडवा झाला होता. तर कडप्याला अंकुर फुटले होते. अशा परिस्थितीत शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा होती.दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसान जिल्हा केवळ ८ हजार ८०६ हेक्टर धान पिकाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यातही कोरडवाहू २७०९ हेक्टर आणि बागायती ६०९७ हेक्टर नुकसान झाल्याचे या अहवालात नमुद आहे.राजकीय अस्थिरतेमुळे मदत कशी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला असताना शासनाने हेक्टरी आठ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत घोषित केले.यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील २० हजार ११६ शेतकºयांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. मात्र आता हेक्टरी आठ हजार मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी दिसत आहे.लाखनी, लाखांदूर, साकोली या तीन तालुक्यातील सर्वाधिक नुकसान झाले आहे. परंतु या शेतकऱ्यांना नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याची कोणतीही आशा नाही. पीक विमा काढलेले शेतकरी अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत आहे. परंतु जाचक अटींमुळे मदत पुरेशी मिळण्याची शक्यता नाही. खरीपाचा हंगाम हातचा गेला. आता रबी हंगाम तोंडावर आहे. मात्र अनेक शेतकºयांजवळ रबी हंगामासाठी पैसेच नाही. त्यामुळे त्यांना सावकारांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही.सरसकट मदतीची अपेक्षाबियाणे आणि मशागतीच्या दरासोबत मजुरीचे दरही वाढले आहे. एकेक कर धान पिकाचा साधारण खर्च २५ हजाराच्या घरात जातो. शासनाने केलेली मदत हेक्टरी असून यामुळे शेतकºयांच्या हाती काहीही उरण्याची शक्यता नाही. गत अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्यां शेतकऱ्यांना सरसकट मदतीची अपेक्षा होती. परंतु शासनाने हेक्टर आठ हजार रुपये मदत घोषित करुन शेतकऱ्यांचा तोंडाला पाने फुसली आहेत. यामुळे शेतकऱ्यांत संताप दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेती