शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

२० टक्के पाणी शेतीला तारणार का?

By admin | Updated: August 23, 2015 00:54 IST

सिहोरा परिसरात चांदपुर जलाशयाचे सिंचनासाठी पाणी वाटप करण्यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला असला तरी, जलाशयात २० टक्के पाणी असल्याने १२ हजार हेक्टर आर शेतीला तारणार काय, ...

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात चांदपुर जलाशयाचे सिंचनासाठी पाणी वाटप करण्यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला असला तरी, जलाशयात २० टक्के पाणी असल्याने १२ हजार हेक्टर आर शेतीला तारणार काय, असा सवाल सुद्द शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.सिहोरा परिसरात अल्प पावसाचे प्रमाण असल्याने अनेक हेक्टर आर शेतीत धानाची रोवणी करता आली नाही. टेलवर धानाची नर्सरी पुर्णत: पाया अभावी नेस्तनाबूत झाली आहे. धानाची नर्सरी जळाल्याने शेतकऱ्यांनी उसनवारीचा पर्याय निवडला आहे. डिकला तर पिकला या आशेने धानाची रोवणी करण्याचा प्रयत्न केला आहे. टेलवर पाणी नसल्याने धानाची रोवणी करता आली नाही. याशिवाय ज्या शेतीत धानाची रोवणी करण्यात आली, अशा शेतीत पाणीच नसल्याने रोवणी अडचणीत आली आहे. यामुळे चांदपुर जलाशयाचे सिंचनासाठी पाणी वाटप करण्याची ओरड गावात सुरू झाली आहे. या संदर्भात पाठबंधारे विभागाच्या रनेरा स्थित विश्रामगृहात आ. चरण वाघमारे यांचे प्रतिनिधी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश पटले यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली. या सभेत गावातील सरपंच यांना बोलाविण्यात आले. विशेषत: आजवर शेतकऱ्यांना या बैठकीत सहभागी करण्यात येत होते. परंतु यंदा पाणी वाटपाच्या बैठकीत मात्र चित्र उलटे झाले. दरम्यान चांदपुर जलाशयात २० टक्के पाणी आहे. या जलाशयाला सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने तारले आहे. सध्या स्थित ३ पंपगृह सुरू असून नदी पात्रात अल्प पाणी आहे. प्रकल्पाचे पंपगृह पाणी अभावी कधीही बंद करण्यात येवू शकतात. यामुळे रोवणी झालेल्या धान पिकाला जिवंत ठेवताना कसरत आणि जिकरीचे ठरणार आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.नहर आणि पादचाऱ्या केर कचऱ्यांनी तुंबल्या आहेत. यामुळे पाणी वाटपात नहरांना भगदाड पडणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. पाणी वाटपात कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता तथा शाखा अभियंता हे ठुंकूनही पाहत नाही. यामुळे अमिन यांना शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागतो. अमिन यांची यामुळे धाकधुकी वाढली आहे. असा अनेक समस्या निर्माण असून, नहरांचे सिमेंट अस्तरीकरण निकृष्ठ, मुरूम ऐवजी माती, विकासात भ्रष्टाचार यामुळे शेतकऱ्यांना थेट पाणी मिळत नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर, धनेंद्र तुरकर, प्रतिक्षा कटरे, पंचायत समिती सदस्य सुप्रिया रहांगडाले, विमल कानतोडे, अरिंवद राऊत, राजेंद्र ढबाले, हिरालाल नागपुरे, बंटी बानेवार, गजानन निनावे, बालु तुरकर, उमेश कटरे, उमेश तुरकर, अंबादास कानतोडे, प्रभारी शाखा अभियंता तथा अन्य सरपंच व कर्मचारी उपस्थित होते. (वार्तााहर)