शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात २० शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: April 14, 2016 00:35 IST

मागील चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे.

मदतीसाठी १५ प्रकरणे पात्र : साकोली तालुक्यात सर्वाधिक पाच तर भंडारा तालुक्यात एक आत्महत्याभंडारा : मागील चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत वेगवेगळ्या तालुक्यातील २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक समस्याची तीव्रता आणखीच वाढत असल्याचे शेतकरी आत्महत्यांवरून जाणवत आहे. भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना गत चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना सोसावा लागत आहे. त्या परिस्थितीमुळे पुरेसे उत्पादन घेता येत नाही. त्यातही पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यावर अधिक प्रमाणात खर्च करावा लागतो. दिवाळीनंतर बाजारातील तांदूळ व धानाचे भाव घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी मालाच्या विक्रीसाठी उशिर केला. पण काही केल्या बाजारातील तांदळाचे भाव वाढलेच नाही. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. जानेवारी महिन्यात एकुण १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील नऊ प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरली आहेत. फेब्रुवारी महिन्यात चार शेतकऱ्यांनी गळफास घेतला. ही सर्व चारही प्रकरणे मदतीस पात्र ठरली. मार्च महिन्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील दोन प्रकरणे मदतीस पात्र ठरली. अन्य दोन प्रकरणे चौकशीत आहेत. एप्रिल महिन्यात आतापर्यंत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तालुक्यांचा विचार केल्यास चालू वर्षात आतापर्यंत साकोली तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. लाखांदूर आणि पवनी तालुक्यात प्रत्येकी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तुमसर व लाखनी तालुक्यातील प्रत्येकी तीन शेतकऱ्यांनी तर भंडारा तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. (नगर प्रतिनिधी)निसर्गाच्या चक्रव्यूहात शेतकरीखरीप हंगामात पाठ दाखविणाऱ्या पावसाने रब्बीतही शेतकऱ्यांना गारद केले. मार्च महिन्यात दोनदा अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकरी कमालीचा संकटात सापडला. शेतातील रबी पीक आमराई व पालेभाज्यांचे नुकसान झाले. त्यामुळे नापिकीने शेतकरी पूर्णत: खचला असून त्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. उन्हाळी धानपिकालाही पाणीटंचाई व भारनियमनाचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळच नसल्याचे शेतकऱ्यांच्या समस्यांवरून लक्षात येते. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.