शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे १९ गेट अर्ध्या मीटरने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:58 IST

पवनी तालुक्यातील इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्प अर्थात गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

ठळक मुद्दे८० हजार क्युसेस विसर्गनदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली असून गुरुवारी या प्रकल्पाचे १९ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून ८० हजार ८४२.७५ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पवनी तालुक्यातील इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्प अर्थात गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. प्रकल्पीय एकूण पाणी साठा ११४६.०८ दलघमी असून प्रकल्पीय जीवंत उपयुक्त साठा ७४०.१७ दलघमी आहे. गुरुवारी या जलाशयाची पातळी २४३.८० मीटर नोंदविण्यात आली असून उपयुक्त पाणीसाठा ४०९.४१ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ५५.३१ आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात २८८ मीमी पावसाची आतापर्यंत नोंद करण्यात आली. धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने गुरुवारी या प्रकल्पाचे १९ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. त्यातून ८० हजार ८४२.७५ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढभंडारा शहरालगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गत दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी भंडारा लगतच्या कारधा येथे २४३.८२ मीटर पाणी पातळी मोजण्यात आली. ६ हजार २२८.४४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. कारधा येथे धोकापातळी २४५.५० मीटर असून इशारा पातळी २४५ मीटर आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प