शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या बदलत्या प्रवाहाचा १५५ घरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:03 IST

जीवनदायीनी वैनगंगा नदीचा गत २० वर्षांपासून प्रवाह बदलत असून या बदलत्या प्रवाहाचा फटका तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील १५५ घरांना बसत आहे. वैनगंगा नदीने नदीतिरावरील अर्धा किमी परिसर गिळंकृत केला असून १५५ कुटुंबांचे पुनर्वसन शासनाने केले आहे. मात्र दोन कुटुंब अद्यापही भूखंडाच्या प्रतिक्षेत आहेत.

ठळक मुद्दे रेंगेपार येथील प्रकार : २० वर्षांपासून वैनगंगेचे पात्र सरकते गावाच्या दिशेने

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायीनी वैनगंगा नदीचा गत २० वर्षांपासून प्रवाह बदलत असून या बदलत्या प्रवाहाचा फटका तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील १५५ घरांना बसत आहे. वैनगंगा नदीने नदीतिरावरील अर्धा किमी परिसर गिळंकृत केला असून १५५ कुटुंबांचे पुनर्वसन शासनाने केले आहे. मात्र दोन कुटुंब अद्यापही भूखंडाच्या प्रतिक्षेत आहेत.तुमसर तालुक्यातील रेंगेपार हे गाव वैनगंगा नदीच्या तिरावर आहे. पूर्वी रेंगेपार नदीपात्रापासून एक ते सव्वा किमी दूर होते. मात्र गत वीस वर्षात वैनगंगेचा प्रवाह सतत गावाच्या दिशेने सरकत आहे. परिणामी अर्धा किमी परिसर वैनगंगेने आपल्या कवेत घेतला आहे. शासनाने नदीकाठावरील १५५ कुटुंबांची दखल घेतली. आतापर्यंत ८५ कुटुंबांना भूखंड दिले तर ७० ग्रामस्थांना घरकुल देण्यात आले. यासाठी स्थानिक ग्रामस्थांना शासनाशी मोठा संघर्ष करावा लागला. आंदोलने, मोर्चे, जलसमाधी घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.रेंगेपार येथील गुलाब लटारू कावळे व कलाबाई शेंडे यांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नाही. २० वर्षापूर्वी दोघांनी सदर योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे त्यांना लाभ देता येणार नाही असे प्रशासन सांगत आहे. मात्र ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्याने त्यांची नावे प्रतीक्षा यादीत आली आहेत. ही कुटुंब आजही नदीच्या तिरावर जीव मुठीत घेऊन वास्तव्याला आहेत.रेती उपस्याचा परिणामतुमसर व तिरोडा तालुक्याच्या सीमेतून वैनगंगा नदी वाहते. दरवर्षी रेतीघाटाचा लिलाव केला जातो. तिरोडा सीमेत रेतीसाठा आहे. तर तुमसर तालुक्यात रेतीच्या उपस्याने पात्र खोल झाले आहे. पावसाळ्यात नदीचा प्रवाह तुमसर तालुक्याच्या हद्दीतून वाहतो. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाला मोठी गती असते. त्यामुळे नदी दुथडी खचत आहे. पाण्याचा प्रवाह वळविणे हाच एकमेव उपाय आहे.रेंगेपार येथील नदीघाट अत्यंत धोकादायक झाला आहे. १५५ कुटुंबांना घर सोडून जावे लागले. दोन कुटुंब घरकुलाची प्रतीक्षा करीत आहेत. नदीकाठावरील रस्ता बंद झाल्यास गावाला नवीन बायपास रस्ता शासनाने मंजूर करावा.-हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य

टॅग्स :riverनदी