शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

वैनगंगेच्या बदलत्या प्रवाहाचा १५५ घरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:03 IST

जीवनदायीनी वैनगंगा नदीचा गत २० वर्षांपासून प्रवाह बदलत असून या बदलत्या प्रवाहाचा फटका तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील १५५ घरांना बसत आहे. वैनगंगा नदीने नदीतिरावरील अर्धा किमी परिसर गिळंकृत केला असून १५५ कुटुंबांचे पुनर्वसन शासनाने केले आहे. मात्र दोन कुटुंब अद्यापही भूखंडाच्या प्रतिक्षेत आहेत.

ठळक मुद्दे रेंगेपार येथील प्रकार : २० वर्षांपासून वैनगंगेचे पात्र सरकते गावाच्या दिशेने

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायीनी वैनगंगा नदीचा गत २० वर्षांपासून प्रवाह बदलत असून या बदलत्या प्रवाहाचा फटका तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील १५५ घरांना बसत आहे. वैनगंगा नदीने नदीतिरावरील अर्धा किमी परिसर गिळंकृत केला असून १५५ कुटुंबांचे पुनर्वसन शासनाने केले आहे. मात्र दोन कुटुंब अद्यापही भूखंडाच्या प्रतिक्षेत आहेत.तुमसर तालुक्यातील रेंगेपार हे गाव वैनगंगा नदीच्या तिरावर आहे. पूर्वी रेंगेपार नदीपात्रापासून एक ते सव्वा किमी दूर होते. मात्र गत वीस वर्षात वैनगंगेचा प्रवाह सतत गावाच्या दिशेने सरकत आहे. परिणामी अर्धा किमी परिसर वैनगंगेने आपल्या कवेत घेतला आहे. शासनाने नदीकाठावरील १५५ कुटुंबांची दखल घेतली. आतापर्यंत ८५ कुटुंबांना भूखंड दिले तर ७० ग्रामस्थांना घरकुल देण्यात आले. यासाठी स्थानिक ग्रामस्थांना शासनाशी मोठा संघर्ष करावा लागला. आंदोलने, मोर्चे, जलसमाधी घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.रेंगेपार येथील गुलाब लटारू कावळे व कलाबाई शेंडे यांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नाही. २० वर्षापूर्वी दोघांनी सदर योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे त्यांना लाभ देता येणार नाही असे प्रशासन सांगत आहे. मात्र ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्याने त्यांची नावे प्रतीक्षा यादीत आली आहेत. ही कुटुंब आजही नदीच्या तिरावर जीव मुठीत घेऊन वास्तव्याला आहेत.रेती उपस्याचा परिणामतुमसर व तिरोडा तालुक्याच्या सीमेतून वैनगंगा नदी वाहते. दरवर्षी रेतीघाटाचा लिलाव केला जातो. तिरोडा सीमेत रेतीसाठा आहे. तर तुमसर तालुक्यात रेतीच्या उपस्याने पात्र खोल झाले आहे. पावसाळ्यात नदीचा प्रवाह तुमसर तालुक्याच्या हद्दीतून वाहतो. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाला मोठी गती असते. त्यामुळे नदी दुथडी खचत आहे. पाण्याचा प्रवाह वळविणे हाच एकमेव उपाय आहे.रेंगेपार येथील नदीघाट अत्यंत धोकादायक झाला आहे. १५५ कुटुंबांना घर सोडून जावे लागले. दोन कुटुंब घरकुलाची प्रतीक्षा करीत आहेत. नदीकाठावरील रस्ता बंद झाल्यास गावाला नवीन बायपास रस्ता शासनाने मंजूर करावा.-हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य

टॅग्स :riverनदी