शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

१५ टक्के लागवडक्षेत्र पडित

By admin | Updated: September 17, 2016 00:58 IST

मातीतून सोनं उगवणारा उपाशी मरतो, ही बाब यंदाही अस्मानी संकटाच्या रूपाने प्रत्ययास येऊ लागली आहे.

पाऊस आला तरीही निराशाच : सरासरी ६९ टक्के पाऊसभंडारा : मातीतून सोनं उगवणारा उपाशी मरतो, ही बाब यंदाही अस्मानी संकटाच्या रूपाने प्रत्ययास येऊ लागली आहे. पावसाची चातकासारखी वाट बघणाऱ्या बळीराजावर वरूणराजा प्रसन्न होवून शेतातील धानपिकांना नवसंजीवनी मिळाली. परंतु दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेची तग धरू न शकणाऱ्या जवळपास १५ टक्के धानक्षेत्रातील जमीन रोवणीअभावी पडीत राहण्याची चिन्हे आहेत. परिणामी पाऊस बरसला पण...त्याचा मेलेल्या धनाच्या पेंढींना उपयोग काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाच्या भरवश्यावर उत्पादन अधिक होईल, अशी आशा होती. मात्र पावसाने सुरूवातीला व मध्यांतरी असा दोनवेळा दगा दिला. पोळ्यापूर्वी बरसणारा वरूणराजा गणेशोत्सवात बरसला. धानपिकाला संजीवनी मिळाली. पावसाच्या अपेक्षेत रखडलेलेली रोवणी शेवटपर्यंत झाली नाही. जमिनीला भेगा पडल्या. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण पाऊस बरसला नाही. पंधरा दिवसांपूर्वी जी स्थिती होती, त्यात काही बदल झाला असला तरी गरजेच्या वेळी पाऊस न बसरल्याने रोवणीच्या प्रतीक्षेत असलेली रोपे कोमेजून नष्ट झाली. याचे प्रमाण किती याचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. धान्य उत्पादनावर किती परिणाम होईल ही बाब येणारी वेळ ठरविणार असली तरी, सध्या तरी बळीराजाला मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती असून ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच आहे. दोन वषापुर्वी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होऊन ओल्या दुष्काळाचे संकट बळीराजावर ओढावले होते. दररोज वातावरण ढगाळलेले होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत होता. मागील आठवड्यात ही चिंता वरूणराजाच्या आगमनाने दुर झाली होती. आता पावसाने पुन्हा पाठ फिरविली काय? अशी स्थिती आहे. पिकांवर लष्करी अळी, तुळतुळा आदी रोगाने धान पिके ग्रासलेली आहे. एकीकडे पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे धानावर रोग अशा द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरीवर्ग सापडलेला आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवित पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आला नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित पावसावर अवलंबून असते. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. (प्रतिनिधी)