शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१५ टक्के लागवडक्षेत्र पडित

By admin | Updated: September 17, 2016 00:58 IST

मातीतून सोनं उगवणारा उपाशी मरतो, ही बाब यंदाही अस्मानी संकटाच्या रूपाने प्रत्ययास येऊ लागली आहे.

पाऊस आला तरीही निराशाच : सरासरी ६९ टक्के पाऊसभंडारा : मातीतून सोनं उगवणारा उपाशी मरतो, ही बाब यंदाही अस्मानी संकटाच्या रूपाने प्रत्ययास येऊ लागली आहे. पावसाची चातकासारखी वाट बघणाऱ्या बळीराजावर वरूणराजा प्रसन्न होवून शेतातील धानपिकांना नवसंजीवनी मिळाली. परंतु दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेची तग धरू न शकणाऱ्या जवळपास १५ टक्के धानक्षेत्रातील जमीन रोवणीअभावी पडीत राहण्याची चिन्हे आहेत. परिणामी पाऊस बरसला पण...त्याचा मेलेल्या धनाच्या पेंढींना उपयोग काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाच्या भरवश्यावर उत्पादन अधिक होईल, अशी आशा होती. मात्र पावसाने सुरूवातीला व मध्यांतरी असा दोनवेळा दगा दिला. पोळ्यापूर्वी बरसणारा वरूणराजा गणेशोत्सवात बरसला. धानपिकाला संजीवनी मिळाली. पावसाच्या अपेक्षेत रखडलेलेली रोवणी शेवटपर्यंत झाली नाही. जमिनीला भेगा पडल्या. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण पाऊस बरसला नाही. पंधरा दिवसांपूर्वी जी स्थिती होती, त्यात काही बदल झाला असला तरी गरजेच्या वेळी पाऊस न बसरल्याने रोवणीच्या प्रतीक्षेत असलेली रोपे कोमेजून नष्ट झाली. याचे प्रमाण किती याचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. धान्य उत्पादनावर किती परिणाम होईल ही बाब येणारी वेळ ठरविणार असली तरी, सध्या तरी बळीराजाला मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती असून ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच आहे. दोन वषापुर्वी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होऊन ओल्या दुष्काळाचे संकट बळीराजावर ओढावले होते. दररोज वातावरण ढगाळलेले होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत होता. मागील आठवड्यात ही चिंता वरूणराजाच्या आगमनाने दुर झाली होती. आता पावसाने पुन्हा पाठ फिरविली काय? अशी स्थिती आहे. पिकांवर लष्करी अळी, तुळतुळा आदी रोगाने धान पिके ग्रासलेली आहे. एकीकडे पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे धानावर रोग अशा द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरीवर्ग सापडलेला आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवित पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आला नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित पावसावर अवलंबून असते. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. (प्रतिनिधी)