शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

१४० शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:45 IST

गावासह तेथील नागरिकांच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यावर शासनाने भर दिला आहे.

ठळक मुद्देसिंचनाअभावी शेती पडिक : राजेगाव एमआयडीसीत हरितक्रांतीला अडसर

आॅनलाईन लोकमतभंडारा : गावासह तेथील नागरिकांच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यावर शासनाने भर दिला आहे. मात्र हेच औद्योगिक वसाहत भंडारा तालुक्यातील राजेगाववासीयांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे ठरले आहे. एमआयडीसीमुहे सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने राजेगाव येथील सुमारे २५० एकर शेती बंजर झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या १४० शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.राजेगावजवळून वाहणाऱ्या पाटामुळे येथील शेतकरी शेतीला सिंचन करून उत्पादन घेत होते. १९८२ च्या कालावधीत राज्य शासनाच्या औद्योगिक विकास धोरणानुसार राजेगाव येथे औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्यात आली.यानुसार सदर पाण्याचा प्रवाह असलेला पाट हा औद्योगिक वसाहतीतून मार्गक्रमण करणारा असल्याने तो औद्योगिक प्रक्रियेत समाविष्ट झाला. त्यामुळे या पाटाचे पाणी राजेगाव येथील नागरिकांना मिळणे बंद झाले. त्यामुळे ज्या शेतकºयांनी सिंचनाची व्यवस्था केली अशा शेतकºयांना वगळून अन्य शेतकरी सिंचन सुविधेपासून दूर झाले. त्यामुळे त्यांच्या शेती पडिक झाल्या आहेत. परिणामी शेतकरी शेती असूनही हवालदिल झाला आहे.औद्योगिक क्षेत्राची उभारणी करताना शासनाने येथील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले होते. यानुसार शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतून जाणाºया पाण्याच्या प्रवाहाला विरोध केला असला तरी प्रशासनापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. कालांतराने औद्योगिक वसाहतीमुळे शेतकरी पाण्यापासून व रोजगारापासून वंचित झाले. यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबियावर आर्थिक संकट ओढावले आहेत. २५० एकरातील ‘हरीतक्रांती’ आता ओसाड झाली आहे.औद्योगिक विकासाच्या नावावर ग्रामस्थांची शेती भकास केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवता येत नाही. जिल्हा प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.- शशिकांत भोयर,जिल्हा महासचिव बसपा भंडारा.