शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

१४० शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:45 IST

गावासह तेथील नागरिकांच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यावर शासनाने भर दिला आहे.

ठळक मुद्देसिंचनाअभावी शेती पडिक : राजेगाव एमआयडीसीत हरितक्रांतीला अडसर

आॅनलाईन लोकमतभंडारा : गावासह तेथील नागरिकांच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यावर शासनाने भर दिला आहे. मात्र हेच औद्योगिक वसाहत भंडारा तालुक्यातील राजेगाववासीयांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे ठरले आहे. एमआयडीसीमुहे सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने राजेगाव येथील सुमारे २५० एकर शेती बंजर झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या १४० शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.राजेगावजवळून वाहणाऱ्या पाटामुळे येथील शेतकरी शेतीला सिंचन करून उत्पादन घेत होते. १९८२ च्या कालावधीत राज्य शासनाच्या औद्योगिक विकास धोरणानुसार राजेगाव येथे औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्यात आली.यानुसार सदर पाण्याचा प्रवाह असलेला पाट हा औद्योगिक वसाहतीतून मार्गक्रमण करणारा असल्याने तो औद्योगिक प्रक्रियेत समाविष्ट झाला. त्यामुळे या पाटाचे पाणी राजेगाव येथील नागरिकांना मिळणे बंद झाले. त्यामुळे ज्या शेतकºयांनी सिंचनाची व्यवस्था केली अशा शेतकºयांना वगळून अन्य शेतकरी सिंचन सुविधेपासून दूर झाले. त्यामुळे त्यांच्या शेती पडिक झाल्या आहेत. परिणामी शेतकरी शेती असूनही हवालदिल झाला आहे.औद्योगिक क्षेत्राची उभारणी करताना शासनाने येथील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले होते. यानुसार शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतून जाणाºया पाण्याच्या प्रवाहाला विरोध केला असला तरी प्रशासनापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. कालांतराने औद्योगिक वसाहतीमुळे शेतकरी पाण्यापासून व रोजगारापासून वंचित झाले. यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबियावर आर्थिक संकट ओढावले आहेत. २५० एकरातील ‘हरीतक्रांती’ आता ओसाड झाली आहे.औद्योगिक विकासाच्या नावावर ग्रामस्थांची शेती भकास केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवता येत नाही. जिल्हा प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.- शशिकांत भोयर,जिल्हा महासचिव बसपा भंडारा.