शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

130 गावांना पुराचा धोका; लाईफ गार्ड, लाईफ जॅकेटसह रबर बोट तयार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 05:00 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीसाठी संपूर्ण तयारी केली आहे. तालुकास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून ही यंत्रणा २४ तास अलर्ट राहणार आहे. तसेच प्रशिक्षण व बचाव साहित्याची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्थळी माॅकड्रील घेतली जाणार आहे. संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून राहतील.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : दरवर्षी वैनगंगा, चुलबंद, सूर, कन्हान, बावनथडी नद्यांचा भंडारा जिल्ह्यातील तब्बल १३० गावांना पुराचा फटका बसतो. दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुराच्या अनुभवातून आता प्रशासन सतर्क झाले असून आता आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीसाठी संपूर्ण तयारी केली आहे. तालुकास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून ही यंत्रणा २४ तास अलर्ट राहणार आहे. तसेच प्रशिक्षण व बचाव साहित्याची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्थळी माॅकड्रील घेतली जाणार आहे. संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून राहतील.

कोणत्या तालुक्यात किती गावांना पुराचा धोका? तालुका    धोका असलेली गावेभंडारा           २७मोहाडी         १७तुमसर          २४पवनी            ३३साकोली       ०३लाखांदूर       १८लाखनी        ०९

- बचाव पथकातील कर्मचारी लाईफ गार्ड यांना प्रत्येक तालुका ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

२५ बोट सज्ज, २५० लाईफ जॅकेट-  पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी २३ रबरी बोट, दोन फायबर बोट, २५० लाईफ जॅकेट आणि २०० लाईफ गार्ड सज्ज झाले आहे.-  उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांचे पथक पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना करणार आहे.

या ठिकाणी येतो पूर

भंडारा तालुक्यातील करचखेडा, पिंडकेपार, पहेला, कारधा, भंडारा शहर, पवनी तालुक्यातील पवनाखुर्द, जुनोना, मांगली, तुमसर तालुक्यातील कर्कापूर, सुकळी, रेंगेपार, बपेरा, मोहाडी तालुक्यातील मुंढरी, कन्हाळगाव, करडी, लाखांदूर तालुक्यातील आवळी, मासळ, सोनी या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो.

बचाव साहित्य वितरित -  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने शुक्रवारपासून बचाव साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.-  पूरबाधित गावांना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे पथक प्रत्येक पूरबाधित गावाला भेट देणार आहेत. जिल्हाधिकारी आकस्मिक भेट देणार आहे.

तालुका नियंत्रण कक्ष २४ तास अलर्ट- सात तालुका ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून तेथे पाच कर्मचारी राहतील- जिल्हा नियंत्रण कक्षातून सर्व सूचनांचे आदान-प्रदान पूरकाळात केले जाणार आहे.

 

टॅग्स :floodपूर