शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

130 गावांना पुराचा धोका; लाईफ गार्ड, लाईफ जॅकेटसह रबर बोट तयार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 05:00 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीसाठी संपूर्ण तयारी केली आहे. तालुकास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून ही यंत्रणा २४ तास अलर्ट राहणार आहे. तसेच प्रशिक्षण व बचाव साहित्याची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्थळी माॅकड्रील घेतली जाणार आहे. संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून राहतील.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : दरवर्षी वैनगंगा, चुलबंद, सूर, कन्हान, बावनथडी नद्यांचा भंडारा जिल्ह्यातील तब्बल १३० गावांना पुराचा फटका बसतो. दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुराच्या अनुभवातून आता प्रशासन सतर्क झाले असून आता आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीसाठी संपूर्ण तयारी केली आहे. तालुकास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून ही यंत्रणा २४ तास अलर्ट राहणार आहे. तसेच प्रशिक्षण व बचाव साहित्याची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्थळी माॅकड्रील घेतली जाणार आहे. संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून राहतील.

कोणत्या तालुक्यात किती गावांना पुराचा धोका? तालुका    धोका असलेली गावेभंडारा           २७मोहाडी         १७तुमसर          २४पवनी            ३३साकोली       ०३लाखांदूर       १८लाखनी        ०९

- बचाव पथकातील कर्मचारी लाईफ गार्ड यांना प्रत्येक तालुका ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

२५ बोट सज्ज, २५० लाईफ जॅकेट-  पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी २३ रबरी बोट, दोन फायबर बोट, २५० लाईफ जॅकेट आणि २०० लाईफ गार्ड सज्ज झाले आहे.-  उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांचे पथक पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना करणार आहे.

या ठिकाणी येतो पूर

भंडारा तालुक्यातील करचखेडा, पिंडकेपार, पहेला, कारधा, भंडारा शहर, पवनी तालुक्यातील पवनाखुर्द, जुनोना, मांगली, तुमसर तालुक्यातील कर्कापूर, सुकळी, रेंगेपार, बपेरा, मोहाडी तालुक्यातील मुंढरी, कन्हाळगाव, करडी, लाखांदूर तालुक्यातील आवळी, मासळ, सोनी या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो.

बचाव साहित्य वितरित -  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने शुक्रवारपासून बचाव साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.-  पूरबाधित गावांना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे पथक प्रत्येक पूरबाधित गावाला भेट देणार आहेत. जिल्हाधिकारी आकस्मिक भेट देणार आहे.

तालुका नियंत्रण कक्ष २४ तास अलर्ट- सात तालुका ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून तेथे पाच कर्मचारी राहतील- जिल्हा नियंत्रण कक्षातून सर्व सूचनांचे आदान-प्रदान पूरकाळात केले जाणार आहे.

 

टॅग्स :floodपूर