शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

१३ शाळांचा वाजणार ‘दि एण्ड’चा ठोका!

By admin | Updated: May 6, 2015 00:46 IST

जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे मराठी शाळा ओस पडत

प्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या जिल्ह्यातील तेरा शाळांमधील पटसंख्या चारच्या आत असल्याने पूर्णत: दैनावस्था झाली आहे. या शाळांचा ‘दि एण्ड’चा ठोका कधीही वाजू शकतो, अशी परिस्थिती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटची संस्कृती सर्वत्र फोफावली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात पाल्य टिकला पाहिजे, यासाठी पालक मुलांना कान्व्हेंटमध्ये घालतात. यामुळे मात्र, जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी व नगरपालिकेच्या तेरा शाळा शेवटच्या घटका मोजत आहे.सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षण विभागाची अद्ययावत माहिती संग्रहीत करण्याची प्रक्रीया यू-डायसच्या माध्यमातून सुरू आहे. शैक्षणिक सत्र २०१४-१५ ची माहिती शिक्षण विभागाने संग्रहीत केली आहे. यात जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती प्राप्त झाली आहे. ही माहिती शिक्षण विभागासाठी धक्कादायक आहे. शाळांची पटसंख्या ३० असणे आवश्यक आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभाग शर्थीचे प्रयत्न करीत असले तरी, जिल्हा परिषद शाळांमध्ये पाल्यांना शिकविण्याचा पालकांचा कल नसल्याने या शाळांवर अवकळा पसरली आहे.सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात १० शाळा होत्या. त्यात केवळ २८ विद्यार्थी व २० शिक्षक होते. तर २०१४-१५ या चालू शैक्षणिक सत्रात शाळांची संख्या कमी होण्याऐवजी वाढून ती तेरावर पोहचली. या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ५३ असून शिक्षक ३१ आहेत. मागील वर्षी जिल्हा परिषदच्या आठ व अन्य दोन शाळांचा तर यावर्षी जिल्हा परिषदच्या दहा व अन्य तीन शाळांचा समावेश आहे. पटसंख्या कमी असली तरी, या शाळांवर शासनाने दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यात अनेक शाळांवर पटसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी असतानाही तिथे शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करून तेथील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केल्यास लाखोंचा खर्च वाचेल. जिल्ह्यातील तेरा शाळांमधील पटसंख्येचा विचार केल्यास अत्यंत दयनिय अवस्थेत जिल्हा परिषद शाळा असल्याचे निदर्शनात येते.जिल्हा मुख्यालयात शिक्षणाचा ‘आयचा घो’जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात मराठी शाळांची वाट लागली आहे. भंडारा पंचायत समितीत मागील वर्षी पटसंख्या चारपेक्षा कमी असलेल्या दोन शाळा होत्या. यावर्षी या शाळांची संख्या कमी होण्याऐवजी यात तब्बल चार शाळांची वाढ होऊन संख्या सहावर पोहचली आहे. शिक्षण विभागासाठी हा आत्मचिंतनाचा विषय आहे.या आहेत ‘तेरा’ शाळाभंडारा येथील नगरपालिकेची नेहरू विद्यालय, नर्मदा प्राथमिक शाळा, शासकीय अंध विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किटाळी, ठाणा, पेवधा. तुमसर तालुक्यातील सक्करदरा, साकोली येथील मक्कीटोला, लाखनी तालुक्यातील मानेगाव येथील एआयएम, पवनी तालुक्यातील चार शाळा ज्यात जिल्हा परिषद सोमनाळा (खु.), चुल्हाड, पन्नाशी व महालगाव या शाळांचा समावेश आहे.पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढला आहे. त्यामुळे पाल्याला कॉन्व्हेंटमध्ये शिकवितात. तसेच गावात भरतीस पात्र विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या नसावी, त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.- स्वर्णलता घोडेस्वारउपशिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, भंडारा.