शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

१३ शाळांचा वाजणार ‘दि एण्ड’चा ठोका!

By admin | Updated: May 6, 2015 00:46 IST

जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे मराठी शाळा ओस पडत

प्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या जिल्ह्यातील तेरा शाळांमधील पटसंख्या चारच्या आत असल्याने पूर्णत: दैनावस्था झाली आहे. या शाळांचा ‘दि एण्ड’चा ठोका कधीही वाजू शकतो, अशी परिस्थिती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटची संस्कृती सर्वत्र फोफावली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात पाल्य टिकला पाहिजे, यासाठी पालक मुलांना कान्व्हेंटमध्ये घालतात. यामुळे मात्र, जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी व नगरपालिकेच्या तेरा शाळा शेवटच्या घटका मोजत आहे.सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षण विभागाची अद्ययावत माहिती संग्रहीत करण्याची प्रक्रीया यू-डायसच्या माध्यमातून सुरू आहे. शैक्षणिक सत्र २०१४-१५ ची माहिती शिक्षण विभागाने संग्रहीत केली आहे. यात जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती प्राप्त झाली आहे. ही माहिती शिक्षण विभागासाठी धक्कादायक आहे. शाळांची पटसंख्या ३० असणे आवश्यक आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभाग शर्थीचे प्रयत्न करीत असले तरी, जिल्हा परिषद शाळांमध्ये पाल्यांना शिकविण्याचा पालकांचा कल नसल्याने या शाळांवर अवकळा पसरली आहे.सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात १० शाळा होत्या. त्यात केवळ २८ विद्यार्थी व २० शिक्षक होते. तर २०१४-१५ या चालू शैक्षणिक सत्रात शाळांची संख्या कमी होण्याऐवजी वाढून ती तेरावर पोहचली. या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ५३ असून शिक्षक ३१ आहेत. मागील वर्षी जिल्हा परिषदच्या आठ व अन्य दोन शाळांचा तर यावर्षी जिल्हा परिषदच्या दहा व अन्य तीन शाळांचा समावेश आहे. पटसंख्या कमी असली तरी, या शाळांवर शासनाने दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यात अनेक शाळांवर पटसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी असतानाही तिथे शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करून तेथील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केल्यास लाखोंचा खर्च वाचेल. जिल्ह्यातील तेरा शाळांमधील पटसंख्येचा विचार केल्यास अत्यंत दयनिय अवस्थेत जिल्हा परिषद शाळा असल्याचे निदर्शनात येते.जिल्हा मुख्यालयात शिक्षणाचा ‘आयचा घो’जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात मराठी शाळांची वाट लागली आहे. भंडारा पंचायत समितीत मागील वर्षी पटसंख्या चारपेक्षा कमी असलेल्या दोन शाळा होत्या. यावर्षी या शाळांची संख्या कमी होण्याऐवजी यात तब्बल चार शाळांची वाढ होऊन संख्या सहावर पोहचली आहे. शिक्षण विभागासाठी हा आत्मचिंतनाचा विषय आहे.या आहेत ‘तेरा’ शाळाभंडारा येथील नगरपालिकेची नेहरू विद्यालय, नर्मदा प्राथमिक शाळा, शासकीय अंध विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किटाळी, ठाणा, पेवधा. तुमसर तालुक्यातील सक्करदरा, साकोली येथील मक्कीटोला, लाखनी तालुक्यातील मानेगाव येथील एआयएम, पवनी तालुक्यातील चार शाळा ज्यात जिल्हा परिषद सोमनाळा (खु.), चुल्हाड, पन्नाशी व महालगाव या शाळांचा समावेश आहे.पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढला आहे. त्यामुळे पाल्याला कॉन्व्हेंटमध्ये शिकवितात. तसेच गावात भरतीस पात्र विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या नसावी, त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.- स्वर्णलता घोडेस्वारउपशिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, भंडारा.