शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची 12 काेटी 75 लाख थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८९८ महसुली गावे आहेत. प्रत्येक गावात पथदिवे आहेत. वीज वितरणकडे या पथदिव्यांचे नाेंदणीकृत १२०० ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल १०९७ ग्राहक थकबाकीदार आहेत. तीन वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे गत महिन्यांभरापासून वीज वितरणने धडक माेहीम हाती घेतली त्याअंतर्गत पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे.

ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे वीज बिल कुणी भरावे यावरून वादविवाद सुरू असून थकीत वीज बिलापाेटी वीज वितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या १०९७ ग्राहकांकडे तीन वर्षांपासून १२ काेटी ७५ लाख रुपये थकीत आहे. वीज वितरणने गत आठवड्यात ५६ ग्रामपंचायतीच्या वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.भंडारा जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८९८ महसुली गावे आहेत. प्रत्येक गावात पथदिवे आहेत. वीज वितरणकडे या पथदिव्यांचे नाेंदणीकृत १२०० ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल १०९७ ग्राहक थकबाकीदार आहेत. तीन वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे गत महिन्यांभरापासून वीज वितरणने धडक माेहीम हाती घेतली त्याअंतर्गत पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील १०९७ पथदिवे ग्राहकांकडे १२ काेटी ७५ लाख रुपये थकीत असून सर्वाधिक रक्कम भंडारा तालुक्यातील १९७ ग्राहकांकडे दाेन काेटी ७४ लाख रुपये आहे.पूर्वी ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे वीज बिल शासन स्तरावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरले जात हाेते. त्यामुळे वीज बिलाची ग्रामपंचायतींना चिंता नव्हती. परंतु आता शासनाने हात वर केले असून ग्रामपंचायतींनाच पथदिव्याचे बिल भरावयाचे आहे. अनेक ग्रामपंचायतीकडे उत्पन्नाचे स्त्राेत नसल्याने पथदिव्यांचे वीज बिल थकीत राहिले. त्यातच आता वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले. त्यामुळे पावसाळ्यात आणि सणासुदीच्या दिवसात गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

वीज खंडीत करण्याची माेहीम थांबविलीवीज वितरण कंपनीने गत आठवड्यात वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम हाती घेतली हाेती. मात्र आता ती काही काळासाठी थांबविण्यात आली आहे. एप्रिल २०२१ नंतर आलेले वीज बिल ग्रामपंचायतींना भरावयाचे आहे. मात्र त्यापूर्वीचे वीज बिल काेण भरणार यावर अद्याप एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम थांबविल्याची माहिती आहे.पाणीपुरवठा याेजनांकडे २ काेटी ७० लाख थकीतजिल्ह्यातील ७६१ पाणीपुरवठा ग्राहकांपैकी तब्बल ५६२ पाणीपुरवठा याेजनांकडे वीज वितरण कंपनीचे दाेन काेटी ७० लाख रुपये थकीत आहेत. वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने या सर्वांना नाेटीस बजावली आहे. ३९ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींनी थकबाकी तातडीने भरून अप्रिय कारवाई टाळावी, तूर्तास वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम स्थगित करण्यात आली आहे. मात्र लवकरच पुन्हा माेहीम हाती घेतली जाणार आहे. ग्रामपंचायतीकडे माेठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने कारवाई करण्याची वेळ आली.- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता,वीज वितरण कंपनी भंडारा

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज