शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची 12 काेटी 75 लाख थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८९८ महसुली गावे आहेत. प्रत्येक गावात पथदिवे आहेत. वीज वितरणकडे या पथदिव्यांचे नाेंदणीकृत १२०० ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल १०९७ ग्राहक थकबाकीदार आहेत. तीन वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे गत महिन्यांभरापासून वीज वितरणने धडक माेहीम हाती घेतली त्याअंतर्गत पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे.

ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे वीज बिल कुणी भरावे यावरून वादविवाद सुरू असून थकीत वीज बिलापाेटी वीज वितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या १०९७ ग्राहकांकडे तीन वर्षांपासून १२ काेटी ७५ लाख रुपये थकीत आहे. वीज वितरणने गत आठवड्यात ५६ ग्रामपंचायतीच्या वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.भंडारा जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८९८ महसुली गावे आहेत. प्रत्येक गावात पथदिवे आहेत. वीज वितरणकडे या पथदिव्यांचे नाेंदणीकृत १२०० ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल १०९७ ग्राहक थकबाकीदार आहेत. तीन वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे गत महिन्यांभरापासून वीज वितरणने धडक माेहीम हाती घेतली त्याअंतर्गत पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील १०९७ पथदिवे ग्राहकांकडे १२ काेटी ७५ लाख रुपये थकीत असून सर्वाधिक रक्कम भंडारा तालुक्यातील १९७ ग्राहकांकडे दाेन काेटी ७४ लाख रुपये आहे.पूर्वी ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे वीज बिल शासन स्तरावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरले जात हाेते. त्यामुळे वीज बिलाची ग्रामपंचायतींना चिंता नव्हती. परंतु आता शासनाने हात वर केले असून ग्रामपंचायतींनाच पथदिव्याचे बिल भरावयाचे आहे. अनेक ग्रामपंचायतीकडे उत्पन्नाचे स्त्राेत नसल्याने पथदिव्यांचे वीज बिल थकीत राहिले. त्यातच आता वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले. त्यामुळे पावसाळ्यात आणि सणासुदीच्या दिवसात गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

वीज खंडीत करण्याची माेहीम थांबविलीवीज वितरण कंपनीने गत आठवड्यात वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम हाती घेतली हाेती. मात्र आता ती काही काळासाठी थांबविण्यात आली आहे. एप्रिल २०२१ नंतर आलेले वीज बिल ग्रामपंचायतींना भरावयाचे आहे. मात्र त्यापूर्वीचे वीज बिल काेण भरणार यावर अद्याप एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम थांबविल्याची माहिती आहे.पाणीपुरवठा याेजनांकडे २ काेटी ७० लाख थकीतजिल्ह्यातील ७६१ पाणीपुरवठा ग्राहकांपैकी तब्बल ५६२ पाणीपुरवठा याेजनांकडे वीज वितरण कंपनीचे दाेन काेटी ७० लाख रुपये थकीत आहेत. वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने या सर्वांना नाेटीस बजावली आहे. ३९ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींनी थकबाकी तातडीने भरून अप्रिय कारवाई टाळावी, तूर्तास वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम स्थगित करण्यात आली आहे. मात्र लवकरच पुन्हा माेहीम हाती घेतली जाणार आहे. ग्रामपंचायतीकडे माेठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने कारवाई करण्याची वेळ आली.- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता,वीज वितरण कंपनी भंडारा

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज