शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

११,७७७ शेतकऱ्यांसाठी १.३४ कोटींची गरज

By admin | Updated: April 1, 2015 00:34 IST

२८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भंडारा व मोहाडी तालुक्यातील १,६०१.४८ हेक्टर आर क्षेत्रातील पिकांना ५० टक्केपेक्षा जास्त नुकसानीचा फटका बसला.

देवानंद नंदेश्वर भंडारा२८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भंडारा व मोहाडी तालुक्यातील १,६०१.४८ हेक्टर आर क्षेत्रातील पिकांना ५० टक्केपेक्षा जास्त नुकसानीचा फटका बसला. नुकसान भरपाईपाकरीता ११,७७७ शेतकऱ्यासाठी १ कोटी ३४ लाख ४६ हजार रुपयांची गरज आहे, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला नुकताच पाठविला आहे.भंडारा, साकोली व लाखांदूर तालुक्यात २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अतिवृष्टी झाल्याने गहू, हरभरा, जवस व लाखोळी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी आटोपत असतानाच शेतातील पिके कापणीयोग्य झाली होती. जिल्ह्यात गहू पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली. गव्हाची ओंबी आल्याने ती कापणीयोग्य झाली असतानाच अवकाळी पावसाचे आगमन झाले. गहू, हरभरा, जवस व लाखोळीचे रब्बी हंगामात मोठ्या हंगामात उत्पादन घेतल्या जाते. यासोबतच काही ठिकाणी बागायती शेती करण्यात येते. मात्र अवकाळी पावसामुळे या पिकांना मोठ्या पिकांना फटका बसला आहे. १ मार्चच्या मध्यरात्री भंडारा, साकोली व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे येथील शेतीत कापणीयोग्य असलेल्या गहू पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, यादृष्टीने जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर असलेल्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्राथमिक नजरअंदाज अहवाल मागितला. या अहवालात ७ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद होते. यात ५० टक्केच्या आत ६ हजार १७९ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले असून ५० टक्केच्या वरील १ हजार ३६० हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. अवकाळी पावसात बहरलेला आंब्याचा मोहोर गळून पडला होता. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला नुकताच अंतिम अहवाल पाठविला आहे. यात २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भंडारा व मोहाडी तालुक्यातील १,६०१.४८ हेक्टर आर क्षेत्रातील पिकांना ५० टक्केपेक्षा जास्त नुकसानीचा ११ हजार ७७७ शेतकऱ्यांना फटका बसला. यात जिल्ह्यातील केवळ भंडारा व मोहाडी तालुक्याचा समावेश आहे.भंडारा तालुक्यातील ५९९.२० हेक्टर क्षेत्रातील विविध जिरायती पिकांचे तर १ हेक्टर क्षेत्रातील आंबा फळपिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मोहाडी तालुक्यातील ९८२.३३ हेक्टर क्षेत्रातील विविध जिरायती पिकांचे तर १८.९५ हेक्टर क्षेत्रातील आंबा फळपिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यातील १,५८१.५३ हेक्टर क्षेत्रातील विविध जिरायती पिकांचे तर १९.९५ हेक्टर क्षेत्रातील आंबा फळपिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतिक्षा आहे.