शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

११,७७७ शेतकऱ्यांसाठी १.३४ कोटींची गरज

By admin | Updated: April 1, 2015 00:34 IST

२८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भंडारा व मोहाडी तालुक्यातील १,६०१.४८ हेक्टर आर क्षेत्रातील पिकांना ५० टक्केपेक्षा जास्त नुकसानीचा फटका बसला.

देवानंद नंदेश्वर भंडारा२८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भंडारा व मोहाडी तालुक्यातील १,६०१.४८ हेक्टर आर क्षेत्रातील पिकांना ५० टक्केपेक्षा जास्त नुकसानीचा फटका बसला. नुकसान भरपाईपाकरीता ११,७७७ शेतकऱ्यासाठी १ कोटी ३४ लाख ४६ हजार रुपयांची गरज आहे, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला नुकताच पाठविला आहे.भंडारा, साकोली व लाखांदूर तालुक्यात २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अतिवृष्टी झाल्याने गहू, हरभरा, जवस व लाखोळी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी आटोपत असतानाच शेतातील पिके कापणीयोग्य झाली होती. जिल्ह्यात गहू पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली. गव्हाची ओंबी आल्याने ती कापणीयोग्य झाली असतानाच अवकाळी पावसाचे आगमन झाले. गहू, हरभरा, जवस व लाखोळीचे रब्बी हंगामात मोठ्या हंगामात उत्पादन घेतल्या जाते. यासोबतच काही ठिकाणी बागायती शेती करण्यात येते. मात्र अवकाळी पावसामुळे या पिकांना मोठ्या पिकांना फटका बसला आहे. १ मार्चच्या मध्यरात्री भंडारा, साकोली व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे येथील शेतीत कापणीयोग्य असलेल्या गहू पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, यादृष्टीने जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर असलेल्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्राथमिक नजरअंदाज अहवाल मागितला. या अहवालात ७ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद होते. यात ५० टक्केच्या आत ६ हजार १७९ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले असून ५० टक्केच्या वरील १ हजार ३६० हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. अवकाळी पावसात बहरलेला आंब्याचा मोहोर गळून पडला होता. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला नुकताच अंतिम अहवाल पाठविला आहे. यात २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भंडारा व मोहाडी तालुक्यातील १,६०१.४८ हेक्टर आर क्षेत्रातील पिकांना ५० टक्केपेक्षा जास्त नुकसानीचा ११ हजार ७७७ शेतकऱ्यांना फटका बसला. यात जिल्ह्यातील केवळ भंडारा व मोहाडी तालुक्याचा समावेश आहे.भंडारा तालुक्यातील ५९९.२० हेक्टर क्षेत्रातील विविध जिरायती पिकांचे तर १ हेक्टर क्षेत्रातील आंबा फळपिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मोहाडी तालुक्यातील ९८२.३३ हेक्टर क्षेत्रातील विविध जिरायती पिकांचे तर १८.९५ हेक्टर क्षेत्रातील आंबा फळपिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यातील १,५८१.५३ हेक्टर क्षेत्रातील विविध जिरायती पिकांचे तर १९.९५ हेक्टर क्षेत्रातील आंबा फळपिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतिक्षा आहे.