शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जलयुक्तच्या २३८ कामांवर १.१६ कोटींचा खर्च

By admin | Updated: June 17, 2017 00:23 IST

सन २०१६-१७ यावर्षात मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३५१ कामे विविध विभागांमार्फत प्रस्तावित करण्यात आली होती.

७५ कामे अपूर्ण : ९८ हेक्टरला होणार सिंचनाचा लाभयुवराज गोमासे । लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सन २०१६-१७ यावर्षात मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३५१ कामे विविध विभागांमार्फत प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी एकूण ३८ कामे वर्षभरात सुरू केली नाही. तर ४० कामे रद्द करण्यात आली. ३१३ कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी २३८ कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आली. तर उर्वरित ७५ कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर १ कोटी १६ लक्ष ५ हजार १७५ रूपयांचा खर्च झाला असून ९८.७ हेक्टर क्षेत्राला ओलीताची सोय सन २०१७-१८ मध्ये होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.जलयुक्त शिवार या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये एकूण १० गावे समाविष्ट होती. गावांमध्ये मुलभूत ओलीतांच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी कृषी विभाग मोहाडी, पंचायत समिती, जि.प. लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा, वनविभाग, पेंच व्यवस्थापन, भुजन सर्व्हेक्षण आदी विभागाने कामे केली गेली. कृषी विभागाअंतर्गत चार शेततळे पूर्ण झाली. १० दिवसापैकी ६ कामे पुर्ण झाली. चार प्रगतीपथावर आहेत. सहा सिमेंट बंधारा दुरूस्तीपैकी दोन कामे पूर्ण तर चार कामे पूर्ण होण्याच्या टप्यात आहेत. मोहाडी पं.स. अंतर्गत मजगीची चार कामे करण्यात आली. मजगी पुनर्जिवनाची १३५ कामापैकी १०३ कामे पूर्ण झाली तर ३२ कामे प्रगतीपथावर आहेत. एकूण १३९ कामापैकी १०७ कामे पूर्ण तर ३२ कामे अपूर्ण आहेत. यावर ४०,५५,०९५ लक्ष रूपयांचा खर्च होवून ३१.४५ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. जि.प. लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा अंतर्गत सिनाबाची सात कामे पूर्ण झाली. साठवण बंधाऱ्यांच्या पाच कामापैकी एक काम पूर्ण होवून चार कामे अपूर्ण आहेत. साठवण बंधारा दुरूस्ती व खोलीकरणाची सहा पैकी चार कामे पूर्ण तर दोन कामे प्रगतीपथावर आहेत. केटीवेअर दुरूस्तीचे पाच पैकी एक काम पूर्ण तर चार कामे अपूर्ण आहेत. मामा तलाव दुरूस्तीची सात कामे अपूर्ण आहेत. एकूण ३० कामापैकी सहा कामे पूर्ण तर २४ कामे अपूर्ण आहेत यावर आतापर्यंत फक्त दोन लाख सहा हजाराचा खर्च झालेला आहे.सामाजिक वनीकरण,लघु पाटबंधारे नापाससन २०१६-१७ वर्षात सामाजिक वनकरण विभागाचे वतीने नियोजनाच्या आखाड्यात वृक्ष लागवडीचे फक्त एक काम प्रस्तावित करण्यात आले होते. तर पाटबंधारे श्रेणी एकच्या वतीने कालवा दुरूस्तीचे दोन व लपा तलाव दुरूस्तीचे एक असे तीन कामे प्रस्तावित केली होती. परंतु दोन्ही विभागाला वर्षभरात एकही काम सुरू करता आले नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेसाठी दोन्ही विभाग नापास ठरल्याचे दिसून येते.