शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

धानाचे १११ कोटींचे चुकारे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

इंद्रपाल कटकवार। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात बळीराजाला कधी अस्मानी तर कधी सुलतानी ...

ठळक मुद्दे१९ लाख क्विंटल धान खरेदी : केंद्र वाढवूनही सुविधांची वानवा कायम

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात बळीराजाला कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामांतर्गत ८५ धान खरेदी केंद्र सुरु असून शेतकऱ्यांचे १११ कोटी ५९ लक्ष रुपयांचे चुकारे थकीत आहे. परिणामी बळीराजाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.पावसाच्या उशिरा आगमनानंतर धानपिकही उशिरा निघाले. १ नोव्हेंबर पासून शासनाने धान खरेदी केंद्र सुरु केले. तत्पूर्वी भंडारा जिल्ह्यात फक्त ६३ केंद्र सुरु झाले होते. त्यानंतर मागणीनुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून आता ८४ केंद्रांमधून धानाची खरेदी सुरु आहे. एक केंद्र लवकरच सुरु होणार असल्याचे फेडरेशनने सांगितले आहे. बुधवारपर्यंत ३० हजार ८९६ क्विंटल अ ग्रेड धानाची खरेदी करण्यात आली होती. तर धानाची एकुण खरेदी १९ लक्ष ६ हजार ५६६ क्विंटल करण्यात आली आहे.जिल्ह्यातील एकुण ६१ हजार ४६३ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर आणल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनने दिली.यापैकी भंडारा तालुक्यातील २ हजार ७९६, मोहाडी ८ हजार ९४६, तुमसर ११ हजार ९५, लाखनी १० हजार ९८७, साकोली ११ हजार ५२, लाखांदूर १२ हजार ८५६ तर पवनी तालुक्यातील ३ हजार ७३१ लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे.यात साधारण धानाची ११ लक्ष ७५ हजार ६७० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. तालुकानिहाय खरेदी केंद्र सुरु असलेल्या केंद्रांतर्गत भंडारा ६, मोहाडी १५, तुमसर १९, लाखनी १२, साकोली १२, लाखांदूर १४ व पवनी ६ केंद्रांमधून ही खरेदी सुरु आहे.आधारभूत केंद्रावर धान उघड्यावरचजिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांवर मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता. टोकन मिळाल्यानंतरही बारदान्याअभावी धान्य उघड्यावर ठेवावे लागले होते. त्यातच महिनाभरात चारवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत अधिकच भर पडली. धान ठेवायला गोदामातच जागा नसताना नवीन धान ठेवायचे कुठे असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. मात्र धान खरेदी केंद्रात सुविधा नसल्याने त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला. अवकाळी पावसाने धान ओले झाले. काही ठिकाणी धानाला कोंबही फुटल्याने धान पाखर झाले. पाखर झालेले धान केंद्र खरेदी करीत नाही तर अशा स्थितीत ते धान परतही नेता येत नाही अशी अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड