शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

‘१०८’ने वाचविले १३ हजार रूग्णांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2016 00:15 IST

तातडीचा प्रसंग उद्भवल्यानंतर रुग्णाला पहिल्या तासात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी,...

उपक्रम शासनाचा : रूग्णवाहिकांची भूमिका महत्त्वाचीसंजय साठवणे भंडारातातडीचा प्रसंग उद्भवल्यानंतर रुग्णाला पहिल्या तासात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, आपातकालीन स्थितीत एकही जण उपचाराविना दगावता कामा नय, वेळेवर नजीकच्या शासकीय रुग्णालयात रुग्ण पोहचावे याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र आपातकालीन वैद्यकीय सेवा सुरु केली. या अनुषंगाने राज्यात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत दोन वर्षात जिल्ह्यात १३ हजार ५१७ रुग्णांचा जीव वाचविण्यात यश मिळाले आहे.भंडारा जिल्ह्याच्या सेवेत सध्या अकरा रुग्णवाहिका कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्यात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सुरु केल्या. २६ जानेवारी २०१४ ला हा प्रकल्प सुरु झाला. त्यासाठी पुणे येथील भारत विकास प्रतिष्ठानला ही जबाबदारी सोपविण्यात आली. या रुग्णवाहिका दोन प्रवर्गात सुरु झाल्या. त्यात बेसीक लाईफ सपोर्ट आणि अ‍ॅडव्हांस लाईफ सपोर्ट या दोन स्वरुपाच्या रुग्णवाहिकांचा समावेश आहे.पहिल्या प्रकारच्या रुग्णवाहिकेत अतीदक्षता विभागाप्रमाणे पल्स आॅक्समिटर, सर्पदंश झाला असेल तर विषरोधक सलाईन अशा उपकरणांचा समावेश असतो. अ‍ॅडव्हांस स्वरुपाच्या रुग्णवाहिकेत आणखी चार अद्यावत उपकरणाचा समावेश असतो. यात प्रामुख्याने वरील उपकरणासोबतच ईसीजी, मॉनीटर, हृदयाची स्पंदने सुरु करण्यासाठी शॉक मशीन, व्हेंटीलेटर, व्हॉलोमेथीक पंप, प्राण वाचविणाऱ्या औषधांचा समावेश असतो. चार प्रकारचे स्ट्रेचरही असतात. शिवाय एखाद्या गरोदर मातेला रुग्णालयाच्या वाटेतच प्रसुतीकळा आल्या तर तिचे बाळंतपण रुग्णवाहिकेत करता यावे याकरिता प्रसुतीगृहातल्या सुविधादेखील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.याच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची नागपूर विभागाची आकडेवारी लक्षात घेतली तर या विभागात ही सुविधा झाल्यापासून आतापर्यंत १ लक्ष १३ हजार जणांचे प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश मिळाल्याची माहिती आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा अशी ६ जिल्हे येतात. या अंतर्गत एकट्या नागपूर जिल्ह्यात ४२, चंद्रपूर जिल्ह्यात १६, गोंदिया १३, वर्धा ११ तर गडचिरोली जिल्ह्यात ९ रुग्णवाहिकांचा समावेश आहे.