शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

याच सरोवरावर युधिष्ठिराला विचारले होते यक्षप्रश्न; पाकिस्तानातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या भागात स्थित आहे ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 17:51 IST

लोककथेनुसार हे प्रार्थनास्थळ हजारो वर्षे जुने आहे. येथे असलेल्या मंदिराबद्दल असे मानले जाते की ते श्रीकृष्णाने बांधून घेतले होते आणि येथे असलेल्या शिवलिंगाची स्थापनाही त्यांनी केली होती.

कटास राज हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या उत्तरेकडील चकवाल जिल्ह्यातील पोतोहर पठारातील नमक कोह पर्वत रांगेत असलेले हिंदूंचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे पुरातन शिवमंदिर आहे. या मंदिराशिवाय इतरही मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरे दहाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. माता पार्वती जेव्हा सती झाली तेव्हा भगवान शंकराच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंमुळे सरोवर तयार झाले असे पौराणिक कथेत सांगितले जाते. अलीकडेच पाकिस्तानी कोर्टाने कोरड्या पडणाऱ्या सरोवरांबद्दल चिंता व्यक्त केल्याने हे ठिकाण चर्चेत आले. 

या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे

लोककथेनुसार हे प्रार्थनास्थळ हजारो वर्षे जुने आहे. येथे असलेल्या मंदिराबद्दल असे मानले जाते की ते श्रीकृष्णाने बांधून घेतले होते आणि येथे असलेल्या शिवलिंगाची स्थापनाही त्यांनी केली होती. मौर्य सम्राट अशोकानेही या ठिकाणी स्तूप बांधला होता, त्याचप्रमाणे चौथ्या शतकात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी फाहिन यानेही आपल्या प्रवासवर्णनात या ठिकाणाचा उल्लेख केला आहे. हे ठिकाण शीख गुरू नानक देवजी यांनाही अतिशय प्रिय असल्याचे म्हटले जाते. त्याच्या आजूबाजूला उत्खनन करताना, सहा ते सात इसवीसनपूर्व काळातील संस्कृतींचे अवशेष सापडले आहेत.

येथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला 

असे म्हणतात की महाभारत काळात पांडव वनवासाच्या काळात या डोंगरांवर आले होते आणि हा तो तलाव आहे जिथे पांडव तहानलेले असताना पाण्याच्या शोधात पोहोचले होते. तलावावर यक्षाचा अधिकार होता. जेव्हा नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन असे चार भाऊ पाण्याच्या शोधात या तलावावर आले तेव्हा यक्षाने त्यांना बोलावून सांगितले की, या पाण्यावर आपला अधिकार आहे, जर त्याला पाणी घ्यायचे असेल तर त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पांडवांपैकी  युधिष्ठिर वगळता कोणीही त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही आणि जेव्हा त्यांनी पाणी पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा यक्षाने त्यांना बेशुद्ध केले. शेवटी चार भावांचा शोध घेत युधिष्ठिर तिथे पोहोचला आणि चारही भावांना बेशुद्ध पडलेले पाहून विचारले की हे कोणी केले, तेव्हा यक्षाने सर्व प्रकार सांगितला, तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की ते उत्तर द्यायला तयार आहेत. तेव्हा यक्षाने त्याला प्रसिद्ध प्रश्न विचारले आणि युधिष्ठिराने अचूक उत्तर दिल्यावर यक्षाने चार भावांना शुद्धीवर आणले आणि त्या सरोवराला धर्मराजाचे नाव दिले.