शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

मी मेल्याशिवाय देव दिसणार नाही- रामकृष्ण परमहंस!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 26, 2020 22:02 IST

देवाला भेटायचे, तर तळमळ निर्माण व्हावी लागते आणि मुख्य म्हणजे 'मी' अर्थात 'अहंकार' मरावा लागतो. तेव्हाच देव भेटतो.

ज्योत्स्ना गाडगीळ

स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र. बंगालीत त्याचा उच्चार नोरेन असा होतो. हा नोरेन बालपणी त्याच्या मित्रांच्या सांगण्यावरून गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांच्या मठात गेला. त्याचा आवाज अतिशय गोड होता, म्हणून मित्रांच्या आग्रहाखातर त्याने रामकृष्ण परमहंस यांच्या समोर एक भजन सादर केले. ते ऐकून रामकृष्णांची समाधी लागली. त्यांचे देहभान हरपलेले पाहून नोरेन आश्चर्यचकित झाला. भजन संपवून त्याने रामकृष्णांना भानावर आणले. रामकृष्ण त्याला म्हणाले, 'नोरेन, थांबू नकोस, आणखी गा...' असे म्हणत असताना त्यांनी नोरेनच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांची जशी समाधी लागली, तशी गाता गाता नोरेनचीदेखील समाधी लागली. एवढेच नाही, तर त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. नोरेन जेव्हा भानावर आला, तेव्हा भारावून गेला. 

नोरेनला ती समाधी अवस्था पुन्हा अनुभवायची होती. गुरुदेव म्हणाले, योग्य वेळ आली, की तू आपणहून ती अवस्था अनुभवशील. यावर नोरेनने पुढचा प्रश्न विचारला, 'पण गुरुदेव ती वेळ कधी येईल? मला देव कधी दिसेल?' 

यावर मंद स्मित करून गुरुदेव म्हणाले, 'मी मेल्यावर!'

नोरेन चकित होऊन गुरुदेवांकडे एकटक बघत बसला. त्यानंतर कित्येक महिने नोरेनची गुरुदेवांशी गाठ पडली नाही. मात्र, गुरुजींच्या उत्तराने नोरेन अस्वस्थ झाला. त्याने गुरुदेवांना भेटायचे ठरवले. त्यांचे शिष्यत्व पत्करायचे ठरवले. गुरुंच्या ओढीने नोरेन रामकृष्णांच्या भेटीस गेला. आश्चर्य काय, तर तेदेखील नोरेनची व्याकुळतेने वाट बघत होते. तिथे गेल्यावर पुन्हा नोरेनला तिच अनुभूती आली. क्षणभर ती अवस्था अनुभवल्यानंतर त्याने गुरुदेवांना पुन्हा तोच प्रश्न विचारला, 'गुरुदेव, मला देव कधी दिसेल?'

हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराजनोरेनचा प्रश्न ऐकून गुरुदेवांनी पुन्हा तेच उत्तर दिले.

आता मात्र, नोरेननी हट्टच धरला. देव पाहिल्याशिवाय त्यांच्या मठातून जाणार नाही, असे त्याने गुरुदेवांना निक्षून सांगितले. आणि तो मठात राहू लागला. आज न उद्या गुरुदेव आपल्याला देव दाखवतील या आशेवर नोरेन रात्रंदिवस वाट पाहू लागला. मात्र, गुरुदेवांचे `मी मेल्यावर' हे उत्तर ऐकून तो अस्वस्थ होत असे. 

एके दिवशी पहाटे गुरुदेव आणि सर्व शिष्य नदीवर स्नानासाठी गेले असता, गुरुदेवांनी नोरेनचे लक्ष नसताना त्याचे डोके पाण्याखाली दाबून धरले. काही क्षण पाण्याखाली राहिल्यावर, नाका-तोंडात पाणी गेल्यावर नोरेन उसळी मारून बाहेर आला आणि म्हणाला, `गुरुदेव, हे काय करताय, मी मरेन ना?'

गुरुदेव स्मित करून म्हणाले, `नोरेन हेच अपेक्षित आहे. देवाला भेटायचे, तर एवढी अस्वस्थता निर्माण व्हावी लागते आणि मुख्य म्हणजे 'मी' अर्थात 'अहंकार' मरावा लागतो. तेव्हाच देव भेटतो. नोरेनला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि गुरुंच्या ठायी असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली. याच नोरेनने गुरुंच्या सान्निध्यात राहून स्वत: देव पाहिला आणि भविष्यात लोकांनाही दाखवला.

हेही वाचा : स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा! -डॉ. राजीमवाले.

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंद