शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

तुम्ही खडीसाखर बना, गुरु तुमच्याकडे धावत येतील!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 2, 2021 16:57 IST

खडीसाखरेसारखा गोडवा स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्यात पेरायला शिका. खडीसाखरेची गोडी चाखण्यासाठी चांगले लोक तुमच्याशी आपोआप जोडले जातील. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन आयुष्यातील उदाहरणे देऊन परमार्थ सोपा करून सांगतात. ते म्हणतात, संतांचा, गुरुंचा शोध घेत तुम्ही फिरू नका. खडीसाखरेचा खडा ठेवला, की मुंग्यांना जाऊन सांगावे लागत नाही. त्या आपणहून खडीसाखरेकडे धाव घेतात. त्याचप्रमाणे, तुम्हीदेखील संतांच्या, गुरुंच्या शोधात वेळ वाया घालवू नका. तो वेळ तुम्ही स्वत:च्या जडणघडणीसाठी वापरा. स्वत:ला सिद्ध करा. चांगली व्यक्ती बना. खडीसाखरेसारखा गोडवा स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्यात पेरायला शिका. अशा खडीसाखरेची गोडी चाखण्यासाठी चांगले लोक तुमच्याशी आपोआप जोडले जातील. 

हेही वाचा : दैवत जागृत असते, की आपण? 

ज्याप्रमाणे शिष्य आपल्या गुरुंच्या भेटीसाठी तळमळत असतो, तसा गुरुदेखील सच्चा शिष्यासाठी तळमळत असतो. याबाबीत रामकृष्ण परमहंस यांचा किस्सा आठवतो. त्यांच्या भेटीला आलेल्यांमध्ये नरेंद्र नावाचा बालक आपला भावी शिष्य होईल याची त्यांना आणि नरेंद्रलादेखील कल्पना नव्हती. मित्राच्या सांगण्यावरून नरेंद्रने रामकृष्ण परमहंस यांच्यासमोर एक भजन सादर केले आणि त्याचे सूर रामकृष्णांच्या काळजाला भिडले. त्यांना नरेंद्रमध्ये आपला शिष्य गवसला. परंतु, नरेंद्र स्वत: त्यांची परीक्षा घेईपर्यंत त्यांच्यापासून दूर दूर पळत होता. मात्र, असे केल्याने त्याचेच चित्त विचलित होत राहिले. शेवटी त्याने रामकृष्णांची भेट घेतली. त्या भेटीत रामकृष्णांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि नरेंद्राची क्षणभर समाधी लागली. सगळी चिंता, क्लेष लयाला जाऊन नरेंद्राने परमानंदाची अनुभूती घेतली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रामकृष्णांनी डोक्यावरून हात काढताच नरेंद्राची समाधी भंग झाली. त्या एका क्षणात नरेंद्रची गुरुंवर श्रद्धा जडली आणि त्याने रामकृष्णांचे कायमस्वरूपी शिष्यत्व पत्करले. एवढेच नव्हे, तर भविष्यात स्वामी विवेकानंद म्हणून नावलौकिक मिळाल्यानंतरही गुरुंच्या नावे `रामकृष्ण मिशन' अंतर्गत धर्मकार्य पार पाडले.

गोंदवलेकर महाराजदेखील आपल्याला हेच सांगतात, गुरुंच्या मार्गदर्शनाने तुमचे कार्य सोेपे होईल. त्यांच्याशिवाय तुम्ही कार्य करू पहाल, तर त्या कार्याला मी पणा चिकटेल आणि अहंकार डोकावला, की कार्य पूर्ण होणार नाही. याउलट गुरुंचे मार्गदर्शन लाभल्यामुळे आपण योग्य रितीने कार्य करत आहोत, ही श्रद्धा कायम राहिल आणि मनात कोणतेही द्वैत राहणार नाही. 

भगवंताचे नाम घेतानाही गुुरुंना साक्ष ठेवा. नाम घेण्याला अहंकार चिकटणार नाही. योग्य रितीने नाम घेतले जाईल आणि परमार्थाची वाट सोपी होईल. भगवंताचे नाम औषध आहे. ते घेत राहा. नामामुळे तुमचे मन स्वच्छ झाले, की सद्भावना जागी होईल, सत्कार्य घडेल आणि तुम्ही खडीसाखरेसारखे गोड व्यक्तीमत्त्व व्हाल. मग आपोआपच गुरु, संत तुमच्या कार्याला पुष्टी देण्यासाठी तुमच्याकडे धाव घेतील.

हेही वाचा : अमरत्व प्राप्त व्हावे, असे तुम्हालाही वाटत असेल, तर एकदा ही गोष्ट वाचाच!