शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

देवघराचे चुकीचे स्थान निर्माण करेल वास्तुदोष; करा पुढील बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 15:15 IST

अजाणतेपणी आपल्याकडून देव्हाऱ्याची जागा चुकते आणि आपल्याला पूजेचा, देवदर्शनाचा आनंद मिळत नाही किंवा समाधान लाभत नाही. यासाठी फार बदल अपेक्षित नाहीत, फक्त दिशाबदल अपेक्षित आहे.

आपली रोजची सकाळ देवदर्शनाने होते. देवाचा निरोप घेऊन आपण कामाची सुरुवात करतो. हिंदू घरांमध्ये देव्हारा नाही, असे होत नाही. सगळे जण आपापल्या सोयीप्रमाणे घरात देव्हाऱ्याची रचना करतात किंवा जागेचा अभाव असेल, तर देवी-देवतांची फोटो फ्रेम लावतात आणि त्याची पूजा करतात. परंतु, अजाणतेपणी आपल्याकडून देव्हाऱ्याची जागा चुकते आणि  आपल्याला पूजेचा, देवदर्शनाचा आनंद मिळत नाही किंवा समाधान लाभत नाही. यासाठी फार बदल अपेक्षित नाहीत, फक्त दिशाबदल अपेक्षित आहे. हा बदल वास्तू शास्त्रानुसार सुचवलेला आहे. तुम्हालाही घरात दोष जाणवत असतील, कुटुंबाची प्रगती थांबलेली आहे असे जाणवत असेल, तर देव्हाऱ्याची जागा बदलून पहा व पुढील चूका टाळा.

देवघर कुठे असावे ?

घर स्वत:चे असो नाहीतर भाड्याचे, छोटे असो किंवा मोठे, देवघर असलेच पाहिजे. कारण, या स्थळावर सर्व जण नतमस्तक होतात. देवघराची दिशा उत्तर पूर्व असल्यास शुभ मानली जाते. या दिशेने देवघर असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते. ईशान्य दिशेचे प्रमुख गुरु बृहस्पती हे अध्यात्मिक ज्ञान देतात. सकारात्मक ऊर्जेचा संचार याच दिशेने होते. वास्तुपुरूष जेव्हा धरतीवर आले, तेव्हादेखील त्यांचे शीर ईशान्य दिशेने होते. म्हणून देवघरासाठी ईशान्य दिशा महत्त्वाची ठरते. 

काही कारणास्तव ईशान्य दिशेने देवघर ठेवणे जमत नसेल, तर पूर्व दक्षिण दिशेचा वापर करावा. परंतु केवळ दक्षिण दिशेच्या दिशेने देवघर नसावे. कारण ती यमाची दिशा आहे. पूजा करताना व्यक्तिचे मुख पूर्व दिशेने असेल, तर पूजेचे पूर्ण फळ मिळते आणि पूजा संपन्न होते.

देवघर कुठे नसावे?

अनेकदा जागेच्या अभावामुळे आपण कोनाडा पाहून देवघर बनवून मोकळे होतो. तसे असले, तरीदेखील देवघराचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने आणि देवपूजेतून प्रसन्नता मिळण्याच्या दृष्टीने पुढील जागांची निवड प्रकर्षाने टाळावी. अशा ठिकाणी देवघर असेल, तर घरात अकारण क्लेष होतात, आर्थिक हानी होेते आणि कुटुंबप्रमुख नाखुष राहतो. 

>>शिडीच्या खाली देवघर असू नये.>>शौचालयाच्या जवळपास देवघर असू नये. >>शयन कक्ष अर्थात बेडरूममध्ये देवघर असू नये.>>घराची अडगडीची जागा, कोनडा, बेसमेंट, स्टाअर रूम अशा ठिकाणी देवघर करू नये. 

अशा रितीने देवघराची जागा निश्चित करून दिवसभरातून किमान पाच मिनीटे देवासमोर, देवाच्या सान्निध्यात घालवावीत, त्याचा लाभ तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना अवश्य मिळेल.