शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

प्रेमाने काम करा आणि कामावर प्रेम करा, तरच नेत्रदीपक यश मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 15:15 IST

प्रत्येक काम ही तुमच्या भविष्याच्या इमारतीसाठी रचलेली वीट असते. ती ढासळली, तर तुमचा स्वप्नांचा बंगला कोसळेल.

हत्ती गेला नि शेपूट राहिलं, ही म्हण आपल्या सर्वांनाच माहीत आहे. म्हणजे आपण सगळेच जण उत्साहाने काम करतो, परंतु कामाचा शेवटचा टप्पा कसातरी गुंडाळून मोकळे होतो. त्या शेवटच्या कामाचा आपल्या कंटाळा आलेला असतो. परंतु, हाच कंटाळा कधी कधी आपल्याला महागात पडू शकतो. कसा? त्यासाठी ही गोष्ट वाचा.. 

एक कारागीर होता. तो एका बिल्डरच्या हाताखाली कामाला होता. त्याने आजवर एकापेक्षा एक सुंदर बंगले, इमारती, वास्तु उभारल्या होत्या. जणू काही तो म्हणजे पृथ्वीवरचा विश्वकर्माच होता. अशी जादू त्याच्या हातांमध्ये आणि कल्पकला बुद्धीमध्ये ठासून भरली होती. आयुष्यभर बरीच मेहनत केल्यानंतर त्याने आता कामातून निवृत्ती घ्यायची असे ठरवले. असे म्हणून त्याने बिल्डरला काम थांबवत असल्याची सूचना दिली. बिल्डरने त्याची सूचना मान्यदेखील केली. परंतु एक अट घातली. निवृत्तीआधी एका वसाहतीत एक बंगला बांधायचा आहे. ते काम पूर्ण करून मग जा. 

कारागीर रागावला, परंतु त्याने राग व्यक्त केला नाही. तो ठीक आहे म्हणाला आणि त्याने कामाची सुरुवात केली. परंतु मनाने केव्हाच निवृत्त झालेला असल्याने त्याचे कामात लक्ष लागत नव्हते. रतीब टाकल्यासारखे त्याने काम पूर्ण केले आणि तीन चार महिन्यांनी बंगला बांधून बिल्डरचा निरोप घेतला. 

त्याची शेवटची कलाकृती पाहण्यासाठी बिल्डर त्या ठिकाणी गेला आणि त्याचा विश्वासच बसला नाही, की सुंदर वास्तू बांधणाऱ्या आपल्या कारागिराने हा ओबड धोबड बंगला बांधला आहे. बिल्डरने मनाशी ठरवल्याप्रमाणे त्या बंगल्याची चावी कारागिराला सुपूर्द केली आणि सांगितले, हा बंगला मी तुझ्यासाठी बांधून घेतला होता. तू आजवर सर्वांना आलिशान घर दिलेस त्या प्रामाणिकपणाचे आणि मेहनतीचे हे फळ!

कारागीर मनातून खजील झाला. मनातल्या मनात म्हणाला, हे जर आधी माहीत असते तर आजवर केलेल्या कामापेक्षा उत्तम काम करून मी माझे घर उभारले असते. परंतु माझी कामावरची श्रद्धा ढळली आणि त्याचे फळ मला असे मिळाले!

म्हणून काम संपवताना चालढकल करू नका. कारण प्रत्येक काम ही तुमच्या भविष्याच्या इमारतीसाठी रचलेली वीट असते. ती ढासळली, तर तुमचा स्वप्नांचा बंगला कोसळेल. म्हणून प्रेमाने काम करा आणि कामावर प्रेम करा.