शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

प्रेमाने काम करा आणि कामावर प्रेम करा, तरच नेत्रदीपक यश मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 15:15 IST

प्रत्येक काम ही तुमच्या भविष्याच्या इमारतीसाठी रचलेली वीट असते. ती ढासळली, तर तुमचा स्वप्नांचा बंगला कोसळेल.

हत्ती गेला नि शेपूट राहिलं, ही म्हण आपल्या सर्वांनाच माहीत आहे. म्हणजे आपण सगळेच जण उत्साहाने काम करतो, परंतु कामाचा शेवटचा टप्पा कसातरी गुंडाळून मोकळे होतो. त्या शेवटच्या कामाचा आपल्या कंटाळा आलेला असतो. परंतु, हाच कंटाळा कधी कधी आपल्याला महागात पडू शकतो. कसा? त्यासाठी ही गोष्ट वाचा.. 

एक कारागीर होता. तो एका बिल्डरच्या हाताखाली कामाला होता. त्याने आजवर एकापेक्षा एक सुंदर बंगले, इमारती, वास्तु उभारल्या होत्या. जणू काही तो म्हणजे पृथ्वीवरचा विश्वकर्माच होता. अशी जादू त्याच्या हातांमध्ये आणि कल्पकला बुद्धीमध्ये ठासून भरली होती. आयुष्यभर बरीच मेहनत केल्यानंतर त्याने आता कामातून निवृत्ती घ्यायची असे ठरवले. असे म्हणून त्याने बिल्डरला काम थांबवत असल्याची सूचना दिली. बिल्डरने त्याची सूचना मान्यदेखील केली. परंतु एक अट घातली. निवृत्तीआधी एका वसाहतीत एक बंगला बांधायचा आहे. ते काम पूर्ण करून मग जा. 

कारागीर रागावला, परंतु त्याने राग व्यक्त केला नाही. तो ठीक आहे म्हणाला आणि त्याने कामाची सुरुवात केली. परंतु मनाने केव्हाच निवृत्त झालेला असल्याने त्याचे कामात लक्ष लागत नव्हते. रतीब टाकल्यासारखे त्याने काम पूर्ण केले आणि तीन चार महिन्यांनी बंगला बांधून बिल्डरचा निरोप घेतला. 

त्याची शेवटची कलाकृती पाहण्यासाठी बिल्डर त्या ठिकाणी गेला आणि त्याचा विश्वासच बसला नाही, की सुंदर वास्तू बांधणाऱ्या आपल्या कारागिराने हा ओबड धोबड बंगला बांधला आहे. बिल्डरने मनाशी ठरवल्याप्रमाणे त्या बंगल्याची चावी कारागिराला सुपूर्द केली आणि सांगितले, हा बंगला मी तुझ्यासाठी बांधून घेतला होता. तू आजवर सर्वांना आलिशान घर दिलेस त्या प्रामाणिकपणाचे आणि मेहनतीचे हे फळ!

कारागीर मनातून खजील झाला. मनातल्या मनात म्हणाला, हे जर आधी माहीत असते तर आजवर केलेल्या कामापेक्षा उत्तम काम करून मी माझे घर उभारले असते. परंतु माझी कामावरची श्रद्धा ढळली आणि त्याचे फळ मला असे मिळाले!

म्हणून काम संपवताना चालढकल करू नका. कारण प्रत्येक काम ही तुमच्या भविष्याच्या इमारतीसाठी रचलेली वीट असते. ती ढासळली, तर तुमचा स्वप्नांचा बंगला कोसळेल. म्हणून प्रेमाने काम करा आणि कामावर प्रेम करा.