शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संकष्ट चतुर्थीव्रत का करावे? यासंबंधी मुद्गल पुराणात दिलेली माहिती जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 09:27 IST

गणपति या देवतेचे मुद्गल पुराण आहे. या पुराणात चंद्रोदयकाळी भोजन करावे असे सांगितले आहे. हे भोजन म्हणजे व्रतांग भोजन आहे. व्रताची पारणा नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. 

व्रताचे दोन प्रकार आहेत. सकाम व निष्काम. गणपती ही बुद्धीची आणि विघ्नहरण करणारी देवता आहे. बुद्धी वाढण्याकरीता किंवा आपले काम, घरातील मंगलकार्य निर्विघ्न व्हावे म्हणून हे व्रत करावे. याला सकाम म्हणतात. इच्छा पुर्तीसाठी केले जाते ते सका. कामना म्हणजे इच्छा. देवतेकडून आपणास काही मिळावे अशी अजिबात इच्छा नसणे म्हणजे निष्काम. 

व्रत करण्याची पद्धती मात्र दोन्हीची एकच. विनायकी चतुर्थीचे व्रत अहोरात्राचे असल्याने एकादशीप्रमाणे संपूर्ण दिवस उपास करायचा. संकष्टीचे व्रत हे पाच प्रहराचे व्रत आहे म्हणून दिवसा उपोषण करून चंद्रोदय झाल्यावर भोजन करावे. काही लोक संकष्टीला अहोरात्र उपोषण करतात, पण हे अशास्त्रीय आहे. कारण चंद्रोदय झाल्यावर भोजन करावे असा विधी आहे. विधीचे पालन करावे लागते. 

गणपति या देवतेचे मुद्गल पुराण आहे. या पुराणात चंद्रोदयकाळी भोजन करावे असे सांगितले आहे. हे भोजन म्हणजे व्रतांग भोजन आहे. व्रताची पारणा नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. 

कायिक-वाचिक-मानसिक असे तीन प्रकारानी कोणतेही व्रत करावयाचे असते. झोपून उठताच आज मी हे व्रत करीन असा मानसिक संकल्प करावा. या व्रतात पूजन-जप-स्तोत्र पाठ करावे. 

अथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनानी अभिषेक करून षोडशोपचार पूजा करावी. यात सायंकाळच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. दूर्वा, शमी, मंदार हे गणपतीला प्रिय आहेत. तसेच जास्वंद देकील पूजेत वाहावे. दूर्वा २१, १०८, १००८ जेवढ्या शक्य असतील तेवढ्या एक एक नाममंत्राने वहाव्यात. बाप्पाच्या पायाशी चित्त एकाग्र व्हावे, ही त्यामागील संकल्पना आहे. 

संकष्टीचे व्रत शीघ्र फलदायी आहे, त्याबाबत एक पौराणिक कथादेखील सांगितली जाते; ती अशी... 

गणपतीची बरीच स्तोत्रे गणेश कोशात दिली आहेत. त्यापैकी जी पाठ असतील ती आवर्जून म्हणावी. स्तोत्र पाठ नसतील तर 'नमोभगवते गजाननाय' या मंत्राचा जप करावा. संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी. चंद्रोदयाला चंद्राला अर्घ्यदान करून भोजन करावे. उपोषणाचे पदार्थ दिवसा एकदाच खावेत. वरचेवर खाऊ नये.  अशी रितीने संकष्टीचे व्रत अंगिकारले असता आपल्या हातून यथोचित गणेश उपासना घडते. 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी