शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

रजिस्टर पद्धतीने लग्न का करू नये? याबाबत शास्त्र काय सांगते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 16:20 IST

आपली लग्नपद्धती अतिशय उत्कृष्ट, उदात्त व पवित्र आहे. रजिस्टर लग्नात यातील एकही गोष्ट नाही.

लग्न हा केवळ विधी नाही, तर दोन जिवांचे, कुटुंबांचे मनोमिलन आहे. हे कार्य देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने, चार-चौघांच्या उपस्थितीत, त्यांच्या आशीर्वादाने पार पडावे, अशी आपली पूर्वापार रित चालत आलेली आहे. परंतु, लग्नातील अतिरिक्त खर्च, हुंडा देऊन कर्जबाजारी झालेले वडील, पाण्यासारखा वाहणारा पैसा पाहून अनेक तरुण-तरुणींनी रजिस्टर लग्न पद्धतीचा मार्ग अवलंबिला. परंतु, लग्नाच्या नावावर घडणारे खर्चिक प्रकार मूळ चालीरितींना धरून नाहीत. त्यामुळे लग्न पद्धतीचे उच्चाटन करून त्यातील विधींना नाकारून रजिस्टर लग्न करणे, आजही घरातील ज्येष्ठ मंडळींना पटत नाही. कारण, हिंदु लग्न पध्दतीतील सर्व विधींमागे संस्कार आहेत. दांपत्य जीवन सुखाचे जावे, म्हणून मंत्र संस्कार आहेत, एकमेकांप्रती समर्पण भावना असावी म्हणून वचने आहेत. 

आपली लग्नपद्धती अतिशय उत्कृष्ट, उदात्त व पवित्र आहे. रजिस्टर लग्नात यातील एकही गोष्ट नाही. लग्न रजिस्टर तरी का करायचे? रजिस्टर न करताही नवरा बायकोसारखे राहिले, तरी प्रपंच हेणार नाही का? मुले होणार नाहीत का? सर्व काही होऊ शकते, मग लग्न रजिस्टर करण्याची तरी काय गरज आहे? याउलट धार्मिक विधी केल्याने पति पत्नीमध्ये जो पवित्रभाव निर्माण होतो तो रजिस्टर केल्याने होत नाही. आपल्या लग्न पद्धतिची वैशिष्ट्ये पहा...

या पद्धतीत प्रथम पुण्याहवाचन केले जाते. पुण्य म्हणजे पुण्यकारक. अह म्हणजे दिवस. वाचन म्हणजे म्हणणे. ज्योतिषशास्त्रदृष्ट्या तो दिवस चांगला असला, तरी विद्वान जाणकारांनी तो पुण्याह आहे म्हटले की त्यावर शिक्कामोर्तब होते. 

मनुष्य जन्माला येतो, तो देव, ऋषी आणि आचार्य यांचे ऋण घेऊन, असे शास्त्र सांगते! पुण्याहवाचनात या तिघांनाही संतुष्ट करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा विधी आहे. गणपती, गौर्यादिदेवता यांचे पूजन आहे. नांदिश्राद्ध आहे. नांदिश्राद्ध म्हणजे वृद्धीश्राध्द. मंगलकर्माची वृद्धी व्हावी आणि पितर संतुष्ट व्हावेत हा यात हेतू आहे. हे पुण्याहवाचन पुष्कळ ऋषींनी तयार केले आहे. ते करताना ऋषींना जो आनंद झाला, तो ऐकणाऱ्यालाही मिळतो. संतुष्ट झालेले देव, ऋषि, आचार्य, पितर कर्त्याला आशीर्वाद देतात. धन धान्ययुक्त करतात, म्हणून लग्न हे विधिवतच करावे. 

याशिवाय लग्नाच्या वेळेस गुरुजी प्रत्येक विधीचा अर्थ समजावून देतात, तेव्हा नीट लक्ष दिले, तर लग्नसंस्काराचे महत्त्व काय आहे, ते आपल्याला लक्षात येईल. म्हणून लग्न धुमधडाक्यात केले नाही तरी चालेल, पण विधीवत व्हावे, ही घरातील ज्येष्ठ मंडळींची अपेक्षा गैर नाही.