शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नामस्मरण का करावे? त्यामुळे खरोखरच पापमुक्ती होते का? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 15:31 IST

आरोग्य, मन:शांती, आत्मिक बळ आणि ईश्वरप्राप्ती यासाठी नामस्मरणासारखे साधन नाही.

'नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची' असे तुकाराम महाराजांनी एका पदात म्हटले आहे. खरोखरच केवळ नामस्मरणाने पापांचे निवारण होते का? होत असेल तर कसे? ते पहा-

नामात शक्ती जितुकी पाप संहराया,पाप्या न शक्ति तितुकी पाप ते कराया।।

नामस्मरणाचे महात्म्य साऱ्या संतांनी एकमुखाने वर्णन केले आहे. कलीयुगात तर त्याची थोरवी फार मोठी असून नामस्मरणाला पर्यायच नाही. खरोखरच स्मरणयुक्त नाम घेणाऱ्याच्या मनात अशुभ असे पापाचरणाला प्रवृत्त करणारे विचारच येत नाहीत. परमात्म्याने आपली सारी शक्ती नामाच्या ठिकाणी ठेवलेली असल्याने नामाच्या अनुसंधानाने संचित जळून जाणयास मदत होते. प्रारब्धाचा क्षय होतो विंâवा प्रारब्धभोग सुसह्य होतात आणि क्रियमाणाची निर्मितीच थांबते असे हे अपार नाममहात्म्य आहे. 

नाम घेतल्याने जितक्या झपाट्याने पापरंहार होतो, तितकीच नवीन पापकर्मे करण्याची शक्तीही खालावते. सारे संत, सत्पुरूष, भक्त सतत नामस्मरण करत असतात. कारण त्याने शुद्धी होते आणि शुद्ध ज्याचा भाव झाला, दूरी नाही देव त्याला, या उक्तीप्रमाणे नामाने त्यांना देवाचा सहवास जाणवू लागतो. आत्मारामाची जवळीक होऊ लागते व त्या आनंदाची धुंदी फक्त नाम जपणाऱ्यालाच अनुभवता येते. शारीरिक व मानसिक शुद्धी म्हणजेच आत्मसाक्षात्कार. तुकोबराय स्वानुभव सांगतात,

देह देवाचे राऊळ, आत बाहेर निर्मळ,देव पहावयासी गेलो, तेथे देवचि होऊन गेलो, तुका म्हणे धन्य झालो, आम्ही विठ्ठलासी भेटलो।

खरोखरच, आरोग्य, मन:शांती, आत्मिक बळ आणि ईश्वरप्राप्ती यासाठी नामस्मरणासारखे साधन नाही. मात्र प्रपंच जसा सुरुवातीला अतिशय गोड लागतो, पण पुढे कमालीचा कटू होतो, त्याच्या अगदी उलट नामस्मरण सुरुवातीला फणसाची साले काढण्याइतके कंटाळवाणे वाटते, पण एकदा गोडी लागली की आतल्या गराची माधुरी अवीटच!