शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

नामस्मरण का करावे? त्यामुळे खरोखरच पापमुक्ती होते का? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 15:31 IST

आरोग्य, मन:शांती, आत्मिक बळ आणि ईश्वरप्राप्ती यासाठी नामस्मरणासारखे साधन नाही.

'नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची' असे तुकाराम महाराजांनी एका पदात म्हटले आहे. खरोखरच केवळ नामस्मरणाने पापांचे निवारण होते का? होत असेल तर कसे? ते पहा-

नामात शक्ती जितुकी पाप संहराया,पाप्या न शक्ति तितुकी पाप ते कराया।।

नामस्मरणाचे महात्म्य साऱ्या संतांनी एकमुखाने वर्णन केले आहे. कलीयुगात तर त्याची थोरवी फार मोठी असून नामस्मरणाला पर्यायच नाही. खरोखरच स्मरणयुक्त नाम घेणाऱ्याच्या मनात अशुभ असे पापाचरणाला प्रवृत्त करणारे विचारच येत नाहीत. परमात्म्याने आपली सारी शक्ती नामाच्या ठिकाणी ठेवलेली असल्याने नामाच्या अनुसंधानाने संचित जळून जाणयास मदत होते. प्रारब्धाचा क्षय होतो विंâवा प्रारब्धभोग सुसह्य होतात आणि क्रियमाणाची निर्मितीच थांबते असे हे अपार नाममहात्म्य आहे. 

नाम घेतल्याने जितक्या झपाट्याने पापरंहार होतो, तितकीच नवीन पापकर्मे करण्याची शक्तीही खालावते. सारे संत, सत्पुरूष, भक्त सतत नामस्मरण करत असतात. कारण त्याने शुद्धी होते आणि शुद्ध ज्याचा भाव झाला, दूरी नाही देव त्याला, या उक्तीप्रमाणे नामाने त्यांना देवाचा सहवास जाणवू लागतो. आत्मारामाची जवळीक होऊ लागते व त्या आनंदाची धुंदी फक्त नाम जपणाऱ्यालाच अनुभवता येते. शारीरिक व मानसिक शुद्धी म्हणजेच आत्मसाक्षात्कार. तुकोबराय स्वानुभव सांगतात,

देह देवाचे राऊळ, आत बाहेर निर्मळ,देव पहावयासी गेलो, तेथे देवचि होऊन गेलो, तुका म्हणे धन्य झालो, आम्ही विठ्ठलासी भेटलो।

खरोखरच, आरोग्य, मन:शांती, आत्मिक बळ आणि ईश्वरप्राप्ती यासाठी नामस्मरणासारखे साधन नाही. मात्र प्रपंच जसा सुरुवातीला अतिशय गोड लागतो, पण पुढे कमालीचा कटू होतो, त्याच्या अगदी उलट नामस्मरण सुरुवातीला फणसाची साले काढण्याइतके कंटाळवाणे वाटते, पण एकदा गोडी लागली की आतल्या गराची माधुरी अवीटच!